Headlines

शिवराज्याभिषेक हाच भारताचा पहिला स्वातंत्र्यदिन:रायगडावरून संभाजीराजेंची भावनिक साद, 352 व्या सोहळ्यात मानाचा मुजरा

रायगडावर आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या 352 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साहपूर्ण जल्लोष पाहायला मिळाला. देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो शिवप्रेमी आणि शिवभक्त रायगडावर दाखल झाल्याने संपूर्ण परिसर शिवमय झाला होता. महाराजांच्या जयघोषाने गड दुमदुमून गेला असून विविध सांस्कृतिक आणि ऐतिहासिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1674 रोजी याच रायगडावर पार पडला होता….

Read More

तुमच्या चुकांचा भुर्दंड जनतेला का?:पेट्रोल दरवाढीची ही पूर्वतयारी तर नाही ना? राज ठाकरेंनी पत्रातून पंतप्रधानांना दाखवला आरसा

देशातील वाढती महागाई, इराण-इस्रायल युद्धामुळे वाढलेले कच्च्या तेलाचे भाव आणि ढासळती अर्थव्यवस्था या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना काटकसर करण्याचे आवाहन केले. मात्र, या आवाहनानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधानांना खरमरीत पत्र लिहित आरसा दाखवला आहे. “चुका तुमच्या आणि भुर्दंड जनतेला का?” असा जळजळीत सवाल करत राज ठाकरेंनी या पत्राद्वारे सत्ताधाऱ्यांच्या दुटप्पी भूमिकेवर…

Read More

आर्थिक संयम गरिबांनीच का बाळगावा?:आर्थिक संयम कामगार अन् ग्राहकांसाठी ओझे का बनतो? प्रकाश आंबेडकरांचा सरकारला सवाल

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी रुपयाच्या घसरणीचा थेट लाभ परदेशात डॉलर्सच्या रुपात गुंतवणूक करणाऱ्या देशातील धनदांडग्यांना होत असल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी त्यांनी सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत आर्थिक संयमाची परीक्षा गरिबांकडूनच का? तथा आर्थिक संयम कामगार व ग्राहकांसाठी ओझे का बनतो? अशा विविध प्रश्नांच्या फैरी झाडल्या आहेत. जागतिक बाजारात सध्या रुपयांची…

Read More

कामगार कल्याणासाठी सरकारचा मोठा निर्णय!:40 वर्षांवरील वयोगटातील कामगारांची आता दरवर्षी होणार आरोग्य तपासणी

नवीन कामगार संहितेनुसार 40 वर्षांवरील कामगारांसाठीच्या वार्षिक आरोग्य तपासणी शिबिराचा राज्यात शुभारंभ करण्यात आला. कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी पुण्यातील बिबवेवाडी येथील ईएसआयसी रुग्णालयात या शिबिराचे उद्घाटन केले. यावेळी बोलताना त्यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कर्मचारी राज्य विमा निगम (ईएसआयसी) रुग्णालये उभारण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे सांगितले. या उद्घाटनप्रसंगी राज्यमंत्री माधुरी मिसाळ, कर्मचारी राज्य विमा योजना आयुक्त…

Read More

पुण्यात भीषण अपघात, एकाचा मृत्यू:मुंबई-बंगळुरू महामार्गावर पिकअपला कंटेनरची धडक, एक गंभीर जखमी

पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील नऱ्हे परिसरात सोमवारी सकाळी भीषण अपघात झाला. भरधाव कंटेनरने पिकअप व्हॅनला धडक दिल्याने २२ वर्षीय चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात सोमवारी सकाळी ८:०५ वाजताच्या सुमारास मुंबई-बंगळुरू महामार्गावर मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर हॉटेल पिगारासमोर घडला. टाटा आयशर कंटेनर (एम एच 04 एम एच…

Read More

रामाचे आचरण अन् हरिस्मरण यातच सुखी जीवनाचे गमक:रायतळे येथील संगीत कथा सोहळ्यात गायक राजेंद्र टाक यांचे निरुपण‎

“प्रभू श्री रामाचे आदर्श आचरण, भगवान श्रीकृष्णाची अचूक नीती आणि अखंड हरिस्मरण-नामसंकीर्तन यातच मानवाच्या आनंदी आणि समाधानी जीवनाचे खरे गमक दडलेले आहे,” असे निरुपण गायक तथा वक्ते राजेंद्र टाक यांनी केले. पारनेर तालुक्यातील आनंदाश्रम (रायतळे) येथे आयोज . या कथा श्रवण सोहळ्यासाठी रायतळे आणि परिसरातील पंचक्रोशीतून अनेक साधुसंत तसेच आध्यात्मिक क्षेत्रातील नामवंत मंडळी उपस्थित होती….

Read More

गावाची एकी:पोलिस ठाण्याची पायरी न चढता लिंगदेव गावाने रोखला बालविवाह, कुटुंबाचे मतपरिवर्तन, मुलीच्या शिक्षणाची गावाने घेतली जबाबदारी‎

कायदा हातात न घेता, कायद्याने हात बळकट करा याचाच आदर्श वस्तूपाठ अकोले तालुक्यातील लिंगदेव येथील ग्रामस्थांनी घालून दिला आहे. पोलिस ठाण्याची पायरी न चढता, केवळ जागरूकता, सामाजिक एकजूट आणि सकारात्मक संवादाच्या जोरावर लिंगदेवमध्ये होणारा संभाव्य बालविवा . गावकऱ्यांचा सकारात्मक आणि मुलीच्या भल्याचा हेतू लक्षात घेऊन दोन्ही कुटुंबांनी हा विवाह तूर्त स्थगित करण्याचा निर्णय घेतला. मुलीचे…

Read More

नागपूरच्या महाल परिसरात दोन गटांत फायरिंग:संघ मुख्यालयापासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर घडली घटना, पोलिसांत खळबळ

शहरातील मध्यवर्ती भाग असलेल्या महाल येथील कोठी रोड परिसरात रविवारी मध्यरात्री दोन गटांमध्ये वर्चस्वाच्या वादातून गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तीन वेगवेगळ्या दुचाकींवरून आलेल्या सहा जणांनी परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी दोन राऊंड गोळीबार केला. शहर शांततेत झोपलेले असताना अचानक झालेल्या या गोळीबारामुळे महाल आणि कोठी रोड परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. ही घटना राष्ट्रीय…

Read More

महिला तुरुंगाधिकाऱ्याने माजी कैदी असलेल्या तरुणाशी केले लग्न:कारागृहात झाले प्रेम, जन्मठेपेनंतर सुटका; नप उपाध्यक्षाला मारून जमिनीत गाडले होते

सतना सेंट्रल जेलच्या सहायक अधीक्षक फिरोजा खातून यांनी खुनाच्या प्रकरणात शिक्षा भोगलेल्या धर्मेंद्र (अभिलाष) नावाच्या तरुणाशी हिंदू रितीरिवाजानुसार लग्न केले. 5 मे रोजी छतरपूर जिल्ह्यातील लवकुश नगर येथे झालेल्या या लग्नाची संपूर्ण परिसरात चर्चा आहे. अभिलाषने जन्मठेपेची शिक्षा भोगली आहे. सुमारे 4 वर्षांपूर्वी तो तुरुंगातून सुटला होता. फिरोजाचे मुस्लिम कुटुंबीय या नात्यावर नाराज होते. ते…

Read More

‘गोविंदा… गोविंदा…’च्या जयघोषात महाआरती‎:लासलगावला श्री बालाजींना आंब्याच्या रसाचा ज्येष्ठाभिषेक

लासलगाव येथील श्री बालाजी मंदिरात शुक्रवारी (दि. २६) पारंपरिक पद्धतीने ज्येष्ठाभिषेक (आंबाभिषेक) सोहळा भक्तिभावात पार पडला. श्री बालाजी भगवानांना आंब्याच्या रसाने विशेष अभिषेक करण्यात आला. आकर्षक फुलांची सजावट, धार्मिक विधी आणि मंगलमय वातावरणामुळे मंदिर परिसर भक्तिमय झाला होता. सकाळी ७ ते ९ या वेळेत झालेल्या अभिषेक सोहळ्यास लासलगाव व परिसरातील शेकडो भाविकांनी उपस्थित राहून दर्शनाचा…

Read More