Headlines

श्रीगोंदेत चारित्र्याच्या संशयावरून अल्पवयीन प्रेयसीची निर्घृण हत्या, मृतदेह जाळला:पुरावा नष्ट करण्यासाठी बापानेही केली मदत, तिघांवर गुन्हा

श्रीगोंदेत एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीची तिच्याच 24 वर्षीय प्रियकराने चारित्र्याच्या संशयावरून निर्घृण हत्या केली. इतकेच नव्हे, तर या गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपीने आपल्या बापाच्या मदतीने तिचा मृतदेह जंगलात नेऊन पेट्रोल टाकून जाळला. या प्रकरणी श्रीगोंदे पोलिसांनी मुख्य आरोपी शुभम सुखदेव ओहळ आणि त्याला मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास मदत करणारे त्याचे वडील सुखदेव ओहळ या…

Read More

घाटी रक्तपेढीचा राष्ट्रीय पातळीवर गौरव:अहमदाबाद येथील परिषदेत उत्कृष्ट कार्यासाठी सन्मानित

छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) अंतर्गत असलेल्या प्रादेशिक रक्तपेढीने राष्ट्रीय स्तरावर महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. अहमदाबाद येथे १६ जून २०२६ रोजी आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवी संस्था परिषदेत देशभरातील शासकीय रक्तपेढ्यांमध्ये या रक्तपेढीला गौरवण्यात आले. वर्ष २०२५ मधील उत्कृष्ट कार्यक्षमता, दर्जेदार सेवा आणि स्वेच्छा रक्तदान चळवळीचा प्रभावी प्रसार या योगदानासाठी हा सन्मान प्रदान…

Read More

अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाविरोधात 59 जातींचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा:आरक्षण संपवण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप; शासनाविरोधात तीव्र रोष व्यक्त

अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात ५९ जातींच्या नागरिकांनी आज, बुधवारी अमरावतीत तीव्र रोष व्यक्त केला. आरक्षण संपवण्याचे षडयंत्र हाणून पाडण्याचा निर्धार करत जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. या संयुक्त महामोर्चाचे नेतृत्व खासदार बळवंतराव वानखडे, विद्यापीठ ऑफीसर्स फोरमचे डॉ. नितीन कोळी, रविकांत गवई, सुधाकर तलवारे, रमेश कटके, प्रा. जगदीश गोवर्धन, प्रा. बंडू गवई आणि नयन मोंढे…

Read More

शेतकरी विकास मंचाचे मुख्यमंत्र्यांना सरसकट कर्जमाफीसाठी निवेदन:योजनेतील अटींमुळे सर्व शेतकऱ्यांना लाभ नाही, आरोप

राज्य शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ मधील निकषांमुळे सर्व शेतकऱ्यांना अपेक्षित लाभ मिळणार नसल्याचा आरोप करत, शेतकरी विकास मंचने चांदूर बाजारच्या तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले आहे. यामध्ये सरसकट कर्जमाफीची मागणी करण्यात आली आहे. निवडणूक काळात सरकारने शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र,…

Read More

पार्वतीनगर 'डक फूट बेन्ड' दुरुस्ती अंतिम टप्प्यात:आज सकाळी चाचणी, उद्यापासून पाणीपुरवठा पूर्ववत

अमरावती येथील पार्वतीनगर परिसरातील नागरिकांना लवकरच पाणीपुरवठा पूर्ववत होणार आहे. जलकुंभाच्या ‘डक फूट बेन्ड’ दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात असून, आज (गुरुवारी) काही प्रमाणात तर उद्या (शुक्रवारी) पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा केला जाईल, अशी माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (मजीप्रा) अधिकाऱ्यांनी दिली. गेल्या दोन दिवसांपासून ‘डक फूट बेन्ड’ला गळती लागल्यामुळे या भागातील पाणीपुरवठा खंडित झाला होता. दुरुस्तीचे काम…

Read More

तुकाराम मुंढे यांची बदली करू नका:चांदूर बाजार काँग्रेसची तीन वर्षांसाठी मागणी

अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची पुढील तीन वर्षे बदली करू नये, अशी मागणी चांदूर बाजार तालुका ग्रामीण काँग्रेसने केली आहे. या संदर्भात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून राज्यभरात गुटखा माफिया, भेसळखोर आणि बनावट औषधी रॅकेटविरोधात धडक कारवाया केल्या आहेत. दूध, पनीर, खवा आणि इतर खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांवरही त्यांनी…

Read More

कळमेश्वर-ब्राह्मणी नगरपरिषद कार्यालयाला भीषण आग:शॉर्टसर्किटमुळे दप्तर जळून खाक, लाखो रुपयांचे नुकसान; सखोल चौकशीची मागणी

नागपूर येथील कळमेश्वर-ब्राह्मणी नगरपरिषद कार्यालयाला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. यात नगराध्यक्षांचे केबिन, संगणक, फर्निचर आणि महत्त्वाचे दस्तावेज जळून खाक झाले असून, लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ऐन पावसाळ्याच्या सुरुवातीला लागलेल्या या आगीमुळे शहरात उलट-सुलट चर्चा सुरू झाली असून, नागरिकांकडून सखोल चौकशीची मागणी होत आहे. पहाटे कार्यालयातून धूर निघत असल्याचे रात्रपाळीतील कर्मचारी गुंडेराव कुमरे यांच्या निदर्शनास…

Read More

देवांशने 44 सेकंदात 24 देशांची चलने ओळखली:लाखांदूरच्या देवांशची 'इंडिया वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नोंद

भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथील देवांश शिवशंकर कलंत्री याने डोळे बंद करून ४४ सेकंदात जगातील २४ देशांची चलने अचूक ओळखण्याचा विक्रम केला आहे. या कामगिरीमुळे त्याची ‘इंडिया वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली आहे. देवांशने ‘मिड ब्रेन ॲक्टिव्हेशन’ तंत्राचा वापर करून हे कौशल्य आत्मसात केले. डोळ्यांवर पट्टी बांधलेली असतानाही, समोर ठेवलेली विविध देशांची नाणी आणि नोटा तो अचूकपणे…

Read More

ऑपरेशन टायगरवर ओमराजे निंबाळकरांची पहिली प्रतिक्रिया:म्हणाले- मी पुण्यातच, दिल्लीला गेलो नाही; पक्षाकडून व्हीप जारी

शिवसेना ठाकरे गटातील ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा आता दिल्लीपर्यंत पोहोचली असून, यात धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे नाव समोर आल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. निवडणुकीच्या काळात कोणत्याही परिस्थितीत उद्धव ठाकरेंसोबत शेवटपर्यंत राहण्याच्या आणाभाका घेणाऱ्या ओमराजेंचे नाव या संभाव्य पक्षांतराच्या चर्चेत आल्यामुळे, त्यांचे जुने व्हिडीओ व्हायरल करत त्यांना राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जात आहे….

Read More

पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही:केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही; चर्चांना आणि अफवांना अखेर पूर्णविराम

ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून या विभागाला टाळे लागणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. आता खुद्द केंद्रीय मंत्र्यांनीच यावर स्पष्टीकरण दिल्याने वृत्त विभाग बंद होण्याच्या सर्व अफवा आणि चर्चांना कायमचा…

Read More