Headlines

सरकार सर्वसमावेशक ‘बियाणे धोरण’ करणार:तपासणीसाठी नवीन ‘एसओपी’ निश्चित तयार होणार

राज्यातील शेतकऱ्यांना उच्च दर्जाचे बियाणे उपलब्ध व्हावे, निकृष्ट अथवा बनावट बियाण्यांमुळे होणारे त्यांचे आर्थिक नुकसान टळावे, तसेच बियाणे उत्पादन, साठवणूक आणि विक्री प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता यावी, यासाठी राज्य शासन एक सर्वसमावेशक व नवीन ‘बियाणे धोरण’ तयार करणार असल्याची घोषणा कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली आहे. बियाणे तपासणीच्या कार्यपद्धतीत बदल करून नवीन मानक कार्यपद्धती (एसओपी )…

Read More

रिद्धपूरमध्ये डायरियाचे रुग्ण बरे होऊन घरी परतले:आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नांमुळे स्थिती नियंत्रणात

रिद्धपूर गावात डायरियाची लागण झालेल्या अनेक रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे येथील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने म्हटले आहे. जलवाहिनीच्या दुरुस्तीचे कामही पूर्ण झाले असून, लवकरच पाणीपुरवठा पूर्ववत सुरू केला जाईल, अशी माहिती यंत्रणांनी दिली आहे. विश्रोळी धरणातून रिद्धपूरला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला तब्बल सहा ठिकाणी गळती लागली होती. यामुळे…

Read More

लातूरमध्ये खळबळ:प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. मेहुल राठोड यांचा संशयास्पद मृत्यू; कारमध्ये आढळल्या इंजेक्शनच्या बाटल्या

लातूर शहरातील प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ आणि एम.जे. हॉस्पिटलचे संचालक डॉ. मेहुल राठोड (वय ४५) यांचा त्यांच्याच कारमध्ये संशयास्पद मृत्यू झाल्याची अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लातूर-अंबाजोगाई रोडवर उभ्या असलेल्या त्यांच्या कारमध्ये ते मृतावस्थेत आढळून आले. कारमध्ये गुंगीच्या औषधांची इंजेक्शन्स सापडल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेमुळे लातूरसह संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली…

Read More

शेतकऱ्यांना सिंचन अनुदानासाठी स्वहिस्सा देण्याची गरज नाही:'सेंट्रल बँक डिजिटल चलन' प्रणालीद्वारे थेट वितरण, लाभ घेणे सोपे

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत (टप्पा-२) राज्यातील ७ हजार २०१ गावांमधील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि सर्व महिला शेतकऱ्यांना आता ठिबक व तुषार सिंचनाचे अनुदान थेट ‘सेंट्रल बँक डिजिटल चलन’ (सीबीडीसी) या डिजिटल प्रणालीद्वारे वितरित केले जाईल. या नवीन प्रणालीमुळे शेतकऱ्यांना सिंचन संच खरेदीसाठी आपला स्वहिस्सा आधीच जमा करण्याची गरज राहणार नाही, ज्यामुळे त्यांना मोठा…

Read More

छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठा योजनेला गती:मुख्यमंत्र्यांकडून कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिकांना शाश्वत आणि पुरेसा पाणीपुरवठा मिळावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील वर्षा निवासस्थानी एक संयुक्त आढावा बैठक पार पडली. महानगरपालिका आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. या बैठकीत शहरासाठी सुरू असलेल्या नवीन पाणीपुरवठा योजनेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. रखडलेली कामे, प्रलंबित तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणी तातडीने दूर…

Read More

तुकाराम मुंढेंची ग्राहकांसाठी मोठी घोषणा:'अन्न असो किंवा औषध, फक्त बोला… तक्रार आपोआप तयार होईल', FDA चे अत्याधुनिक पोर्टल लाँच

भेसळयुक्त अन्नपदार्थ किंवा बनावट आणि निकृष्ट दर्जाच्या औषधांविरोधात आता नागरिकांना तक्रार नोंदवण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार नाही. महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित नवीन तक्रार नोंदणी प्रणाली सुरू केली असून, मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत बोलताच तक्रार आपोआप तयार होणार आहे. या सुविधेची माहिती FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सोशल मीडियावरील…

Read More

आठ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाचे पुनरागमन:छत्रपती संभाजीनगर शहरासह परिसराला दिलासा

छत्रपती संभाजीनगर शहरासह परिसरात बुधवारी सायंकाळी आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. दिवसभर उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला. विजांच्या कडकडाटासह आणि जोरदार वाऱ्यांसह झालेल्या मुसळधार पावसाने शहराला झोडपून काढले. गेल्या आठ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने वाढलेल्या उष्णतेमुळे आणि दमट हवामानामुळे नागरिक त्रस्त झाले होते. खरीप पिकांसाठी पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांनाही…

Read More

श्रीरामपूर सलग चौथ्या दिवशी बंद:वाढत्या गुन्हेगारीवर रोहित पवारांचा संताप, मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली कारवाईची मागणी

प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्रीरामपूर शहरात सध्या गुन्हेगारीचा कळस झाला आहे. गेल्या काही दिवसांत झालेल्या गोळीबाराच्या चार घटना आणि हॉटेल व्यावसायिक आकाश दुबैया यांच्यासह दोघांच्या हत्येने संपूर्ण शहर हादरून गेले आहे. या वाढत्या गुन्हेगारीच्या निषेधार्थ सलग चौथ्या दिवशीही शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. या गंभीर परिस्थितीवरून आता राजकीय वातावरणही चांगलेच तापले असून, आमदार रोहित…

Read More

सोनम वांगचुक यांच्या जीवाला बरेवाईट झाल्यास देशाची बेअब्रू होईल:राजू शेट्टींचा पंतप्रधान मोदींवर घणाघात, विलासराव-मुंडेंच्या 'त्या' बैठकीचा मोठा खुलासा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिल्लीत सुरू असलेल्या सोनम वांगचुक यांच्या उपोषणावरून केंद्र सरकारवर अत्यंत सडकून टीका केली आहे. रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाची सरकारने अद्याप दखल न घेतल्याने, शेट्टी यांनी एका सविस्तर फेसबुक पोस्टद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. या निमित्ताने त्यांनी 2011 सालच्या…

Read More

गडचिरोलीच्या आदिवासी विद्यार्थ्यांनी आयआयएम नागपूरला दिली भेट:नक्षलग्रस्त भागातून येऊन जागतिक शिक्षणाचे पाहिले स्वप्न

गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील १८ आदिवासी विद्यार्थ्यांनी नुकतीच नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेला (आयआयएम) भेट दिली. ‘जागृत’ या सामाजिक संस्थेने हा विशेष शैक्षणिक अभ्यासदौरा आयोजित केला होता, ज्यात १२ विद्यार्थी आणि ६ विद्यार्थिनींचा समावेश होता. नक्षलवादी हिंसाचाराच्या छायेत बालपण घालवलेल्या या विद्यार्थ्यांनी आता जागतिक शिक्षणाचे स्वप्न पाहिले आहे. एकेकाळी नक्षलवादाच्या प्रभावाखाली असलेल्या या दुर्गम भागांमध्ये…

Read More