पोलिओमुक्त भारताचे यश टिकवणे ही सर्वांची जबाबदारी:राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त संजय काटकर यांचे प्रतिपादन, लासीना येथे कार्यक्रम
पोलिओ निर्मुलनामध्ये देशाने मोठे यश मिळविले असून मागील काही वर्षात एकही पोलिओ रुग्ण आढळून आला नाही. हे यश टिकविण्यासाठी पालकांनी त्यांच्या पाच वर्षाच्या आतील पाल्यांना पोलिओ डोस देण्याचे आवाहन राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त संजय काटकर यांनी रविवारी ता. २८ लासीना (ता. हिंगोली) येथे केले. लासीना येथे पल्स पोलिओ लसीकरणाच्या मोहिमेचे काटकर यांच्या हस्ते उदघाटन झाले….