Headlines

बकरी ईदपूर्वी गोवंशाचे टॅगिंग आवश्यक:जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचे यंत्रणांना निर्देश, शहरात आठ ठिकाणी चेकपोस्ट

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गोवंशाची कत्तल रोखण्यासाठी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. पशूसंवर्धन विभागाने प्राण्यांचे टॅगिंग करावे आणि महापालिका स्तरावर याबाबत जनजागृती करावी, असे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी कार्यालयात नुकत्याच झालेल्या प्राणीक्लेश समितीच्या बैठकीत हे निर्देश देण्यात आले. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक निकेतन कदम, पोलिस उपायुक्त गणेश शिंदे आणि पशूसंवर्धन उपायुक्त डॉ. संजय…

Read More

43 अंश तापमानातही भक्तीचा महापूर!:माहूरच्या कैलास टेकडीवर भाविकांची अलोट गर्दी; प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे प्रचंड हाल

कडक उन्हाळा आणि तब्बल ४३ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलेला तापमानाचा पाराही भाविकांच्या श्रद्धेपुढे फिका पडल्याचे चित्र आज नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे पाहायला मिळाले. अमावस्येच्या निमित्ताने माहूर गडावरील कैलास टेकडी येथे भगवान दत्तात्रेयांच्या पादुकांच्या दर्शनासाठी राज्यभरातून हजारो भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. अंगाची लाहीलाही करणाऱ्या रणरणत्या उन्हातही भाविकांची पाऊले गडाकडे वळत होती. मात्र, दुसरीकडे मंदिर प्रशासनाच्या भोंगळ…

Read More

गांधर्व गुरुकुलात निवास व्यवस्थेसाठी 8 जूनला निवड चाचणी:होतकरू विद्यार्थ्यांसाठी ‘कमवा व शिका’ योजना सुरू

भारतीय संगीत प्रसारक मंडळाच्या गांधर्व महाविद्यालय, पुणे येथे गायन, वादन आणि नृत्य या कला प्रकारात पूर्णवेळ शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गुरुकुल निवास व्यवस्था उपलब्ध आहे. गेल्या २५ वर्षांपासून ही सुविधा दिली जात असून, आता होतकरू विद्यार्थ्यांसाठी ‘कमवा व शिका’ योजनाही सुरू करण्यात आली आहे. ग्रामीण भागातून पुण्यात येऊन संगीत क्षेत्रात बी.ए. किंवा एम.ए. शिक्षण घेऊ…

Read More

माझी सुरक्षा आणि गाड्या काढून घ्या:सुप्रिया सुळेंची सरकारकडे मागणी, आर्थिक अन् ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

देशासमोर सध्या निर्माण झालेले भीषण आर्थिक आणि ऊर्जा संकट पाहता, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक अत्यंत महत्त्वाचे आणि कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. आपल्या सुरक्षेसाठी शासनाकडून देण्यात आलेला पोलीस बंदोबस्त आणि शासकीय वाहने तातडीने काढून घेण्यात यावीत, असे आवाहन त्यांनी राज्य सरकारला केले आहे. यासंदर्भात त्यांनी प्रशासनाला अधिकृत आवाहन केले असून,…

Read More

उल्हासनगरमध्ये महिलेला विवस्त्र करून काढली धिंड:केस कापून घातला चपलांचा हार; मंदिरात प्रवेशाच्या वादातून अमानुष कृत्य

ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका महिलेला बेदम मारहाण करून, तिचे केस कापून आणि चपलांचा हार घालून विवस्त्र अवस्थेत तिची धिंड काढण्यात आली. या अमानुष अत्याचाराचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने पावले उचलत तीन आरोपींना अटक केली आहे. हा सर्व प्रकार मंदिरात प्रवेश करण्याच्या…

Read More

पत्नी, दोन मुलांना हार अर्पण करत आत्महत्या:कुटुंबाचे अडीच वर्षांपूर्वी झाले होते निधन; कोल्हापुरात एकाने नैराश्यातून उचलले टोकाचे पाऊल

अडीच वर्षांपूर्वी झालेल्या एका अपघातात पत्नी व दोन मुलांना गमावलेल्या एका व्यक्तीने अपघातस्थळी आपल्या पत्नी व मुलांना हार अर्पण करत विष प्राशन करून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना कोल्हापुरात घडली आहे. या व्यक्तीचा मृतदेह काल सडलेल्या स्थितीत आढळला. विराट विठ्ठललाल गौतम (58) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते पुण्याच्या मांजरी बुद्रुक परिसरातील रहिवासी होते. त्यांची…

Read More

सरकारकडून ओबीसींच्या हक्कांना नख:राखीव प्रवर्गातील तरुणांना खुल्या प्रवर्गाच्या गुणवत्तेतून बाहेर काढण्याचा कट – विजय वडेट्टीवार

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर ओबीसींच्या हक्कांना नख लावल्याचा आरोप केला आहे. राखीव प्रवर्गातील तरुणांना खुल्या प्रवर्गाच्या गुणवत्तेतून बाहेर काढण्याचा कट महायुती सरकारने केला आहे. याद्वारे सरकारने ओबीसींच्या हक्कांनाच नख लावले आहे, असे ते म्हणालेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारने राखीव प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या उमेदवारांना निवडीनंतर खुल्या प्रवर्गातील जागांवर दावा करता येणार…

Read More

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी:राज्यात बियाण्यांबाबत तक्रारीसाठी आयुक्तालय स्तरावर नियंत्रण कक्ष, तक्रारी करता येणार

राज्यात कृषी निवीष्ठांबाबत तक्रारीसाठी कृषी आयुक्तालयस्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून या ठिकाणी शेतकऱ्यांना व्हॉटस्‌अप द्वारे किंवा टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून तक्रार नोंदविता येणार असल्याचे कृषी आयुक्तालयाच्या सुत्रांनी सांगितले. राज्यात आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांची तयारी सुरु झाली आहे. सध्या शेतात मशागतीचे काम पूर्ण करण्यात आले असून काही ठिकाणी शेतकऱ्यांकडून खाताची तसेच बियाणांची खरेदी…

Read More

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडतंय काय?:दिल्लीत तटकरे – पटेल गटाच्या ब्रिजमोहन श्रीवास्तव यांना कार्यालयात रोखले; समज दिल्याचीही चर्चा

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या ज्येष्ठ नेते सुनील तटकरे व प्रफुल्ल पटेल यांना साईडलाईन करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. त्यातच आज या दोन्ही नेत्यांच्या एका जवळच्या नेत्याला दिल्लीतील राष्ट्रवादीच्या कार्यालयात रोखून धरण्यात आल्याची घटना घडली आहे. या नेत्याला पक्षाविषयी गैरसमज न पसरवण्याची कथित तंबीही देण्यात आल्याचीही माहिती आहे. या घटनाक्रमामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याची चर्चा…

Read More

ओला, उबर, रॅपिडोवर महाराष्ट्र सरकारची धडक कारवाई:बेकायदेशीर सेवांवर सरकारचा घाव; वाहतूक नियमांचे उल्लंघन महागात

महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या बाईक टॅक्सी सेवांविरोधात राज्य सरकारने मोठी कारवाई सुरू केली आहे. ओला, उबर आणि रॅपिडो या लोकप्रिय कंपन्यांची मोबाईल अॅप्स गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल अॅप स्टोअरवरून हटवण्याचे आदेश महाराष्ट्र सायबर विभागाने दिले आहेत. राज्याच्या इलेक्ट्रिक वाहन धोरणाचे उल्लंघन, वारंवार दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष आणि प्रवाशांच्या सुरक्षेबाबत गंभीर त्रुटी आढळल्याने सरकारने हे कठोर…

Read More