Headlines

रंगकाम करणाऱ्या मजुराच्या लेखणीची कमाल!:कवी सुनील उबाळे यांच्या 'माणूस' कवितेचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठच्या बी. ए. च्या अभ्यासक्रमात छत्रपती संभाजीनगर येथील कवी सुनील उबाळे यांच्या यांच्या माणूस कवितेचा समावेश करण्यात आला आहे. उबाळे यांच्या ‘उलट्या कडीचं घर’ या कवितासंग्रहातली ही कविता आहे. बी. ए. तृतीय वर्षाच्या सहावे सत्रातील अभ्यासपत्रिका क्रमांक ८ मधील “मराठवाडी कविता” या भागात या कवितेचा विद्यार्थी अभ्यास करणार आहेत. या बद्दल…

Read More

भांडेवाडीत सुपारी देऊन अल्पवयीन मुलांकडून खून:मुख्य सूत्रधार महिलेसह दोन अल्पवयीन आरोपी ताब्यात, 1 लाखाची सुपारी

नागपूरच्या भांडेवाडी येथील खुनाच्या गुन्ह्यात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात मुख्य सूत्रधार महिलेसह तिच्या साथीदाराला यापूर्वीच अटक करण्यात आली होती. आता गुन्हे शाखेच्या युनिट ५ ने खुनाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणाऱ्या दोन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांना एक लाख रुपयांची सुपारी देऊन हा खून घडवून आणल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या…

Read More

महाराष्ट्रात 'व्यवहारिक मराठी' अनिवार्य:प्रवासी सुरक्षेसह भाषिक स्वाभिमानाचा नवा अध्याय, महाराष्ट्र मोटार वाहन नियमात सुधारणा

“मराठी ही कोणाला दूर करणारी भाषा नाही, तर माणसाला माणसाशी जोडणारी भाषा आहे.” या भावनेतून महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाने व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांसाठी व्यवहारिक मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र मोटार वाहन नियम, 1989 मधील नियम 4, 22, 78 आणि 85 मध्ये आवश्यक सुधारणा करण्यात आल्या असून, 16 ऑगस्ट 2026 पासून…

Read More

आंबेगाव तालुक्यात मुसळधार पावसाचा कहर:दरडी कोसळल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला, भातशेतीचे अतोनात नुकसान

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात मंगळवारी सायंकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने भीमाशंकर, आहुपे आणि पाटण खोऱ्यात अक्षरशः कहर केला आहे. या संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळून प्रमुख घाटरस्ते बंद झाले असून, परिसरातील काही दुर्गम गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. पावसाचा आणि पुराचा सर्वाधिक फटका भातशेतीला बसला असून, हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकऱ्यांनी तातडीने…

Read More

मोठी दुर्घटना! पुण्यात दोन मजली इमारत कोसळली:14 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, बचावकार्य युद्धपातळीवर

राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमधून एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. मोशी कचरा डेपो परिसरातील दोन मजली इमारत अचानक कोसळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेत सुमारे 10 ते 14 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मोशी कचरा डेपोजवळील दोन मजली इमारत…

Read More

नागपुरात चाकूचा धाक दाखवत दाम्पत्याला लुटलं- VIDEO:कारच्या मागील सीटवर बसलेल्या मुलीने कॅमेऱ्यात कैद केला थरार

प्रवासात रस्ता चुकल्यानंतर अनोळखी व्यक्तींना रस्ता विचारण्याची आपली सवय असते, पण हीच सवय नागपुरातील एका दाम्पत्याच्या चांगलीच अंगलट आली आहे. नागपूरजवळील बुटीबोरी परिसरात रस्ता विचारण्याच्या बहाण्याने दोन दुचाकीस्वारांनी एका कारचा पाठलाग केला आणि भररस्त्यात चाकूचा धाक दाखवत दाम्पत्याकडील तब्बल सव्वा लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लुटले. या संपूर्ण थरारक घटनेचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ कारमध्ये मागे…

Read More

'फसवी कर्जमाफी' म्हणत रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल:बैठक ऐनवेळी रद्द, 36 लाख शेतकऱ्यांवर अन्यायाचा आरोप करत आंदोलनाचा इशारा

राज्यातील ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ ही प्रत्यक्षात कर्जमाफी नसून ‘कर्जवसुली योजना’ असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)चे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शेतकरी कर्जमाफीसंदर्भातील समितीचे प्रमुख प्रवीणसिंह परदेशी यांच्यासोबत होणारी बैठक ऐनवेळी रद्द करण्यात आल्याने सरकार शेतकऱ्यांना न्याय देण्यास इच्छुक नसल्याचा आरोपही त्यांनी केला. या कथित अन्यायाविरोधात…

Read More

पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर पर्यटकांना लुटणारे पोलिस गजाआड:'ड्रग्ज'ची भीती दाखवून मागितली 5 लाखांची खंडणी

पुणे-मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर लोणावळ्याकडे जाणाऱ्या पर्यटकांची गाडी अडवून त्यांच्याकडून ५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गाडीत अमली पदार्थ (ड्रग्ज) असल्याचा खोटा आरोप करत ही खंडणी मागण्यात आली. या प्रकरणी कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, खंडाळा महामार्ग पोलीस केंद्रातील तीन पोलीस कर्मचाऱ्यांसह एकूण पाच आरोपींना अटक करण्यात…

Read More

No Smashan Proof, No Nidhi!; Maharashtra Ministers Big Announcement

राज्यातील ग्रामीण भागात मरणानंतरही मरणयातना संपत नसल्याचे अत्यंत विदारक चित्र आहे. राज्यात आजही तब्बल 7 हजार 444 (20 टक्के) गावांमध्ये स्मशानभूमीच उपलब्ध नाही. परिणामी, पावसाळ्यात गुडघाभर पाण्यातून वाट काढत किंवा उघड्यावर अंतिम संस्कार करावे लागतात. . गावात स्मशानभूमी असल्याचा दाखला द्या, तरच निधी! राज्यातील स्मशानभूमींच्या दुरवस्थेवर आणि उपलब्धतेवर बोलताना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे म्हणाले की,…

Read More

केडीएमसी मारहाण प्रकरणी कठोर कारवाई करणार:उद्धव ठाकरेंच्या काळात पालघर साधू हत्याकांड विसरलात का?- भाजप

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील महिला डॉक्टर, नर्स आणि सुरक्षा रक्षकांना झालेल्या मारहाण प्रकरणाची राज्य सरकारने अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणात दोषी असणाऱ्या कोणालाही, कोणत्याही प्रकारचे राजकीय संरक्षण दिले जाणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृह विभाग या प्रकरणात कायद्यानुसार कठोर कारवाई करणार आहेत, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. उबाठा गटाचे…

Read More