Headlines

'ऑपरेशन टायगर'मध्ये ट्विस्ट! ओमराजेंची माघार की रणनीती?:"कोणत्याही बैठकीला जाणार नाही", ठाकरे गटातील खळबळ आणखी वाढली

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील कथित ‘ऑपरेशन टायगर’मुळे राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू असतानाच धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. ठाकरे गटातील सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असून स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या हालचाली सुरू असल्याच्या चर्चेदरम्यान, ओमराजे यांनी आपण अद्याप कोणताही राजकीय निर्णय घेतलेला नसल्याचे स्पष्ट…

Read More

पुण्यात 'शिवशाही पॅलेस' हॉटेलवर गुन्हे शाखेचा छापा:वेश्या व्यवसायातून महिलेची सुटका, चालक-मालकावर गुन्हा दाखल

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-7 ने खराडी येथील ‘हॉटेल शिवशाही पॅलेस’वर छापा टाकून हायप्रोफाईल वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली असून, लॉज चालक आणि मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडी येथील डाऊन टाऊन रोडवरील पराशर हौसिंग सोसायटीमध्ये असलेल्या ‘हॉटेल शिवशाही पॅलेस’मध्ये वेश्या व्यवसाय सुरू…

Read More

आरोग्य शिबिरात महिलांची विक्रमी उपस्थिती:गरजू रुग्णांसाठी दिलासा, म.हो.फि.डॉ. असोसिएशन, संजीवन सोसायटीचा स्तुत्य उपक्रम‎

महाराष्ट्र होमिओ फिमेल डॉक्टर्स असोसिएशन व संजीवन सोशल डेव्हलपमेंट सोसायटी, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी १४ रोजी महादेव खोरी भागातील प्रभू येशू प्रार्थना भवन (रोही चर्च) येथे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विशेषत: महिलांचा या शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळाला. एमएचएफडीए संस्थापक अध्यक्षा…

Read More

माँ जिजाऊ चरणी ठेवला कर्जमाफीचा शासन निर्णय:मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न‎‎

शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी बुधवारी १७ जून रोजी राजमाता जिजाऊंच्या चरणी कर्जमाफीच्या शासन निर्णयाची प्रत ठेवली. सरकारला शेतकऱ्यांच्या वेदना समजाव्यात आणि न्याय देण्याची सद्बुद्धी मिळावी, असे साकडे यावेळी शेतकऱ्यांनी घातले आहे. राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, कर्जमाफीच्या शासन निर्णयामुळे अनेक शेतकरी वंचित राहिले आहेत. जिल्ह्यासह अनेक भागांत अतिवृष्टीमुळे पिकांचे…

Read More

नोव्हेंबरपासून सिंहस्थ गुरु दोषामुळे शुभ कार्याला ब्रेक:23 जानेवारी 2017 पर्यंत विवाह नाहीत‎

३१ ऑक्टोबर रोजी देवगुरू बृहस्पतीचा सिंह राशीत प्रवेश होत असल्याने शहरात ‘सिंहस्थ गुरु दोष’ लागणार आहे. या दोषामुळे नोव्हेंबर २०२६ पासून २३ जानेवारी २०२७ पर्यंत विवाह, वास्तूपूजन, भूमीपूजन, नवीन कामांचा शुभारंभ, मुंडन, यज्ञोपवीत व व्रत उद्यापन यासारखी सर्व शुभ कार्ये वर्ज्य राहणार असल्याचे अकोला पुरोहित संघाचे म्हणणे आहे. श्री बालाजी मंदिरात पुरोहित संघाची सभा आयोजित…

Read More

वेतनच मिळाले नाही; प्रभाग क्रमांक 1 मधील स्वच्छता कर्मचारी संपावर:17 जून उजाडली तरीही अनेक कर्मचारी वंचित‎

प्रभाग क्रमांक १ मध्ये कंत्राटदार कंपनीकडे कार्यरत असलेल्या अनेक स्वच्छता कर्मचाऱ्यांना मे महिन्याचे वेतन अजूनही न मिळाल्याने संतप्त कर्मचाऱ्यांनी बुधवारी (दि. १७) सकाळी कामबंद आंदोलन केले. वेतनाच्या प्रश्नाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत कर्मचाऱ्यांनी कामावर हजर होऊन प्रत्यक्ष काम करण्यास नकार दिला. प्रभाग क्रमांक १ मध्ये कोणार्क कंपनीचे सुमारे ७० स्वच्छता कर्मचारी कार्यरत आहेत….

Read More

विद्यार्थ्यांना डायल 112, सायबर सुरक्षेचे धडे‎:पैठणला पोलिस निरीक्षक महादेव गोमारे यांनी विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन

पैठण नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याबरोबरच पोलिसांविषयी मैत्रीपूर्ण भावना रुजविण्याच्या उद्देशाने पैठण पोलिसांनी पोलिस निरीक्षक महादेव गोमारे यांच्या मार्गदर्शनाखाली अनोखा उपक्रम राबविला. महाराष्ट्र शासनाच्या ‘शाळा प्रवेशोत्सव २०२६’ अंतर्गत सोमवारी पैठण ठाण्याच्या हद्दीतील विविध शाळांमध्ये पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी पोलिस निरीक्षक महादेव गोमारे यांनी डायल ११२ व…

Read More

सफाई कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन तत्काळ द्या‎:सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ आहिरे यांचा बेमुदत उपोषणाचा इशारा, नगरपरिषद प्रशासनाला निवेदन

चांदवड नगरपरिषदेत कार्यरत असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांना मागील दोन ते तीन महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याचा दावा सामाजीक कार्यकर्ते राजाभाऊ आहिरे यांनी केला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन पुढील पाच दिवसांत न दि . नगरपरिषद प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ऊन-वारा-पाऊस असताना देखील सफाई कर्मचारी प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडतात. मात्र, या…

Read More

पळसवाडीत शेतकऱ्यांनी स्वखर्चातून उभारला शेताकडे जाण्यासाठीचा रस्ता:प्रशासन, लोकप्रतिनिधींकडून प्रतिसाद नसल्याने शेतकऱ्यांनी घेतला पुढाकार‎

खुलताबाद तालुक्यातील पळसवाडी गावातील शेतकऱ्यांनी शेतात जाण्यासाठी पक्का रस्ता मिळावा म्हणून गेली अनेक वर्षे प्रशासन, आमदार-खासदारांकडे मागणी केली. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांनी अखेर स्वावलंबनाचा मार्ग निवडत कोणत्याही लोकप् . पळसवाडीतील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी आणि पिकवलेला माल बाजारात नेण्यासाठी वर्षानुवर्षे बिकट वाट तुडवावी लागत होती. पावसाळ्यात हा रस्ता पूर्णपणे चिखलमय होऊन वाहतूक ठप्प…

Read More

रोटेगाव एमआयडीसीचे 2 फलक संतप्त शेतकऱ्यांनी उखडून फेकले:संपादित जमिनींचा पूर्ण मोबदला मिळालेला नसल्याने विरोध

रोटेगाव औद्योगिक वसाहतीच्या उभारणीला वेग देण्यासाठी एमआयडीसीने भूखंड नोंदणी व मोजणीची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार मोजणीसाठी नुकतेच मुंबईतील एमआयडीसीचे अधिकारी परिसरात दाखल झाले असता प्रकल्पग्रस्त शेतकरी जमा झाले. या वेळी दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर अधिकाऱ्यांना माघारी फिरावे लागले असून शेतकऱ्यांनी रात्री एक महिन्यापूर्वी उभारलेले एमआयडीसीचे दोन फलक उखडून फेकले आहेत. १९९३ मध्ये…

Read More