Headlines

मोदींच्या आवाहनाला फडणवीसांचा प्रतिसाद:वंदे भारतने केला शिर्डी प्रवास; संदेश देण्याचा प्रयत्न, सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीचा अधिक वापर करण्याचे केलेले आवाहन लक्षात घेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबई ते शिर्डीचा प्रवास वंदे भारत एक्सप्रेसने केला. त्यांच्या या प्रवासाची राज्यभरात चर्चा सुरू झाली असून, पर्यावरणपूरक आणि सोयीस्कर प्रवासाला प्राधान्य देण्याचा संदेश त्यांनी दिला…

Read More

होमिओपॅथीच्या विद्यार्थ्यावर भीक मागण्याची वेळ:नांदेडच्या तरुणावर मुंबईत हरवल्याने आली वेळ, पोलिसांच्या संवेदनशीलतेमुळे मायेची ऊब

मुंबईतील मालाड परिसरात भिकाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी सुरू असलेल्या नियमित पोलिस मोहिमेदरम्यान एक हृदयस्पर्शी घटना समोर आली. रस्त्यावर भटकताना आढळलेला एक तरुण प्रत्यक्षात नांदेड जिल्ह्यातील वैद्यकीय शिक्षण घेणारा विद्यार्थी असल्याचे उघड झाले. मानसिक आरोग्याच्या समस्येमुळे कुटुंबापासून दूर गेलेल्या या तरुणाचा मालाड पोलिसांनी शोध घेऊन कुटुंबाशी संपर्क साधला आणि अखेर मालाड पोलिस ठाण्यात भावनिक पुनर्मिलन घडून आले. ही…

Read More

पाणी संकट, शेतीसमोरील आव्हानांसाठी शेतकरी उत्पादक संस्थाच शाश्वत ठरेल:करमाळ्यात वॉटर संस्थेचा दोन दिवसीय एक्सपोजर-संवाद कार्यक्रम उत्साहात‎

बदलते हवामान, पाण्याचे संकट आणि शेतीसमोरील वाढती आव्हाने लक्षात घेता शेतकरी उत्पादक संस्था (एफपीओ) अधिक सक्षम व शाश्वत होण्याची गरज असल्याचा संदेश करमाळ्यात आयोजित दोन दिवसीय एक्सपोजर-संवाद कार्यक्रमातून देण्यात आला आहे. वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट (व . कम्युनिटी आणि इकोसिस्टम रेझिलियन्स उभारण्यात एफपीओंची भूमिका या विषयावर आयोजित या विशेष कार्यक्रमात राज्यातील विविध स्वयंसेवी संस्था, एफपीओ, एफपीसी…

Read More

करमाळा तालुक्यात 52,591 हेक्टरवर खरीप पेरणी:मका, तूर पेरणीत होणार वाढ, पावसाळ्यापूर्वी शेतकऱ्यांची खोल नांगरणीसह मशागतीची कामे वेगाने सुरू‎

करमाळा आगामी खरीप हंगामाच्या अनुषंगाने करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतीची मशागत, खोल नांगरणी आणि बांध-बंदिस्ती दुरुस्तीसह मशागतीची कामे वेगाने सुरू केली आहेत. शेतकरी पावसाळ्यापूर्वी ही कामे उरकून खरिपाच्या पूर्वतयारीला लागला . तालुक्यात रब्बी हंगामातील ज्वारीसह मका आदी पिकांची काढणी आणि मोडणीची कामे झाल्यामुळे शेतकऱ्यांना आता संपूर्णपणे खरीप हंगामाचे वेध लागले आहेत. शेतकऱ्यांकडून सध्या शेतजमिनीची…

Read More

पाणी पेटले!‎:उमरी, गुडधीवासीय आक्रमक, आंदाेलनासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पुढाकार‎

प्रतिनिधी | अकोला ग्रामीण भागाप्रमाणेच आता शहरातील पिण्याच्या पाण्याचा मुद्दा पेटला असून शुक्रवारी हद्दवाढ भागातील नागरिकांनी भरउन्हात रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले. २०-२५ दिवसांनीही पाणीपुरवठा होत नसून टँकरही नियमित येत नसल्याचे म्हणत महिलांनी महापालिकेच्या अभियंत्यांना धारेवर धरले. महिलांनी उन्हातच तीन ठिकाणी नादुरुस्त असलेल्या हॅन्डपंपपर्यंत अभियंत्यांनाही भर उन्हात पायी फिरवले. हॅन्डपंपांत पाइपच नसल्याने त्यातून पाणी आले नाही….

Read More

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला उल्हासनगरात मोठा धक्का:जात प्रमाणपत्र अवैध ठरलं; विकी सिंग लबाना यांचे नगरसेवक पद रद्द

उल्हासनगर महानगरपालिका राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. उल्हासनगर महानगरपालिकेतील नगरसेवक विकी सिंग लबाना यांचे नगरसेवक पद अधिकृतपणे रद्द करण्यात आले आहे. जिल्हा जात पडताळणी प्रमाणपत्र समिती, नाशिक यांनी त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या निर्णयामुळे उल्हासनगरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. विकी सिंग…

Read More

लाडकी बहीण बंद करा, शेतकऱ्यांना पैसे द्या:सदावर्तेंची मागणी; म्हणाले- मराठा महामंडळाला 150 कोटी दिले इतरांना 15 हजार कोटी द्या

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका करत मोठी मागणी केली आहे. राज्यात शेतकरी, शेतमजूर आणि अल्पभूधारक आर्थिक अडचणीत असताना सरकारने प्राधान्यक्रम बदलण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले. पैशांची कमतरता असेल तर लाडकी बहीण योजना बंद करा, पण शेतकऱ्यांना भरघोस आर्थिक मदत द्या, अशी थेट मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली….

Read More

शक्तिपीठला तीव्र विरोध कायम; समर्थनार्थ वेळापुरात झाली बैठक:एकरी 10 कोटी दिले तरी जमीन नाही, जिल्हाधिकाऱ्यांसमोर गाऱ्हाणे‎

नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या हक्काच्या सुपीक जमिनी संपादन करण्याच्या शासकीय हालचालींविरोधात माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांत संतापाचा वणवा पेटत आहे. वैराग भागातील गौडगावच्या रणकंदनानंतर, आता माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांनी . एकीकडे महसूल प्रशासनाने १२९ किलोमीटर लांबीच्या भूसंपादनासाठी शासकीय रेकॉर्डवर नोंदी घेण्याची प्रक्रिया सुरू केली. दुसरीकडे निमगाव परिसरातील शेतकऱ्यांनी गावनिहाय आक्रमक मेळावे घेत ‘आरपारच्या लढाईची’ रणनीती आखली आहे….

Read More

तहसीलमधील सेतू केंद्रातून विद्यार्थ्यांची लूट:सर्व्हर डाऊनचे कारण सांगून बाहेरील दुकानांकडे पाठवले जात असल्याचा गंभीर आरोप‎

शासनाने नागरिकांना विविध दाखले, प्रमाणपत्रे व शासकीय सेवा सुलभपणे उपलब्ध करून देण्यासाठी सुरू केलेल्या तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्राचा कारभार सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सांगोला येथील अधिकृत सेतू केंद्र अनेक वेळा रिकामे दिसत असून, विद्यार्थ्यां व नागरिक यांची खाजगी गाळ्यात कामे केली जात असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून होत आहे. विशेषतः शाळा व महाविद्यालयीन प्रवेशासाठी…

Read More

राहुरी कृषी विद्यापीठाच्या “फुले स्पेड नांगर’ यंत्राला केंद्राचे पेटंट:शेतकऱ्यांचा वेळ अन् पैसा वाचवणारे संशोधन; शेती मशागतीचा खर्च 44 टक्क्यांनी कमी होणार‎

येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वित कृषी अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्पांतर्गत संशोधित करण्यात आलेल्या ‘ट्रॅक्टरचलीत स्पेड नांगर तव्याच्या कुळवासहित’ या उपयुक्त यंत्राल . विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास खर्चे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली या यंत्राच्या संशोधनात प्रकल्प प्रमुख डॉ. तुलसीदास बास्टेवाड, डॉ. संजय भांगरे, डॉ….

Read More