Headlines

पाणीटंचाईचे लोण आता मेळघाटच्या पायथ्याशी; अचलपुरातही पाणीटंचाई:चंद्रभागा धरणावरून येणाऱ्या पाण्याचा दाब कमी‎

प्रतिनिधी | अचलपूर चंद्रभागा धरणावरून पाण्याचा दाब कमी झाल्याने मेळघाटच्या पायथ्याशी असलेल्या परतवाडा-अचलपुर या जुळ्या शहरातही गंभीर पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शहराच्या टंचाईग्रस्त भागात नगरपालिकेतर्फे टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. चंद्रभागा धरणावरून येणाऱ्या पाण्याचा दाब सध्या प्रचंड कमी झाला आहे. परिणामी अचलपूर शहरात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. जलवाहिनीत कमी…

Read More

ऑटो युनियनतर्फे चांदूरबाजार बसस्थानक परिसरात पाणपोई:आयपीएस अधिकारी सागर भामरे यांची यावेळी उपस्थिती‎

प्रतिनिधी | चांदूरबाजार वाढत्या उन्हाची तीव्रता लक्षात घेता, बसस्थानक परिसरात येणाऱ्या प्रवाशांना थंडगार पिण्याचे पाणी मिळावे या उद्देशाने चांदूरबाजार ऑटो युनियनच्या वतीने पाणपोई सुरू करण्यात आली आहे. या पाणपोईचे रीतसर उद्घाटन आयपीएस अधिकारी सागर भामरे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. ऑटो युनियनचे अध्यक्ष मुमताजिर उर्फ मोंटू खान यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या पाच वर्षांपासून हा स्तुत्य उपक्रम…

Read More

मुळा धरणातील बोट नादुरुस्त, तीन गावांचा राहुरीशी संपर्क तुटला:९० लाख रुपयांचा निधी मंजूर होऊनही ५ वर्षांत बोट मिळेना‎

प्रतिनिधी | राहुरी मुळा धरणाच्या जलाशयातून तीन गावांना जोडणारी बारागांव नांदूर धक्का ते जांभळी धक्का दरम्यान चालणारी प्रवासी यांत्रिक बोट नादुरुस्त झाली आहे. यामुळे गेल्या चार दिवसांपासून धरणाच्या पलीकडील वावरथ, जांभळी आणि जांभुळबन या तीन गावांमधील ग्रामस्थांचा राहुरी तालुक्याशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटला आहे. मागील चार दिवसांपूर्वी या यांत्रिक बोटीचा गिअर बॉक्स तुटल्याने ही सेवा…

Read More

श्रीक्षेत्र देवगडात विठ्ठलनामाचा गजर;‎ "कृष्ण जन्मोत्सव'' सोहळा उत्साहात‎:ज्ञानसागर मंडपात हजारो भाविकांची अलोट गर्दी, विविध धार्मिक कार्यक्रम‎

प्रतिनिधी | नेवासे श्रीक्षेत्र देवगड संस्थान येथे अधिक मासानिमित्त सुरू असलेल्या श्रीमद् भागवत कथा तथा विष्णू याग सोहळ्यात ‘श्रीकृष्ण जन्मोत्सव’ अत्यंत भक्तिमय आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. ‘विठ्ठल माझा माझा’ या अजरामर भक्तिगीतामुळे सर्वदूर प्रसिद्ध असलेले राधाकृष्ण महाराज यांच्या अमोघ वाणीतून वाहणाऱ्या भागवत कथेमुळे सध्या देवगड परिसरात भक्तीचा महापूर पाहायला मिळत आहे. देवगड देवस्थानच्या…

Read More

डिझेलअभावी ट्रॅक्टरची चाके थांबली:३५० पंपांवर ‘नो स्टॉक''चे फलक, कॅन घेऊन शेतकऱ्यांचा पंपावर मुक्काम‎

जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून इंधन टंचाईचे संकट असून ग्रामीण भागात ऐन खरिपाच्या तोंडावर डिझेल मिळत नसल्याने ट्रॅक्टरची चाके शेतातच थांबली आहेत. रोटाव्हेटर आणि नांगरणीची कामे करण्यासाठी लागणाऱ्या डिझेलसाठी बळीराजा आता शेत सोडून पेट्रोल पंपांवर कॅन घेऊन रांगेत उभा आहे. पैठण, गंगापूर, वैजापूर, कन्नड, सोयगाव आणि सिल्लोड या तालुक्यांमध्ये परिस्थिती चिंताजनक आहे. जवळपास ३५० हून अधिक…

Read More

बकरी ईदमुळे पाचोडच्या बाजारात बोकडास मिळाला ५० हजारांचा दर:किमतीत दुपटीने वाढ, वजनदार बोकडांना पसंती, खरेदीसाठी गर्दी‎

प्रतिनिधी | पाचोड मुस्लिम बांधवांच्या पवित्र ‘बकरी ईद’च्या पार्श्वभूमीवर पाचोड येथील जनावरांच्या बाजारात रविवारी मोठी उलाढाल झाली. कुर्बानीसाठी बकऱ्यांच्या खरेदी-विक्रीसाठी व्यापाऱ्यांसह नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. यंदा बाजारात बोकडांचे दर गगनाला भिडले असून, आकर्षक आणि धष्टपुष्ट बोकडांना ३० हजार ते ५० हजार रुपयांपर्यंत दर मिळत आहे. अवघ्या एका दिवसात या बाजारात लाखो रुपयांचे व्यवहार झाले…

Read More

रावेर, यावल तालुक्यांत वादळासह पाऊस:जळगाव जिल्ह्यात दुपारनंतर ढगाळ वातावरणाने काहीसा दिलासा

जळगाव जिल्ह्यात रावेर आणि यावल तालुक्यातील काही गावांत रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास किरकोळ वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली आहे. या पावसानंतर वातावरणात बदल झाला. दिवसाच्या कमाल तापमानातही घट झाली आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून असह्य उन्हाच्या झळा सोसणाऱ्या जिल्ह्यातील नागरिकांना काहीअंंशी दिलासा मिळाला आहे. दरम्यान, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात रविवारी पाऊस…

Read More

प्रगतिशील शेतकरी:तोंडल्याने पालटले नशीब; अवघ्या 13 गुंठ्यात वार्षिक 5 लाख उत्पन्न; टेंभुर्णीच्या शेतकऱ्याचा पारंपरिक शेतीला फाटा देत प्रयोग

सतत बदलणारे हवामान, खतांचे वाढते गगनचुंबी दर आणि बाजारपेठेतील अनिश्चितता यामुळे पारंपरिक शेती बेभरवशाची ठरत असताना, माढा तालुक्यातील टेंभुर्णीजवळील चव्हाणवाडी येथील एका प्रगतीशील युवकाने आपल्या कल्पकतेच्या जोरावर शेतीचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे. येथील तरुण शेतकरी शाम नांगरे यांनी अवघ्या १३ गुंठ्यांच्या छोट्याशा जमिनीच्या तुकड्यात ‘अलिबाग’ जातीच्या तोंडलीची यशस्वी लागवड करून, त्यातून वर्षाकाठी तब्बल ५ लाख…

Read More

विधान परिषद निवडणूक: आजपासून उमेदवारी अर्ज दाखल:अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी रणधुमाळी सुरू

अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी विधान परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या निवडणुकीसाठी आज, सोमवार, २५ मे पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर हे या निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल भवनात स्वतंत्र निवडणूक कक्ष स्थापन करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, सकाळी ११ ते…

Read More

विकृत प्रकरणात पंतप्रधानांचे नाव सहन करणे सहनशीलतेचा पराकोट:हर्षवर्धन सपकाळ यांचे फुले, गांधी, नेहरू विचारमंचच्या व्याख्यानात आवाहन

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे की, एफस्टिन फाईलसारख्या विकृत प्रकरणात पंतप्रधानांचे नाव असूनही आपण त्यांना सहन करतो, ही आपल्या सहनशीलतेची पराकाष्ठा आहे. आता रस्त्यावर उतरून सविनय सत्याग्रह करण्याशिवाय कोणताही मार्ग दिसत नाही. त्यांनी ‘दुसऱ्या स्वातंत्र्य लढ्यासाठी’ तयार राहण्याचे आवाहन केले. सपकाळ रविवारी (२४ मे) पिंपरी येथे फुले, गांधी, नेहरू विचारमंचने…

Read More