बकरी ईदपूर्वी गोवंशाचे टॅगिंग आवश्यक:जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचे यंत्रणांना निर्देश, शहरात आठ ठिकाणी चेकपोस्ट
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गोवंशाची कत्तल रोखण्यासाठी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. पशूसंवर्धन विभागाने प्राण्यांचे टॅगिंग करावे आणि महापालिका स्तरावर याबाबत जनजागृती करावी, असे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी कार्यालयात नुकत्याच झालेल्या प्राणीक्लेश समितीच्या बैठकीत हे निर्देश देण्यात आले. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक निकेतन कदम, पोलिस उपायुक्त गणेश शिंदे आणि पशूसंवर्धन उपायुक्त डॉ. संजय…