Headlines

अमरावती विधानसभेत 24 टक्के मतदारांचे एसआयआर मॅपिंग अपूर्ण:निवडणूक विभागाने चिंता व्यक्त करत तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन

अमरावती विधानसभा मतदारसंघात अद्यापही २४ टक्के मतदारांचे विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मॅपिंग पूर्ण झालेले नाही. या स्थितीमुळे निवडणूक विभागाने चिंता व्यक्त केली असून, ज्या मतदारांचे मॅपिंग बाकी आहे, त्यांनी तातडीने आपल्या भागातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. मतदारयाद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रम २०२६ अंतर्गत अमरावती विधानसभा मतदारसंघात पूर्वतयारी सुरू…

Read More

मावळमध्ये धरण, नदीत बुडून 4 पर्यटकांचा मृत्यू:महाराष्ट्र दिन, कामगार दिनाच्या सुट्टीनिमित्त घडली घटना

महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या सुट्टीनिमित्त पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये चार पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला आहे. जाधववाडी धरण आणि पवना नदीत पोहण्यासाठी उतरलेल्या या तरुणांवर काळाने घाला घातला. या दुर्दैवी घटनांमुळे संपूर्ण मावळ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पहिली हृदयद्रावक घटना नवलाख उंबरे येथील जाधववाडी धरण परिसरात घडली. अजय गारुडे, संतोष एडके…

Read More

जीवनामधील संकटांचा सामना करण्याचा संदेश रामायणाने दिला:डॉ. विश्वास यांचे प्रतिपादन, श्रीराम कथा सोहळ्याला भाविकांचा प्रतिसाद‎

आजची तरुण पिढीच नव्हे तर एकूणच समाजमन एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) या मायावी समस्येशी संघर्ष करत आहे. या तंत्रज्ञानाने अनेकांचे काम हिरावून घेतले गेले आहे. चुकीच्या व्हिडिओद्वारे समाजमन कलुषित केले जात आहे पण या धोक्यातून वाचण्याचा उपाय राम कथेत आहे. तरुण पिढीने किंबहुना सर्वांनीच रामचरित मानस वाचले तर रामायण काळातील मायावी शक्तींना प्रभू श्रीरामांनी कसे नेस्तनाबूत…

Read More

शूटिंग थांबवली तर मधुबालाला कचेरीपर्यंत घेऊन गेले बी.आर.चोप्रा:प्रिन्सने भारताला समजून घेण्यासाठी त्यांचा चित्रपट पाहिला, जवाहरलाल नेहरूंनी लिहिले पत्र

२२ एप्रिल १९१४ आजपासून बरोबर ११२ वर्षांपूर्वी, अखंड भारताच्या पंजाबमध्ये, पीडब्ल्यूडीमध्ये सरकारी नोकरी करणाऱ्या विलायती राज चोप्रा यांच्या घरी बलदेव या मुलाचा जन्म झाला. बलदेव राज चोप्रा, ६ भावंडांच्या कुटुंबात दुसऱ्या क्रमांकावर होते. शिक्षणात अव्वल असलेल्या बलदेवसाठी वडिलांनी लहानपणापासूनच ठरवले होते की, त्याला सरकारी अधिकारी बनवेन. वेळ सरली आणि तयारी सुरू करण्यात आली. पाकिस्तानमधील लाहोर…

Read More

नवीन नागपूर बिझनेस डिस्ट्रिक्टसाठी मुद्रांक शुल्क माफ:गोदणी-लाडगावातील जमीन खरेदी सुकर, कनेक्टिव्हिटी वाढणार

हिंगणा तालुक्यातील गोदणी (रीठी) आणि लाडगाव (रीठी) येथे प्रस्तावित ‘नवीन नागपूर बिझनेस डिस्ट्रिक्ट’ प्रकल्पाला राज्य सरकारने गती दिली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रकल्पासाठी जमीन खरेदीवरील मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे जमीन संपादनाचा मार्ग सुकर होऊन प्रकल्पाच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला वेग येणार आहे. नवीन बाह्य वळण रस्त्यामुळे या भागाची…

Read More

ऋषिकेशमध्ये उज्जैनी एक्सप्रेसचे 3 डबे रुळावरून घसरले:शंटिंग करताना झाला अपघात; रात्री उशिरापर्यंत सुरू होते दुरुस्तीचे काम

ऋषिकेशमध्ये सोमवारी रात्री उज्जैनी एक्सप्रेसचे तीन डबे रुळावरून घसरले. अपघातावेळी ट्रेन रिकामी होती, त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, डबे रुळावरून घसरताना मोठा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक घरांतून आणि दुकानांतून बाहेर आले. हा अपघात रात्री सुमारे 9:30 वाजता ऋषिकेश रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर खांड गाव परिसरात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, योगनगरी रेल्वे स्थानकावरून धावणाऱ्या उज्जैनी एक्सप्रेसची…

Read More

Fuel Reserve for 1 Month If Supply Stops; Boost Oil Research Investment

Marathi News Business Petroleum Minister: Fuel Reserve For 1 Month If Supply Stops; Boost Oil Research Investment नवी दिल्ली25 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक सोमवारी (8 जून) पेट्रोल-डिझेलबाबत पेट्रोलियम मंत्रालय आणि केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्याकडून दोन वेगवेगळी विधाने आली, ज्यामुळे असे दिसून येते की देशात इंधनाचा साठा आहे, परंतु किमती वाढू शकतात. एकीकडे, केंद्रीय…

Read More

पैठणमध्ये सर्व कार्यालये येणार एकाच छताखाली; वेळ, पैशांची होणार बचत:प्रशासकीय इमारत अंतिम टप्प्यात, लवकरच लोकार्पण‎

तालुक्यातील नागरिकांना विविध शासकीय कामांसाठी वेगवेगळ्या कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत, यासाठी उभारण्यात येत असलेल्या पैठण शहरातील नव्या प्रशासकीय इमारतीचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. एकाच छताखाली सर्व कार्यालये ही संकल्पना प्रत्यक्षात साकार होत असून लवकरच तालुकावासीयांना आधुनिक सुविधांनी सुसज्ज प्रशासकीय सेवा उपलब्ध होणार आहेत असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता राजेंद्र बोरकर यांनी सांगितले….

Read More

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आचरणात आणण्याची गरज:मनपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन, महापौर ज्योती गाडे यांचे प्रतिपादन‎

“छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती-धर्मातील लोकांना सोबत घेऊन लोककल्याणकारी आणि न्यायप्रिय असे रयतेचे राज्य निर्माण केले. समाजातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविणे, महिलांचा सन्मान राखणे, शेतकरी व कष्टकरी वर्गाला न्याय देणे तसेच सुशासन निर्माण करण . हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त अहिल्यानगर मनपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून…

Read More

सीताराम शुगर समोरील आंदोलन मागे:राजलक्ष्मी गायकवाड यांनी मागण्या मान्य केल्याचे दिले लेखी निवेदन‎

खर्डी येथील सिताराम साखर कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर तरुण शेतकऱ्यांनी सुरू केलेले ठिय्या आंदोलन अखेर चौथ्या दिवशी मागे घेण्यात आले. सोमवारपासून विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या या आंदोलनाची मोठी चर्चा झाली होती. कारखान्यामुळे होणारे हवा, पाणी आणि भूमी प्रदूषण यांसह विविध समस्यांविरोधात तरुण शेतकऱ्यांनी हे आंदोलन पुकारले होते. अखेर आज (गुरुवार) सायंकाळी पाच वाजता हे आंदोलन मागे…

Read More