Headlines

बस्त्याला न नेल्याच्या रागातून बापाने लावला चाइल्डलाइनला फोन:पोलिसांनी थेट मांडवात धाव घेऊन रोखला बालविवाह

बालविवाह रोखण्यासाठी सहसा समाजसेवक किंवा जागरूक नागरिक पुढे येतात. मात्र, शहरातील एका नाट्यमय घटनेत चक्क जन्मदात्या बापानेच ‘चाइल्डलाइन’आणि पोलिसांना फोन करून स्वतःच्या अल्पवयीन लेकीचा विवाह उधळून लावला. बापाने हे पाऊल समाजप्रबोधनातून नव्हे, तर लग्नाच्या कपड्यांच्या खरेदीला (बस्त्याला) आपल्याला न नेल्याच्या रागातून आणि दारूच्या नशेत उचलल्याचे समोर आले आहे. संबंधित कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. आई…

Read More

संभाजीनगर जिल्ह्यात गारपीट; नाशिक, जळगावसह अकोला जिल्ह्यात पाऊस:अवकाळीचा तडाखा; राज्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, 6 जूनपर्यंत इशारा

छत्रपती संभाजीनगरसह मुंबई, ठाणे, नाशिक, जळगाव, अकोला जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी पावसाने हजेरी लावली. संभाजीनगर जिल्ह्यासह काही ठिकाणी ढगाळ वातावरण व वादळी पावसासह गारपीट झाली. अनेक ठिकाणी शेतीचे तसेच फळबागांचे नुकसान झाले. छत्रपती संभाजीनगर शहरात सायंकाळनंतर ढग दाटून आले. सोसाट्याचे वारे व धुळीमुळे शहरवासीयांची तारांबळ उडाली. जिल्ह्यातील पैठण, गंगापूर, फुलंब्री, कन्नड तालुक्यात परिसरात सायंकाळी वादळी…

Read More

गडचिरोलीत 20 हजार धूररहित चूल वापर, कार्बन उत्सर्जन थांबले:सुधारित चुलींमुळे घरातील प्रदूषण 100 टक्के थांबले

गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा, एटापल्ली या दुर्गम व आदिवासी तालुक्यांत मोठी आरोग्य- पर्यावरण क्रांती आकाराला आली आहे. या भागात तब्बल २० हजार धुररहित सुधारित चुलींचे वितरण पूर्ण करण्यात आले. यातूनच हे शक्य झाले आहे. क्लीन मॅक्स उर्जित एलएलपी आणि क्लायमेटसेन्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहकार्याने राबविण्यात आलेला हा उपक्रम दुर्गम भागातील आदिवासी कुटुंबांचे जीवनमान उंचावणारा ठरत आहे….

Read More

जायकवाडी धरणात बुडून दोन तरुणांचा मृत्यू:खोलीचा अंदाज चुकला अन् काळाने घातली झडप, सुट्टीचा बेत ठरला जीवघेणा

जायकवाडी धरण परिसरात रविवारी (दि. 31) सायंकाळी एक हृदयद्रावक घटना घडली, धरण पाहण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथून आलेल्या सात मित्रांपैकी दोन विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे अंबिका नगर, मुकुंदवाडी परिसरासह संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंबिका नगर (मुकुंदवाडी) येथील सात युवक रविवारी सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी आणि जायकवाडी धरण परिसर पाहण्यासाठी…

Read More

मधाळ स्वरांच्या 'सुमन' सुगंधाचा शेवट:ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

भारतीय संगीतसृष्टीला आपल्या मधाळ आणि शास्त्रीय सुरांनी सहा दशकांहून अधिक काळ समृद्ध करणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचे आज, ३१ मे २०२६ रोजी मुंबईत दुःखद निधन झाले. वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने भारतीय संगीत क्षेत्रातील एका दैवी आणि सुरेल युगाचा अंत झाला असून, संगीतप्रेमींमध्ये मोठी शोककळा पसरली आहे….

Read More

अनिकेत तटकरेंसाठी युती धर्म पाळा:एकनाथ शिंदेंच्या आपल्या आमदारांना सूचना, कोकण विधान परिषदेची जागा गेली राष्ट्रवादीकडे

विधान परिषदेच्या जागावाटपावरून महायुतीत सुरू असलेला पेच अखेर सुटला असून, प्रतिष्ठेची मानली जाणारी कोकणची जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वाट्याला आली आहे. या निर्णयामुळे शिवसेनेत निर्माण झालेली अस्वस्थता दूर करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः पुढाकार घेतला असून, “युतीधर्म पाळा आणि राष्ट्रवादीच्या उमेदवाराला निवडून आणा,” अशा कडक सूचना आपल्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत….

Read More

बनावट कामगार प्रमाणपत्रे देणारे रडारवर:नागपूर ग्रामीण पोलिसांकडून 2 ऑनलाईन केंद्रांवर छापे

नागपूर ग्रामीण पोलिसांनी बांधकाम कामगारांच्या सरकारी योजनांचा गैरफायदा घेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बनावट प्रमाणपत्रांच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. प्रत्यक्षात बांधकाम क्षेत्रात एकही दिवस काम न केलेल्या व्यक्तींना ‘९० दिवस काम केल्याचे’ खोटे दाखले देऊन शासनाची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी नागपूर ग्रामीण जिल्ह्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या विविध…

Read More

शिरूरमध्ये गावठी दारू अड्ड्यावर छापा:एक अटकेत, 500 लिटर रसायन, 200 लिटर दारू जप्त

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात निमगाव भोगी परिसरात शिरूर एमआयडीसी पोलिसांनी गावठी दारू अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत ५०० लिटर रसायन, २०० लिटर गावठी दारू आणि एक मोटार असा एकूण एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव निलेश गुलाब लोंढे (वय ३४, रा. शेळके…

Read More

देवेंद्रजी हातच्या काकणाला आरसा कशाला?:तुमच्या हव्यासापोटी निर्माण वसुली व्यवस्थेमुळे महाराष्ट्र 'उडता पंजाब' झालाय – राजू शेट्टी

“सत्ता आणि हव्यासापोटी निर्माण झालेल्या वसुली व्यवस्थेमुळे महाराष्ट्र बरबाद होऊन ‘उडता पंजाब’ झाला आहे, हे आता मान्य करा. राज्यात अवैध धंद्यांचा महापूर आला असून गल्लीबोळातील बेकायदा व्यवसायांची यादीच मी तुम्हाला पाठवू शकतो,” अशा जळजळीत शब्दांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागली आहे. सिंधुदुर्ग पोलिसांवर गंभीर आरोप…

Read More

छत्रपती संभाजीनगरची जागा भाजपकडे!:महायुतीचा विधान परिषदेचा फॉर्म्युला ठरला; भाजप 11, शिवसेना 4, तर राष्ट्रवादी 2 जागांवर लढणार

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीतील जागावाटपाचा तिढा अखेर सुटला असून, एकूण 17 जागांचा अंतिम फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे. राज्य आणि केंद्रीय पातळीवरील वरिष्ठ नेत्यांच्या प्रदीर्घ चर्चेनंतर, तसेच मित्रपक्षांमधील रस्सीखेच व दावे-प्रतिदाव्यांनंतर या जागावाटपावर शिक्कामोर्तब झाला आहे. या अंतिम फॉर्म्युलानुसार सर्वाधिक 11 जागांवर भाजप निवडणूक लढवणार आहे, तर शिवसेना शिंदे गटाला 4…

Read More