Headlines

अचलपूर व्हिडिओ प्रकरण:त्या नराधमाला जन्मठेपच झाली पाहिजे, कारवाई अशी करा की पुन्हा कोणी धाडस करणार नाही- रवी राणा

अचलपूर आणि परतवाडा परिसरात मुलींचे आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवत आमदार रवी राणा यांनी संताप व्यक्त केला असून आरोपीला कठोर जन्मठेपेची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. तर लव्ह जिहाद करणाऱ्या आमच्या हिंदू मुलींना फसवून व्हिडिओ काढले अशा विकृतीला वेळ आली तर आमच्या ताब्यात द्यावे…

Read More

अमरावती लैंगिक शोषण प्रकरण, 180 तरुणी, 350 व्हिडिओ:4 अटकेत, 21 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी; एमआयएमचा पदाधिकारी असल्याचा दावा

परतवाडा शहरात तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून लैंगिक शोषण आणि त्यानंतर ब्लॅकमेल केल्याच्या गंभीर प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत आतापर्यंत चार आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणात सुरुवातीला मोहम्मद अयाज मोहम्मद तनवीर याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे उजेर खान इकबाल खान, तरबेज खान तस्लिम खान आणि मोहम्मद साद मोहम्मद सादिक या…

Read More

आयटीआय प्रशिक्षण संस्थेत विभागात प्रथम:मुंबई येथे आयोजित समारंभात उद्योजकता मंत्र्यांच्या हस्ते देण्यात आले पारितोषिक

उत्कृष्ट औद्योगिक प्रशिक्षण संस्था पुरस्कार सोहळ्यात अकोला येथील डॉ. आनंदीबाई जोशी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला (महिला) अमरावती विभागातून प्रथम पारितोषिक मिळाले आहे. हा सोहळा मध्यवर्ती सभागृह, एलफिन्स्टन तांत्रिक विद्यालय मुंबई येथे पार पडला. प्रास्ताविक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सतीश सूर्यवंशी यांनी करत राज्यातील आयटीआयची प्रगती व कौशल्य विकासाचे महत्त्व अधोरेखित केले. सोहळ्यात कौशल्य,…

Read More

Backward class community provided security in all areas

संत रोहिदास महाराज मंदिराच्या प्रांगणात चर्मकार सेवा समितीच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. . मागासवर्गीय समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण, सामाजिक न्याय, राजकीय हक्क आणि आर्थिक सक्षमीकरण या सर्वच क्षेत्रात भक्कम सुरक्षा दिली. त्यांच्या विचारांमुळेच आज समाजातील वंचित घटक सक्षमपणे उभे राहत आहेत,…

Read More

मुंबईत बीकेसी मेट्रो साइटवर मोठा अपघात:गर्डर कोसळला, क्रेन उलटली; लोकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा ठाकरे गटाचा आरोप

वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) परिसरातील मेट्रो प्रकल्पाच्या कामादरम्यान बुधवारी पहाटे एक गंभीर अपघात घडला. पहाटे सुमारे चारच्या सुमारास ही घटना घडली. मेट्रोच्या पिलरवर महाकाय गर्डर बसवण्याचे काम सुरू असताना अचानक संतुलन बिघडले आणि मोठा बीम खाली कोसळला. या घटनेत बीम उचलण्यासाठी वापरण्यात आलेली अवजड मोबाईल क्रेनही उलटली. मात्र, सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनास्थळी…

Read More

मिरवणुका, पथनाट्य, स्वरांजली, व्याख्यानाने दणाणला इर्विन चौक:डाॅ. बाबासाहेबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी अनुयायांची रिघ‎

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी, १४ एप्रिलला येथील इर्विन चौक अक्षरश: दणाणून गेला. सोमवारच्या मध्यरात्रीपासूनच येथे मिरवणुका, पथनाट्य, स्वरांजली आणि महापुरुषांच्या जयघोषाचा गजर सुरू होता. दिवसभरात अनुयायांसह नागरिकांनी डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याचरणी नतमस्तक होऊन महामानवाला अभिवादन केले. गेल्या १५ वर्षांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा सौंदर्यीकरण समितीतर्फे येथे मुख्य सोहळ्याचे आयोजन केले जाते. त्यानुसार…

Read More

कामाच्या जोरावरच निवडणुका जिंका, ठाकरे यांचा नगराध्यक्षा भिसेंना सल्ला:कुर्डुवाडीची सत्ता राखल्याबद्दल डिकोळेंसह कार्यकर्त्यांचे मातोश्रीवर कौतुक‎

कुर्डूवाडी नगर परिषदेवर पुन्हा एकदा भगवा फडकवल्यानंतर नगराध्यक्षा जयश्री भिसे आणि जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे यांनी पहिल्यांदाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’ निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी ठाकरेंनी कुर्डूवाडीत सत्ता राखल्याबद्दल पदाधिकाऱ्यांचे कौतुक करत आगामी काळासाठी ‘कामाच्या जोरावर निवडणूक जिंकण्याचा’ मोलाचा सल्ला दिला. केवळ विजयाचे अभिनंदन करून न थांबता, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माढा…

Read More

उन्हाळी सुट्ट्यांसाठी पर्यटकांची पावले अहिल्यानगरकडे:भाैगाेलिक-धार्मिक पयर्टनाला प्राधान्य,महिनाभरात 5 लाखांहून अधिक पर्यटक येण्याचा अंदाज‎

एप्रिल आणि मे महिन्याच्या कडक उन्हाळ्यातही अहिल्यानगर जिल्ह्याला पर्यटनाचे वेध लागले आहेत. यंदा शाळा-महाविद्यालयांच् या सुट्ट्यांमुळे जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळांवर पर्यटकांचा ओघ २० ते ३० टक्क्यांनी वाढणार असल्याचे चित्र आहे. महसूल आणि पर्यटन विभा . जिल्ह्यातील भंडारदरा हे उन्हाळ्यासाठी मुख्य आकर्षण ठरत असून, येथील रिसॉर्ट्सचे बुकिंग सध्या ७५ टक्क्यांच्या पुढे गेले आहे. प्रवरा नदीवरील जलाशय…

Read More

आता असेल ‘मराठी’ बाणा तरच मिळणार रिक्षा-टॅक्सीचा परवाना:1 मेपासून रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी सक्ती, असा निर्णय घेणारे महाराष्ट्र देशातील तिसरे राज्य

येत्या १ मे म्हणजेच महाराष्ट्र दिनापासून राज्यातील सर्व रिक्षा आणि टॅक्सीचालकांना मराठी भाषा बोलता, लिहिता येणे सक्तीचे करण्यात आले आहे. मराठी लिहिता-वाचता येणार नाही त्यांचे परवाने थेट रद्द होतील, असे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर केले. मराठी सक्तीचा नियम यापूर्वीही होता. पण चालकाला समज देऊन सोडून दिले जात होते. भाषा सक्तीसाठी परवाना रद्दचा निर्णय घेणारे…

Read More

खरातच्या ‘आर्थिक’ कुंडल्यांची पाेलखाेल:पहाटे 5 पासून ‘तृप्ताबाला’ बंगल्यावर 17 तास सर्च ऑपरेशन; मुंबईच्या पथकाकडून कागदपत्रांची तपासणी

लैंगिक अत्याचार प्रकरणात सध्या अटकेत असलेल्या भोंदू अशोक खरातच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. खरातची बेहिशोबी मालमत्ता आणि संशयास्पद आर्थिक व्यवहार समोर आल्यानंतर सोमवारी (दि. 13) अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि आयकर विभागाने संयुक्त कारवाई करत नाशिकसह राज्यातील 11 ठिकाणांवर एकाच वेळी छापे टाकले. नाशिकमधील कर्मयोगीनगर येथील खरातचा ‘तृप्ताबाला’ बंगला आणि कॅनडा कॉर्नरमधील ‘ओक्स प्रॉपर्टी’च्या कार्यालयात…

Read More