Headlines

अद्याप तोडगाच नाही; कर्मचाऱ्यांचे आंदोलन:काळ्या फिती लावून काम, उद्यापासून देण्यात येणार धरणे‎

विविध प्रलंबित मागण्यांच्या पुर्ततेसाठी विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीच्यावतीने पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी आंदोलनाला जिल्ह्यात तीव्र स्वरूप प्राप्त झाले आहे. जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांसह विद्यापीठाचे कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाल्याने शैक्षणिक कामकाज विस्कळीत झाले आहे. दरम्यान आगामी सोमवारपासून भोजनावकाशात आपापल्या संस्थेसमोर धरणे, निदर्शने केली जाणार आहेत. शुक्रवार, १४ मेपासून हा लढा सुरु झाला. महासंघाचे अध्यक्ष…

Read More

शेतकऱ्यांनी काढला ट्रॅक्टर महामोर्चा; प्रशासन हादरले:एकरी 300 ते 1 हजारांचा विमा देत फसवणूक; सरकारविरोधी घोषणा‎

तुटपुंजी विमा रक्कम देऊन शेतकऱ्यांची बोळवणूक करण्यात आली असून, एकरी ३०० ते एक हजार रुपयांचा विमा देत फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत शेतकऱ्यांनी शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधींना वेळोवेळी निवेदने दिली. भेटी घेत व्यथा मांडली. तरीही अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे तालुक्यातील संतप्त शेतकऱ्यांनी एकजुटीची वज्रमूठ बांधून शुक्रवारी (दि.१५) ट्रॅक्टर महामोर्चा काढून प्रशासनाला हादरा दिला….

Read More

शेतीच्या शाश्वततेसाठी हवे एकात्मिक प्रयत्न:आ. सावरकर यांचे प्रतिपादन, कृषी विद्यापीठाचा पाणी फाउंडेशनसोबत सामंजस्य करार‎

शेती व ग्रामीण भागाचा विचार करता देशांतर्गत कृषी विद्यापीठे व तत्सम संशोधन संस्थांच्या निरंतर प्रयत्नातून काळसुसंगत फायदेशीर शेती तंत्रज्ञान मुबलक प्रमाणात उपलब्ध असूनही त्याचा अपेक्षित वापर होत नाही. त्यामुळे गावखेड्याकडील शेतकरी विशेषतः युवावर्ग शे . आमदार रणधीर सावरकर म्हणाले की, ग्रामीण भारताच्या उभारणीसाठी शेती ही शाश्वत होणे आवश्यक आहे. ग्रामविकासाशी संबंधित शासकीय, निमशासकीय विभाग, पाणी…

Read More

कुमकुमची आंतरराष्ट्रीयस्तरावर सुवर्ण झेप:वर्ल्ड आर्चरी स्पर्धेत भारतीय महिला रिकर्व्ह संघाने वाजवला डंका‎

चीनमधील शांघाय येथे नुकत्याच पार पडलेल्या जागतिक धनुर्विद्या स्पर्धेत भारतीय महिला रिकर्व्ह संघाने शानदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. या सुवर्ण विजेत्या महिला संघात येथील मणीबाई गुजराती हायस्कुलच्या कुमकुम अनिल मोहोडचाही समावेश आहे. कुमकुमच्या या उल्लेखनीय यशामुळे अमरावती शहरासह शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कुमकुम मोहोड ही मणीबाई गुजराती हायस्कूल आणि जुनियर…

Read More

अक्कलकोट येथे श्री चौडेश्वरी देवीच्या यात्रेला झाली सुरुवात:पारंपरिक ढोल-ताशांचा कडकडाट, हलगीच्या कडक आवाजात मिरवणूक‎

‘श्री चौडेश्वरी माता की जय’ च्या जयजयकाराने व पारंपरिक पद्धतीने ढोल- ताशांच्या प्रचंड कडकडाटाने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही येथील ग्रामदैवत श्री चौडेश्वरी देवीच्या तीन दिवसीय यात्रा महोत्सवास शनिवारी प्रारंभ झाला. हा यात्रोत्सव श्री ष.ब्र. जयग . चतुर्दशीनिमित्त सकाळी कुंभार गल्लीतील श्री चौडेश्वरी मंदिर ते श्री शांतलिंगेश्वर हिरेमठापर्यंत सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर मुख्य मंदिरात सुहासिनींना अत्यंत…

Read More

‘महाराजस्व’ मधून प्रलंबित दाखल्यांचे वाटप‎:पंढरपूर, मंगळवेढा, वैराग, नाझरे महसूल मंडळ विभागात‘महाराजस्व’च्या माध्यमातून सेवेत गतीमानता‎

शासनाच्या योजना थेट नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात आणि प्रशासन व नागरिक यांच्यातील दुवा अधिक सक्षम व्हावा या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान २०२६’ अंतर्गत वैराग येथे शुक्रवारी विशेष शिबिर पार पडले. जिल्हाधिकारी सोलापूर य . या शिबिरास वैराग मंडळातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. यावेळी महसूल विभागाच्या विविध सेवा, प्रमाणपत्रे, नोंदी…

Read More

श्री अगस्ति ऋषी आश्रमात उद्यापासून महिनाभर अधिकमास कीर्तन महोत्सव:ग्रंथपारायण, अन्नदान‎आणि दिग्गज‎कीर्तनकारांची मांदियाळी‎

अकोले तालुक्याचे आराध्यदैवत श्री अगस्ति ऋषी आश्रमात वर्षानुवर्षांच्या परंपरेनुसार रविवारपासून (१७ मे) पुरुषोत्तम (अधिक) मासानिमित्त अखंड महिनाभर कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती अगस्ति देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ॲड.के.डी.धुमाळ यांनी . महोत्सवाचा शुभारंभ रविवारी सकाळी ८:३० वाजता आमदार डॉ. किरण लहामटे, हभप निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर, ज्येष्ठ विश्वस्त बद्रिनाथशेठ मुंदडा व अध्यक्ष धुमाळ यांच्या…

Read More

शेतकरी देतायत सेंद्रिय शेतीला पसंती; शेणखतावर अधिक भर:लासूर स्टेशन येथे शेणखताला मागणी; सहा हजारांत ट्रॉलीभर खत‎

शेतीला पूरक व्यवसाय म्हणून अनेक शेतकरी दूध व्यवसाय करतात. दूध व्यवसायातून मिळणाऱ्या शेणाचा शेतीसाठी खत म्हणून वापर केला जातो. शेतीतील पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून शेतीत रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या खतांच्या बेसुमार वापरामुळे जमिनीतील पोषक घटक नाहीसे होत आहेत. त्यामुळे आता खत वापरूनही उत्पादनात वाढ होत नसल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात येऊ…

Read More

43 लाखांच्या फसवणुकीच्या तक्रारी:नातेवाईकांनाही अडकविण्याचा प्रयत्न, येवला तालुक्यातील महिला तक्रारीसाठी सरसावल्या‎

प्रतिनिधी | लासलगाव विंचूर येथे दिव्यज्योत बहुउद्देशिय संस्थेमार्फत महिंलाना पीठ गिरणी, शिलाई मशीन, वॉशिंग मशीन व फ्रिज देणार असल्याचे सांगून फसवणूक केल्याप्रकरणी लासलगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला. यानंतर ३ दिवसात जवळपास ४३ लाख रुपयांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी लासलगाव पोलिस कार्यालयात दाखल झाले आहेत. निफाड सोडून इतर तालुक्यातील महिला देखील आता तक्रारी दाखल करत आहेत. छोटे…

Read More

2 लाख भाविक ‘भद्रा मारुती’ चरणी लीन:भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती, खुलताबादला दिवसभर ‘जय श्रीराम’ जयघोष‎

शनी अमावास्येच्या पवित्र पर्वानिमित्त खुलताबाद येथील प्रसिद्ध भद्रा मारुती मंदिरात शनिवारी पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. राज्यातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या २ लाख भाविकांनी भद्रा मारुतीचे दर्शन घेत आध्यात्मिक समाधानाचा अनुभव घेतल्याची माहिती संस्थानचे अध्यक्षमिठ्ठु पाटील बारगळ यांनी दिली. शनी अमावास्येला हिंदू धर्मात धार्मिक महत्त्व असल्याने मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. यंदाही पहाटे चार…

Read More