Headlines

बच्चू कडूंवर उद्धव ठाकरेंचा पहिलाच घणाघात:मंत्री करणं ही माझीच चूक ठरली; प्रहारच्या कार्यकर्त्यांसमोर ठाकरे भडकले, थेट निशाणा

मुंबईत प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशावेळी उद्धव ठाकरे यांनी बच्चू कडूंवर पहिल्यांदाच उघडपणे निशाणा साधला. घरी बोलावून त्याला मंत्री केलं, ही माझी चूक झाली. जे लोभापायी गेलेत, त्यांना जाऊ द्या, अशा शब्दांत ठाकरे यांनी बच्चू कडूंवर तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रहार संघटनेतील सोलापूर, परभणी आणि धाराशिवमधील अनेक कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर हा राजकीय हल्ला…

Read More

यवतमाळ हादरले:फायनान्सच्या वादातून तरुणाचा खून, मुख्य आरोपीसह 4 जण पोलिसांच्या ताब्यात, विदर्भ हाउसिंग सोसायटी परिसरातील घटना

यवतमाळ शहरातील विदर्भ हाउसिंग सोसायटी ‎‎‎परिसरात गुरुवारी ‎‎‎पहाटे साडेसात ‎‎‎वाजेच्या सुमारास ‎‎‎एका तरुणाची ‎‎‎धारदार शस्त्राने‎‎ वार करून निर्घृण ‎‎‎हत्या करण्यात ‎‎‎आली. वाहन ‎‎‎फायनान्सच्या ‎‎पैशांच्या देवाणघेवाणीतून हा‎ रक्तरंजित थरार घडल्याचे समोर‎ आले आहे. सचिन उर्फ येडा राठोड ‎ रा. जामनकर नगर, ‎‎यवतमाळ असे मृत तरुणाचे नाव ‎आहे. यात आधी वाद झाला होता. ‎‎त्यानंतर समेटही घडून आली…

Read More

हिंगोलीत राजकीय भुकंप:माजी समाजकल्याण सभापती मुनीर पटेलांचा शिंदेसेनेत प्रवेश, वसमत, औंढा तालुक्यात पक्षाला बळ मिळणार

काँग्रेस, राष्ट्रवादी पुन्हा काँग्रेस अन राष्ट्रवादी असा राजकिय प्रवास करीत माजी समाज कल्याण सभापती मुनीर पटेल यांनी अखेर शिंदेसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला आहे. गुरुवारी ता. 21 मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार संतोष बांगर यांच्या उपस्थितीत त्यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे शिंदेसेनेला वसमत व औंढा नागनाथ तालुक्यात बळ मिळणार आहे. हिंगोली जिल्हा…

Read More

बनावट कुणबी प्रमाणपत्रांमुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण धोक्यात:महाराष्ट्रात झुंडशाहीच्या जोरावर हुकूमशाही सुरू आहे का? लक्ष्मण हाकेंचा जरांगे पाटलांवर निशाणा

ओबीसी रकाण्यात यापुढे केवळ मराठा कुणबी असणार का? मनोज जरांगे यांच्या सांगण्यावर मराठा कुणबी ओबीसीत आला असेल तर त्यांच्या स्पर्धेत मराठा कुणबी स्पर्धेत टिकू शकत नाही, असे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे. 60 टक्के लोकांच्या हक्काचे संरक्षण करण्यात मुख्यमंत्री फेल झाले आहेत. आमचे अधिकार संपले आहे, यावर कोणताही पक्ष बोलत नाही, आमच्या समाजाला…

Read More

पुण्यात राष्ट्रवादीच नंबर वन, विधान परिषदेच्या जागेवर आमचाच हक्क!:भाजप मित्रपक्षांचा सन्मान राखेल, 30 जूनपूर्वी राज्यातील सर्व शेतकरी बांधवांची होणार कर्जमाफी- दत्तात्रय भरणे

पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक नंबरचा पक्ष आहे.त्यामुळे विधान परिषदेसाठी आमच्याकडे इच्छूकांची संख्या मोठी आहे. या जागेवर आमचाच हक्क आहे. भाजप आणि शिवसेना या बाबत निश्चित योग्य निर्णय घेतील. कोणाला उमेदवारी द्यायची हे ठरलेले नाही पण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार जो निर्णय घेतील तो अंतिम राहील. आजची बैठक ही केवळ पुणे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीची आहे…

Read More

पाळत ठेवून अधिकाऱ्याच्या घरी चोरीचा दुसरा प्रयत्न

राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे वर्ध्याचे गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे यांच्या घरी पुन्हा एकदा पाळत ठेवून चोरीचा प्रयत्न झाला. परंतू, दार न उघडल्याने, चोरट्यांना रिकाम्या हातांनी परतावे लागले. वर्षभरापूर्वी याच ठिकाणी घरफोडी करून तब्बल सात तोळे सोन्याचे दागीने लंपास करण्यात आले होते. या चोरीचाही अद्याप तपास लागला नाही. वांबोरीत पुन्हा एकदा पाळत ठेऊन चोरीचा प्रकार उघडकीस…

Read More

डिझेल टंचाईचा फटका, कांदा लिलाव बेमुदत बंद:लासलगाव व्यापारी असोसिएशनचे बाजार समितीला पत्र, साेमवारपासून निर्णयाची अंमलबजावणी

कांदा व इतर शेतीमाल इतरत्र पाठवण्यासाठी ट्रकचालकांना इंधन उपलब्ध होत नसल्यामुळे बाजार समितीमधील कांदा व धान्याचे लिलाव सोमवार (दि. 25) पासून बेमुदत बंद राहणार आहेत. लिलाव ठप्प झाल्यास कांदा दर आणखी घसरणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. व्यापारी असोसिएशनने सोमवारपासून कांदा आणि धान्य लिलावात सहभागी होणार नसल्याचे पत्र बाजार समितीला दिले आहे. आधीच युद्धाच्या…

Read More

उन्हाळ्यात कोपरगावच्या शेतीला अन् गावाला “निळवंडे’च्या पाण्याने दिलासा:सर्व तलाव, साठवण बंधारे भरू द्या, आमदार काळेंची पालकमंत्र्यांकडे मागणी‎

बहुप्रतीक्षित निळवंडे कालव्यांचे आवर्तन सोडण्यात आले आहे. कोपरगाव तालुक्यातील तळेगाव शाखा कालव्यातून वडझरी पॉईंट, बोडखेवाडी पॉईंट आणि शेख वस्ती पॉईंटमधून सध्या पाणी सुरळीतपणे सुरू आहे. यामुळे तालुक्यातील जिरायती भागातील नागरिकांमध्ये आणि शेतकऱ्यांत स . या पार्श्वभूमीवर, चालू आवर्तनातून कोपरगाव मतदारसंघातील सर्व पाझर तलाव, बंधारे आणि गावतळे पूर्ण क्षमतेने भरून देण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाला द्याव्यात, अशी…

Read More

खा. मोहिते-पाटील बाधित शेतकऱ्यांच्या बांधावर:12 गावांचा कडाडून विरोध, तर समर्थकांचा स्वतंत्र मेळावा, 7 गावांना दिल्या भेटी‎

माळशिरस तालुक्यातील शक्तीपीठ महामार्ग बाधित गावातील शेतकऱ्यांच्या भावना आणि मते जाणून घेण्यासाठी खासदार धैर्यशील मोहिते- पाटील यांनी प्रत्यक्ष गावांना भेटी देत शेतकऱ्यांशी संवाद सुरू केला आहे. माळशिरस तालुक्यातील १२ गावे या महामार्गात बाधित होत असून . खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी गुरुवारी वेळापूर, उघडेवाडी, गारवाड, मगरवाडी, चांदापुरी, तरंगफळ आणि निमगाव आदी गावांमध्ये जाऊन तेथील शेतकऱ्यांच्या भावना…

Read More

सर्वांची योजना-सर्वांचा विकास:पंचायत विकास आराखडा नियोजन प्रक्रिया राज्यस्तरीय ऑनलाइन प्रशिक्षण कार्यशाळा

राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानांतर्गत आज, गुरुवारी जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात “सर्वांची योजना-सर्वांचा विकास” अंतर्गत “पंचायत विकास आराखडा नियोजन प्रक्रिया या विषयावर राज्यस्तरीय ऑनलाइन व्हर्च्युअल प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेत ग्रामपंचायत विकास आराखडा प्रभावीपणे तयार करण्यासाठी आवश्यक विविध बाबींवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये ई-ग्राम स्वराज प्रणाली, पंचायत निर्णय ॲप्सचा वापर, ग्रामपंचायत…

Read More