Headlines

मॉर्निंग वॉकदरम्यान चिमुरडीवर बिबट्याची झडप:आरडाओरड ऐकताच नागरिक धावले, चिमुरडीचा जीव थोडक्यात बचावला

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात पुन्हा एकदा बिबट्याच्या हल्ल्याने खळबळ उडाली आहे. ओतूर परिसरातील वाकचौरे मळा येथे गुरुवारी पहाटे 10 वर्षीय मुलीवर बिबट्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. काव्या महेंद्र वाकचौरे असे जखमी मुलीचे नाव असून या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांमध्ये प्रचंड दहशत पसरली…

Read More

गौतम अदानी लग्नाच्या 40 व्या वाढदिवसानिमित्त केदारनाथला पोहोचले:पत्नीसोबत जलाभिषेक केला; कंपनी ₹4,081 कोटी रुपयांचा रोपवे बनवत आहे

गौतम अदानी यांनी आज सकाळी रुद्रप्रयाग येथील केदारनाथ धामचे दर्शन घेतले. अदानी यांनी लग्नाच्या ४० व्या वाढदिवसानिमित्त पत्नी प्रीती अदानी यांच्यासोबत महादेवाचा जलाभिषेक केला. याच दरम्यान व्हीआयपी संस्कृती पाहून तेथील पुजारी आणि भाविक संतप्त झाले आणि घोषणाबाजी करू लागले. अदानी सकाळी दिल्लीहून देहरादूनला पोहोचले आणि तिथून खाजगी हेलिकॉप्टरने धाममध्ये आले. दर्शनानंतर त्यांनी प्रस्तावित सोनप्रयाग-केदारनाथ रोपवे…

Read More

काही प्रतिस्पर्ध्यांना मुद्दाम मैदानात उतरवले गेले:बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत पार्थ पवारांचा मोठा दावा; राजकीय ‘गेमप्लॅन’चा आरोप

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीने राज्यासह देशाचं लक्ष वेधून घेतलं असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार पार्थ पवार यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. त्यांच्या मते, ही निवडणूक बिनविरोध होऊ शकली असती, मात्र काही राजकीय हालचालींमुळे तसे घडले नाही. काही लोकांनी जाणीवपूर्वक उमेदवार उभे करून ही निवडणूक स्पर्धात्मक बनवली, असा आरोप त्यांनी केला. या वक्तव्यामुळे बारामतीतील राजकारण…

Read More

FM Radio Industry Sankat in India; Seeks Govt Relief & 5 Key Expectations 2026

नवी दिल्ली13 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक देशातील खासगी एफएम रेडिओ क्षेत्र सध्या अनेक आव्हानांना सामोरे जात आहे. जाहिराती कमी होत आहेत, खर्च वाढत आहे आणि डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे रेडिओच्या कमाईवर परिणाम होत आहे. अशा परिस्थितीत, रेडिओ कंपन्या सरकारकडून नियमांमध्ये काही मोठे बदल अपेक्षित करत आहेत. उद्योग तज्ञांचे म्हणणे आहे की, जर लवकरच दिलासा मिळाला नाही, तर आगामी…

Read More

राऊतांना स्वतःची जागा वाचवण्यासाठी ठाकरेंचा पत्ता कट करायचा आहे:विधान परिषद ठाकरेंना, तर राज्यसभा काँग्रेसला असे सपकाळांनी ठणकावले- नवनाथ बन

मविआमध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी रस्सीखेच सुरू आहे. काल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मातोश्रीवर जात सांगितले की आता विधान परिषद तुम्हाला हवी असेल तर येणाऱ्या राज्यसभेचा निर्णय आताच घ्यावा लागेल. विधान परिषद जर तुम्हाला हवी असेल तर येणारी राज्यसभा काँग्रेसला द्यावी लागेल असे त्यांनी ठणकावत सांगितले आहे, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे….

Read More

‘प्री-वेडिंग’ टाळा आणि लग्नाच्या जेवणात 50 पदार्थ नकोत:श्री मैड क्षत्रिय सोनार समाजाचे क्रांतिकारी ठराव, दु:खद प्रसंगही साधे असावेत‎

बदलत्या काळातील उधळपट्टीला लगाम लावण्यासाठी श्री मैड क्षत्रिय सोनार समाज महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. नगर येथे संपन्न झालेल्या प्रदेश पदाधिकारी बैठकीत, लग्नसमारंभातील अनावश्यक खर्च टाळण्यासाठी ‘प्री-वेडिंग फोटोशूट’व . पुणे येथे सात वर्षांनंतर झालेल्या निवडणुकीनंतर नवनिर्वाचित कार्यकारिणीची ही पहिलीच महत्त्वाची बैठक नगरमध्ये पार पडली. यावेळी उर्वरित पान ४ अनावश्यक खर्च टाळावा या…

Read More

उजनी कालव्यावरील पादचारी पूल दुरुस्ती काम निकृष्ट:शेतकऱ्यांचा जीव टांगणीला, तीन महिन्यांपूर्वीची डागडुजी उखडली; लोखंडी पुलाऐवजी भक्कम सिमेंट पुलाची मागणी

पापरी (ता. मोहोळ) येथील उजनी डाव्या कालव्यावरील पादचारी पुलाची तीन-चार महिन्यांपूर्वी केलेली दुरुस्ती निकृष्ट झाल्याने हा पूल पूर्वीपेक्षा अधिक धोकादायक बनला आहे. यामुळे शाळकरी विद्यार्थी, शेतकरी व दूध व्यावसायिकांना जीव मुठीत धरून ये-जा करावी लागत अ . पापरी येथील टेकळे वस्ती भागातून १९७८ मध्ये मुख्य उजनी डावा कालवा गेला आहे. कालव्याच्या पलीकडे शेतकऱ्यांच्या जमिनी असल्याने…

Read More

नवनीत राणा म्हणजे जातीय विष पेरणारी 'विषवल्ली:राणा अन् बोंडे यांच्यावर गुन्हे दाखल करा, महिलांच्या अत्याचारात जात-धर्म येतोच कुठे?- विजय वडेट्टीवार

माजी खासदार नवनीत राणा यांच्यावर दोन समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्य केल्या प्रकरणी गुन्हे दाखल झाले पाहिजेत, त्यांच्यासोबतच डॉ.अनिल बोंडे यांच्यावरही गुन्हे दाखल झाले पाहिजे, त्यांनी अमरावती प्रकरणी चुकीची माहिती दिली आहे, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले की, नवनीत राणा ही जातीय विष पेरण्यासाठी पोसलेली एक विषवल्ली आहे, असे…

Read More

रुबीना दिलैक म्हणाली- आई होणं म्हणजे फक्त आनंद नाही:भावनिक बदलांशी झुंज दिली, म्हणाली- स्त्रिया प्रसूतीनंतरच्या नैराश्यासारख्या कठीण स्थितीत जातात

टीव्ही अभिनेत्री रुबीना दिलैक सध्या तिच्या ‘द वार्ड’ या रिॲलिटी शोमुळे चर्चेत आहे. दैनिक भास्करसोबतच्या खास संवादात रुबीनाने मातृत्व, प्रसूतीनंतरचे नैराश्य, महिलांचे मानसिक आरोग्य आणि कुटुंबाच्या पाठिंब्यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर मनमोकळेपणाने चर्चा केली. आई होणे हा केवळ आनंदाचा प्रवास नाही, तर भावनिक आणि मानसिक बदलांनी भरलेला काळ असतो, ज्यावर समाजात कमी बोलले जाते, असे तिने सांगितले….

Read More

Pune Mango Festival 2026 Inauguration; Minister Rawal Focus on Farmers

पुणे येथे ‘आंबा महोत्सव-२०२६’ चे उद्घाटन पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना मंत्री रावल यांनी सांगितले की, राज्य शासन शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना थेट . महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ आणि पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने मार्केट यार्ड येथे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे….

Read More