Headlines

देशमुख यांच्या जाण्याने नगरचा चालता-बोलता इतिहास हरपला:उद्योजक राजगुरू यांनी जागवल्या ज्येष्ठ पत्रकार देशमुख यांच्या आठवणी‎

अहिल्यानगर शहरावर जीवापाड प्रेम करणारे ज्येष्ठ पत्रकार, इतिहास अभ्यासक आणि नगरच्या इतिहासाचे गाढे जाणकार भूषण देशमुख यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने नगरच्या सांस्कृतिक, पत्रकारिता आणि बौद्धिक क्षेत्राची कधीही न भरून निघणारी मोठी हानी झाली आहे. संपूर्ण आयुष्य त्यांनी नगरचा इतिहास सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी समर्पित केले होते. त्यांच्या आठवणींना उजाळा देताना उद्योजक शैलेश राजगुरू यांनी एका प्रसंगाचा…

Read More

मान्सून तळकाेकणात दाखल, दाेन दिवसांत महाराष्ट्र व्यापणार:युरोपीय हवामान संस्थेने इशारा देत केला दावा

देशात मान्सूनची वाटचाल तिसऱ्या दिवशीही सुरूच राहिली. शनिवारी मान्सून गोवा ओलांडून महाराष्ट्रातील किनारपट्टीवरील देवगड शहरात दाखल झाला. दुसरीकडे, आंध्र प्रदेशच्या रायलसीमा भागातील अनंतपूरसह तामिळनाडूच्या चेन्नईमध्येही त्याने धडक दिली. एवढेच नाही, तर ईशान्येतील मिझोराम आणि मणिपूरमध्येही मान्सून पोहोचला आहे. शनिवारी मान्सूनच्या उत्तरेकडील सीमेचे पश्चिम टोक सुमारे १६५ किमी पुढे सरकले, तर पूर्व टोक सुमारे ४५० किमी…

Read More

बेस्ट कर्मचारी 18 जूनपासून बेमुदत संपावर!:थकीत पैशांसाठी 12 कामगार संघटना एकवटल्या; 8 जूनला कामगारांचा विशेष मेळावा

मुंबईत प्रवाशांच्या सेवेसाठी अविरतपणे धावणाऱ्या बेस्टचे आजी-माजी कर्मचारी आता एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असून, प्राप्त माहितीनुसार ते येत्या 18 जूननंतर बेमुदत संपावर जाण्याच्या पावित्र्यात आहेत. बेस्टची वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी रोज हजारो कर्मचारी अथक परिश्रम घेत असतात. मात्र आता याच कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसल्यामुळे मुंबईतील लाखो चाकरमान्यांची आणि दैनंदिन प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याची…

Read More

शिवराज्याभिषेक हाच भारताचापहिला स्वातंत्र्य दिन- संभाजीराजे:लाखो शिवप्रेमी आणि शिवभक्त किल्ले रायगडावर

रायगडावर शनिवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५२ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साहपूर्ण जल्लोष पाहायला मिळाला. देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो शिवप्रेमी आणि शिवभक्त रायगडावर दाखल झाल्याने संपूर्ण परिसर शिवमय झाला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने गड दुमदुमून गेला असून विविध सांस्कृतिक आणि ऐतिहासिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. दरवर्षी संभाजीराजे छत्रपती रायगडावर उपस्थित राहून शिवभक्तांना संबोधित करतात. यंदाही त्यांनी भावनिक…

Read More

‘आनंद तीर्थ-समवशरण’ भूमीवर क्षेत्र विशुद्धी विधी:उपाध्याय प्रवर प्रवीण ऋषीजी महाराजांच्या सान्निध्यात रंगणार सोहळा‎

महाराष्ट्र प्रवर्तक कुंदन ऋषीजी यांच्या सान्निध्यात, अर्हम विज्जा प्रणेते उपाध्याय प्रवर परमपूज्य प्रवीण ऋषीजी यांचा २०२६ मध्ये होणारा ‘समर्पण – सर्व कल्याण’ शिखर चातुर्मास सोहळ्याच्या तयारीचा शुभारंभ आनंदधाम परिसरात करण्यात आला. चातुर्मासासाठी उभारण्यात येणार असलेल्या ‘आनंद तीर्थ-समवशरण’ या मुख्य प्रवचन स्थळाच्या भूमीवर जैन परंपरेनुसार ‘क्षेत्र विशुद्धी’ हा मंगल विधी उत्साहात व भाविक वातावरणात झाला. हा…

Read More

पाथर्डीतील गोळीबाराची आपबीती सांगताहेत पोलिस अधिकारी:अक्कलकोटमधील सराफ लुटीच्या तपासासाठी पथक‎

एआय इमेज अक्कलकोट तालुक्यातील जेऊर येथे एका सराफास लुटून १० लाखांचे दागिने लंपास केले होते. त्या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी अटक केलेल्या संशयित आरोपीकडून मिळालेल्या माहितीनुसार आम्ही गुरुवारी पाथर्डी येथील खरबंडी गावात त्याच्या वस्तीपर्यंत गेलो होतो. रात्री १०.३७ वाजता आरोपीच्या जवळ गेलो. तो पाईपलाईनसाठी चर खोदत असल्याचे दिसून आले. तो गाफील असेल त्यास आम्ही ताब्यात घेऊ…

Read More

पालखी मार्गावर वृक्षांचा 7 वा वाढदिवस:सेंद्रिय खताचा केक कापून दिला वृक्ष संवर्धनाचा संदेश‎

वृक्षांचे वाढदिवस साजरा करणे काळाची गरज आहे. वृक्ष जगले तरच मानव जात जिवंत राहणार आहे. यासाठी झाडांचा वाढदिवस साजरा करण्याची मंगळवेढ्यातून वारी परिवाराने सुरू केलेली संकल्पना महाराष्ट्रात सुरू झाली पाहिजे, असे प्रतिपादन पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांनी व्यक्त केले. वारी परिवार व विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती यांच्या वतीने शिवाजी महाराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवेढा-पंढरपूर हरित…

Read More

मंत्री जर चुकत असेल तर ठोकल्याशिवाय राहू नका:बच्चू कडूंचे मंत्र्यांसमोरच मोठे विधान, शिवसैनिकांना केले थेट आवाहान

राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत असतानाच, आज गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथे शिवसेनेच्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात मंत्री भरत गोगावले, मंत्री आशिष जयस्वाल आणि आमदार बच्चू कडू यांनी उपस्थित राहून शिवसैनिकांना आगामी राजकीय स्थिती व संघटनात्मक बांधणीबाबत मार्गदर्शन केले. मात्र याचवेळी भाषण करताना, मंत्री जर चुकत असेल तर त्याला ठोकल्याशिवाय…

Read More

उपक्रम:जागतिक पर्यावरण दिनाला वनमजुरांचा सन्मान, वृक्षांना जपणे ही प्रत्येकाची जवाबदारी

‘बिजांपासून रोप तयार करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य वनाधिकारी अन् वनमजूर करत असून त्यांच्या योगदानाचा गौरव व्हावा, यासाठी जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताचे वनमजुरांचा सन्मान करण्यात आला. या वेळी गजानन कोल्हे यांनी वृक्षसंवर्धन ही काळाची गरज असून, प्रत्येकाने या चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले. नगराध्यक्ष रूपाली माथने यांनी, “ज्याप्रमाणे आपण आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची काळजी घेतो, त्याचप्रमाणे वृक्षांनाही…

Read More

मुंबई विमानतळावर डीआरआयची मोठी कारवाई:तस्करीप्रकरणी भाजप नेत्यासह पाच जणांना अटक, 5 कोटी रुपयांचे सोने जप्त

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) सोने तस्करीविरोधात एक मोठी आणि धडक कारवाई केली आहे. या कारवाईत भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) कामगार संघटनेच्या एका महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. डीआरआयने या आरोपींकडून ५ कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचे सोने आणि इतर संशयास्पद मुद्देमाल जप्त केल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार,…

Read More