Headlines

रांगोळीतून माऊली अन् तुकोबांचे दर्शन, प्रेक्षक थक्क:पंढरीत पोट्रेट रांगोळी अन् सुलेखनाची जादू, राज्यातील कलाकारांची मांदियाळी‎

. येथे सुरू असलेल्या अक्षर संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी आज व्यक्तिचित्र रांगोळी (पोट्रेट रांगोळी) आणि सुलेखन (कॅलिग्राफी) प्रात्यक्षिकांचे थक्क करणारे सादरीकरण करण्यात आले. कॅमेऱ्याने टिपलेल्या छायाचित्रांपेक्षाही अधिक जिवंत, भावस्पर्शी आणि चेहऱ्यावरील सूक्ष्म हावभाव रांगोळीच्या माध्यमातून साकारताना पाहून उपस्थित प्रेक्षक अक्षरशः भारावून गेले होते. ​या संमेलनात राज्यभरातून आलेले नामवंत कलाकार आपली कला सादर करत आहेत. यामध्ये मुंबईचे…

Read More

वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार हजेरी:असह्य उकाड्यानंतर गारवा, दोन दिवस ढगाळ वातावरण कायम राहण्याची शक्यता

दिवसभराचा असह्य उकाडा आणि वाढत्या तापमानाने त्रस्त झालेल्या अहिल्यानगरकरांना शनिवारी सायंकाळी पावसाने दिलासा दिला. शहरासह जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली असून, या मान्सूनपूर्व पावसाच्या पहिल्याच फटक्याने वातावरणात गारवा निर्माण केला आहे. या पावसामुळे जमिनीला हवा असलेला ओलावा मिळाल्याने खरिपाच्या पेरणीपूर्व मशागतीला वेग येणार आहे. मार्च महिन्यापासूनच जिल्ह्यात तापमानाचा पारा चढू लागला होता….

Read More

शिर्डीत अत्याधुनिक तोफगोळा प्रकल्पाचे लोकार्पण:भारत लवकरच जगातील मोठा संरक्षण निर्यातदार देश बनणार- राजनाथ सिंह

देश संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेकडून जागतिक नेतृत्वाकडे वाटचाल करत असून, भारत लवकरच जगातील प्रमुख संरक्षण निर्यातदार देश बनेल, असा ठाम विश्वास संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला. शिर्डी एमआयडीसीत उभारण्यात आलेल्या ‘निबे समूहा’च्या अत्याधुनिक क्षेपणास्त्र व तोफगोळा (आर्टिलरी शेल) उत्पादन प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. राजनाथ सिंह म्हणाले की, केंद्र सरकारच्या प्रोत्साहनपर धोरणांमुळे संरक्षण उत्पादनात…

Read More

मंजरपूर शिवारामधील खून प्रकरणामध्ये 5 जण अटकेत:डोळ्यात मिरची पावडर टाकून सख्खा चुलत भावानेच चाकूने भोसकले‎

मंजरपूर शिवारात जुन्या वहिवाट ‎‎रस्त्यावरून दोन सख्ख्या चुलत ‎‎भावांमध्ये शुक्रवारी वाद उफाळून‎आला. या वादाचे रूपांतर तुंबळ ‎‎हाणामारीत झाले आणि एकाचा‎चाकूने भोसकून खून करण्यात‎आला. या प्रकरणी शिल्लेगाव‎ठाण्यात सात जणांवर खुनाचा गुन्हा ‎‎दाखल असून, पाच आरोपींना‎अटक केल्याची माहिती वरिष्ठ‎निरीक्षक सलीम चाऊस यांनी दिली.‎ सतीश बोल्डे यांच्या तक्रारीनुसार‎रघुनाथ बोल्डे, सागर बोल्डे,‎शोभाबाई बोल्डे, दौलत बोल्डे,‎योगेश बोल्डे, सेजल कामठे, आरती‎जाधव…

Read More

पिकांचे नुकसान:लासूर, पाचोड, शिऊरला अवकाळीचा तडाखा‎, देवळीमध्ये वीज पडून बैल ठार, शिऊर येथे शेडनेट कोसळले, वीजपुरवठा खंडित‎

लासूर स्टेशन, सावंगी, देवळीसह परिसरात शनिवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. रोहिणी नक्षत्र लागण्यापूर्वीच आलेला पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या कांदा, तसेच फळबागांचे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे शेतशिवारातील अनेक झाडे उन्मळून पडल्याने विजेच्या तारा तुटल्या. परिणामी, संपूर्ण परिसराचा वीज पुरवठा खंडित होता. रात्री उशिरापर्यंत महावितरणचे कर्मचारी युद्धपातळीवर…

Read More

जालन्याहून बहिणीच्या घरी जाणाऱ्या महिलेचे रिक्षा चालकाने केले अपहरण:एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल

जालन्याहून उपचारासाठी शहरात आलेल्या महिलेला अज्ञात रिक्षाचालकाने पळवून नेले. सिडको बसस्थानकावर उतरल्यावर संबंधित महिलेने बहिणीला फोन करून ‘हा रिक्षावाला मला कुठेतरी घेऊन जात आहे’ असे सांगत मदतीचा आर्त प्रयत्न केला. मात्र काही क्षणांतच फोन बंद झाला. या प्रकरणी एमआयडीसी सिडको ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी ३७ वर्षांच्या महिलेने फिर्याद दिली. त्यानुसार,…

Read More

पंतप्रधान आवास योजना:घरकुलासाठी नदीपात्रातील पूर्ण साठ्याच्या 10% वाळू मोफत, राज्यात 1.77 लाख कोटींची गुंतवणूक, 12 लाख घरांचे बांधकाम मार्गी

राज्यातील नदीपात्रात उपलब्ध असलेल्या एकूण वाळू साठ्यापैकी १० टक्के वाळू आता पंतप्रधान घरकुल योजनेतील घरांच्या बांधकामासाठी मोफत दिली जाणार आहे. राज्य सरकारने १५ मे रोजी हा नवा आदेश जारी केला असून, यामुळे राज्यातील १२ लाख घरांच्या रखडलेल्या व सुरू असल . राज्यात वाळू टंचाई आणि धोरणातील सततच्या बदलांमुळे पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांना बांधकामासाठी वाळू मिळण्यात…

Read More

मोर्शीत वारंवार वीजपुरवठा खंडितची समस्या:राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वात महावितरण कार्यालयावर मोर्चा, लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

मोर्शी शहरात गेल्या अनेक महिन्यांपासून वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या गंभीर समस्येविरोधात आज शनिवारी डोंगरयावली, हिवरखेड, दापोरी, घोडदेव आणि सालबर्डी परिसरातील नागरिकांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंता कार्यालयावर मोर्चा काढला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अंकुश घारड आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रुपेश वाळके यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कार्यकारी अभियंता कार्यालयाबाहेर मोठा…

Read More

किशोर बोरकर यांची एसआयआरसाठी समन्वयक म्हणून निवड:बडनेरा विधानसभेसाठी मतदार यादी पुनरिक्षण अभियानासाठी जबाबदारी

मतदार याद्यांच्या सखोल पुनरिक्षण (एसआयआर) अभियानासाठी काँग्रेसने बडनेरा विधानसभा मतदारसंघासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा माजी महानगर अध्यक्ष किशोर बोरकर यांची समन्वयक म्हणून निवड केली आहे. मतदारांची नावे यादीतून वगळली जाऊ नयेत, याची काळजी घेण्यासाठी पक्षाने हे पाऊल उचलले आहे. या निवडीची घोषणा शुक्रवारी मुंबईत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आयोजित केलेल्या कार्यशाळेत करण्यात…

Read More

माझे लग्न का लावून देत नाही?:मुलाने जाब विचारत आईला जिवंत जाळले, आरोपीला अटक; धुळ्यातील धक्कादायक घटना

ग्रामीण भागात तरुणांची लग्ने न जमण्याची समस्या किती भीषण स्वरूप धारण करत आहे, याचे एक सुन्न करणारे वास्तव धुळे तालुक्यातून समोर आले आहे. लग्न लावून देत नसल्याच्या संशयातून एका ४५ वर्षीय नराधम मुलाने आपल्या ६५ वर्षीय जन्मदात्या आईला अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिले. या भीषण घटनेत गंभीर भाजलेल्या जिजाबाई भटू खैरनार-पाटील यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी…

Read More