मुख्यमंत्री महोदयांना टीका सहन होईना:तेव्हा मंदिरे उघडा म्हणणारे आज स्वतःच बंद करतायत, अंबादास दानवेंचा भाजपला टोला
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नेते अंबादास दानवे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सत्ताधारी भाजप आणि महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. कोरोना काळातील एका जुन्या प्रसंगाची आठवण करून देत दानवे यांनी भाजपच्या बदलत्या भूमिकेवर कडाडून टीका केली. नियतीचा फेरा तर पहा, कोरोना काळात ‘मंदिरे उघडा’ म्हणून राज्यपालांचे उंबरठे झिजवणाऱ्यांवरच आज स्वतःहून मंदिरे आणि पर्यटनस्थळे बंद करण्याची…