Headlines

पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही:केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही; चर्चांना आणि अफवांना अखेर पूर्णविराम

ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून या विभागाला टाळे लागणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. आता खुद्द केंद्रीय मंत्र्यांनीच यावर स्पष्टीकरण दिल्याने वृत्त विभाग बंद होण्याच्या सर्व अफवा आणि चर्चांना कायमचा…

Read More

डॉ. शिकारपूर यांच्या AI पुस्तकाच्या ब्रेल, ऑडिओ आवृत्तीचे प्रकाशन:डॉ. गोसावी म्हणाले; AI तंत्रज्ञान प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावे

ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांच्या कृत्रिम बुद्धिमत्तेवरील (AI) पुस्तकाच्या ब्रेल आणि ध्वनिमुद्रित (ऑडिओ) आवृत्तीचे प्रकाशन नुकतेच करण्यात आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते हे प्रकाशन झाले. यावेळी डॉ. गोसावी यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता हे भविष्य घडविणारे तंत्रज्ञान असून त्याचे ज्ञान समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. या…

Read More

कुराश असोसिएशनची मानवाधिकार संस्थेविरोधात तक्रार:खेळाडूंच्या हितासाठी आक्रमक भूमिका; धायगुडेंवर बदनामीचा आरोप

कुराश असोसिएशन महाराष्ट्राने मानवाधिकार संरक्षण आणि जागरूकता संस्थेविरोधात अधिकृत तक्रार दाखल केली आहे. संबंधित संस्थेकडून कुराश खेळ, खेळाडू, क्रीडा प्रमाणपत्रे, खेळाडू आरक्षण आणि पोलीस भरती प्रक्रियेशी संबंधित विषयांमध्ये सातत्याने हस्तक्षेप करून विविध शासकीय विभागांकडे तक्रारी करण्यात आल्याचा आरोप असोसिएशनने केला आहे. ही तक्रार धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य तसेच पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय यांच्याकडे करण्यात…

Read More

पुणे परिषदेत 20 लाख महिलांना सक्षम करण्याचा निर्धार:संयुक्त राष्ट्रसंघाने 2026 'आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष' घोषित केले

पुण्यात नुकत्याच झालेल्या एका गोलमेज परिषदेत कृषी मूल्यसाखळीत २० लाख महिलांना सक्षम करण्याचा निर्धार करण्यात आला. कोर्टेवा ॲग्रिसायन्सतर्फे आयोजित या परिषदेला संयुक्त राष्ट्रसंघाने २०२६ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष’ म्हणून घोषित केल्याने विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. भारताच्या कृषी अर्थव्यवस्थेत महिलांचा सहभाग केवळ मजूर म्हणून न राहता त्यांना नेतृत्वाची संधी देण्याची गरज या परिषदेत…

Read More

शिवाजीनगरमधील हॉटेलमध्ये देहविक्रीचा पर्दाफाश:परदेशी तरुणीसह तिघी ताब्यात, दोन दलालांविरुद्ध गुन्हा दाखल

शिवाजीनगर भागातील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या देहविक्रीचा प्रकार गुन्हे शाखेने उघडकीस आणला आहे. पोलिसांनी छापा टाकून परदेशी तरुणीसह एकूण तीन महिलांना ताब्यात घेतले. या प्रकरणी दोन दलालांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंध विभागाला (एएचटीयू युनिट) शिवाजीनगरमधील एसटी स्थानक परिसरात एका हॉटेलमध्ये देहविक्री सुरू असल्याची माहिती मिळाली होती. या…

Read More

हिंगोली लोकसभेवर पुन्हा गद्दारीचा शिक्का?:नागेश आष्टीकरांच्या निर्णयाने विलास गुंडेवारांची आठवण ताजी

हिंगोली लोकसभा मतदार संघाचे ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या पक्ष सोडण्याच्या निर्णयामुळे हिंगोली लोकसभेवर दुसऱ्यांदा गद्दारीचा शिक्का बसणार आहे. यापुर्वी तत्कालीन खासदार विलास गुंडेवार यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. हिंगोली लोकसभा मतदार संघात हिंगोली जिल्हयातील वसमत, हिंगोली, कळमनुरी विधानसभा मतदार संघासह नांदेड जिल्हयातील हदगाव, किनवट तर यवतमाळ जिल्हयातील उमरखेड…

Read More

पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही:केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची मोठी ग्वाही, मुरलीधर मोहोळांच्या पाठपुराव्याला यश

पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय रेल्वे, माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री तथा पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी यासंदर्भात वैष्णव यांची भेट घेऊन पाठपुरावा केला होता. या घोषणेमुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. मंत्री अश्विनी वैष्णव…

Read More

खासदारांचा अपमान आणि शिवीगाळ चुकीची:संजय राऊतांवर शिरसाटांचा पलटवार, म्हणाले- नाराजी आजची नाही

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील संभाव्य बंडाच्या चर्चांदरम्यान खासदार संजय राऊत यांनी संशयित बंडखोर खासदारांवर केलेल्या टीकेनंतर आता शिंदे गटाने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी राऊतांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत, खासदारांना शिवीगाळ करणे आणि त्यांचा अपमान करणे योग्य नसल्याचे म्हटले आहे. माध्यमांशी बोलताना संजय शिरसाट म्हणाले, तुम्ही पाहिलंच असेल की संजय…

Read More

मुंबईतील पांढऱ्या पट्ट्यांचा वाद चिघळला:‘गांधीगिरी नाही, गोडसेंची गोळी चालणार- जैनमुनी नीलेशचंद्र

मुंबईत सध्या ‘पांढऱ्या पट्टी’चा वाद चिघळल्याचे पाहायला मिळत आहे. जैन समाजातील काही बांधवांनी जैन मुनींसाठी अनेक सोसायट्यांत तसेच फूटपाथवर पांढरे पट्टे रंगवले आहेत. यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र आक्षेप घेतला आहे. त्यात आता जैन धर्मगुरू नीलेशचंद्र यांचा एक वादग्रस्त विधानाचा व्हिडिओ समोर आला आहे. यात त्यांनी ‘आता गांधींची गांधीगिरी नाही, तर गोडसेंची गोळी चालणार’, असे…

Read More

डॉ. सुधा कांकरिया यांना मराठी नाट्य परिषदेचा विशेष पुरस्कार:सांस्कृतिक मंत्री शेलार‎यांच्या हस्ते गौरव‎

बालरंगभूमीवर गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ सातत्याने आपल्या सेवाकार्याद्वारे अमूल्य योगदान देणाऱ्या अहिल्यानगर येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सौ. सुधा प्रकाश कांकरिया यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुंबईत आयोजित एका भव्य सोहळ्यात महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते त्यांना हा मानाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मानपत्र, सन्मानचिन्ह आणि…

Read More