Headlines

देवगाव रंगारीतील कन्या प्रशालेत विद्यार्थी संसद निवडणूक:विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांची जाणीव, निवडणूक प्रक्रियेची माहिती व नेतृत्वगुणांचा विकास व्हावा या उद्देशाने उपक्रम‎

विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांची जाणीव निर्माण व्हावी, निवडणूक प्रक्रियेची प्रत्यक्ष माहिती मिळावी आणि नेतृत्वगुणांचा विकास व्हावा या उद्देशाने विनायकराव पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कन्या प्रशाला देवगाव रंगारी येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी . शाळेत विद्यार्थी प्रतिनिधींची निवड लोकशाही पद्धतीने करण्यात आली. निवडून आलेल्या १८ प्रतिनिधींची बैठक घेऊन विद्यार्थी संसद स्थापन करण्यात आली. त्यानंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष,…

Read More

बेल टेकडीवर 200 वृक्षांची लागवड:श्री गणेश महिला बचत गट स्वीकारणार वर्षभर संगोपनाची जबाबदारी‎

येथील श्री गणेश महिला बचत गटाच्या वतीने ठाणगाव-आडवरी रोडलगत असलेल्या बेल टेकडीवर २०० वृक्षांची लागवड करण्यात आली. गावचे भूमिपुत्र आयएसआय अधिकारी भरत आंधळे यांनी या उपक्रमासाठी २०० रोपे उपलब्ध करून दिली. लागवड केलेल्या झाडांचे वर्षभर संगोपन करण्याची जबाबदारी महिला बचत गटाने स्वीकारली. पाणी फाउंडेशन फार्मर स्पर्धा योजनेअंतर्गत कृषी विभाग, सिन्नर, उमेद व पाणी फाउंडेशन यांच्या…

Read More

बिहार-झारखंडमध्ये वीज कोसळून 10 ठार:राजस्थानात रस्ते पाण्याखाली, यूपी – छत्तीसगडसह 18 राज्यांना पावसाचा इशारा

देशातील अनेक राज्यांमध्ये सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने सोमवारी यूपी, बिहार आणि छत्तीसगडसह 18 राज्यांमध्ये पावसाचा अलर्ट जारी केला आहे. उत्तराखंडमधील रुद्रप्रयागमध्ये सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलनाचा धोका वाढला आहे. केदारनाथ आणि बद्रीनाथजवळील अनेक भागांना धोकादायक क्षेत्र (डेंजर झोन) घोषित करण्यात आले आहे. यामुळे यात्रेकरू आणि सामान्य लोकांना अडचणींचा सामना करावा लागत…

Read More

गोदावरी नदीच्या पुराने 15 गावांचा संपर्क ठप्प:कमलपूर केटी वेअर पुन्हा पाण्याखाली, विसर्गामुळे रस्ता अनेक ठिकाणी खचला‎

गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने रविवारी सकाळपासून वैजापूर-श्रीरामपूरला जोडणारा कमलपूर के.टी. वेअर पाण्याखाली गेला असून वाहतूक सेवा पूर्ण ठप्प झाली आहे. परिणामी गोदाकाठावरील १५ गावांचा संपर्क तुटल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. श्रीरामपूर बाजारपेठ, शिक्षण व आरोग्य सेवांवर अवलंबून असलेल्या नागरिकांना वळसा घालावा लागत असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, वाढलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे कमलपूर…

Read More

फरहाना भट्ट म्हणाली- डॉक्टरांनी नकार दिला होता:तरीही 'खतरों के खिलाडी 15' मध्ये गेली; भीती नाही, एक पाऊल पुढे टाकणे महत्त्वाचे

‘खतरों के खिलाडी 15’ मध्ये दिसणारी अभिनेत्री फरहाना भट्टने सांगितले की डॉक्टरांनी तिला शोमध्ये भाग घेण्यास मनाई केली होती, पण तिने हार मानली नाही. तिने शोमधील कठीण स्टंट्स, तिचा आजार, चाहत्यांच्या अपेक्षा, रुबीना दिलैकसोबतची मैत्री आणि होस्ट रोहित शेट्टीकडून मिळालेल्या प्रोत्साहनावर मनमोकळेपणाने चर्चा केली. सादर आहेत संवादाचे प्रमुख अंश… प्रश्न: ‘खतरों के खिलाडी’ चा अनुभव…

Read More

आरापूर एमआयडीसी दरनिश्चितीची दुसरी बैठक निर्णयाअभावी निष्फळ:प्रशासनाचा मोबदला, प्रत्यक्ष मागणीत तफावत‎

बहुचर्चित आरापूर औद्योगिक वसाहतीसाठी जमिनीच्या दरनिश्चितीबाबत जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि शेतकऱ्यांमध्ये रविवारी पार पडलेली दुसरी बैठकही निष्फळ ठरली. पांडव लॉन्स येथे आयोजित या बैठकीत गवळीशिवरा येथील शेतकऱ्यांनी ‘शेतकरी एकजुटीचा विजय असो’ अशा जोरदार घोषणाबाजी करत सभात्याग केला. दरम्यान, शेतकऱ्यांच्या मनाविरुद्ध एक इंचही जमीन अधिग्रहित केली जाणार नाही. ८० टक्के शेतकऱ्यांचा सकारात्मक कौल असेल तरच एमआयडीसीचा…

Read More

कातपूर फाटा येथील गणपती मंदिरात भाविकांनी घेतले दर्शन:संकष्ट चतुर्थीनिमित्त मूर्तीचे पूजन आणि महाभिषेक‎‎

पैठण तालुक्यातील छत्रपती संभाजीनगर-पैठण महामार्गावरील कातपूर फाट्याजवळ असलेल्या श्रीक्षेत्र पावन गणपती मंदिरात रविवारी चतुर्थीनिमित्त भाविकांची दर्शनासाठी अलोट गर्दी झाली होती. दिवसभरात हजारो भाविकांनी पावन गणपतीचे मनोभावे दर्शन घेतले. हे मंदिर तालुक्यातील एक अत्यंत जागृत देवस्थान म्हणून परिचित असून, काही वर्षांपूर्वी या भव्यदिव्य मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. विशेषतः प्रत्येक चतुर्थीला आणि पवित्र श्रावण महिन्यात भाविक…

Read More

कन्नड येथे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी:अण्णा भाऊंच्या लेखणीतून लढाऊ माणूस पुढे आला- अब्दुल जावेद‎

शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती शनिवारी विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. नगरपरिषद कार्यालय आणि विविध सामाजिक संघटनांच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी नगरपालिकेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलताना नगरसेवक अब्दुल जावेद म्हणाले की, अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या लेखनातून शोषित व वंचित माणसांचे दुःख मांडले असून, त्यांच्या साहित्यातून पराभूत नव्हे…

Read More

अण्णा भाऊंचे साहित्य शोषित घटकांना जगण्याची ताकद देणारे- प्राचार्य कोलते:सावळदबारा येथे अण्णा भाऊ साठे व लोकमान्य टिळक यांना अभिवादन‎

तालुक्यातील सावळदबारा येथील जय कालिंका देवी शिक्षण संस्था संचलित शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आणि कै. लक्ष्मणराव भीमराव कोलते पाटील वरिष्ठ महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना जयंती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रशासकीय अधिकारी एन. आर. कोलते यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार…

Read More

नवी मुंबई क्लस्टर योजनेवरून सुरू झाला मोठा वाद:माझ्या नादाला लागल्यास जागा दाखवू, नाईकांचा शिंदेसेनेस इशारा

नवी मुंबईतील प्रस्तावित ‘क्लस्टर डेव्हलपमेंट’ योजनेवरून महायुती सरकारमधील अंतर्गत राजकीय मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. क्लस्टर योजनेच्या नावाखाली अवघ्या ३० वर्षांच्या आतील सुस्थितीतील इमारती या योजनेत बळजबरीने समाविष्ट केल्या जात असल्याचा गंभीर आरोप भाजपचे वरिष्ठ नेते गणेश नाईक यांनी केला आहे. या योजनेला कडाडून विरोध दर्शवताना, “माझ्या नादाला लागल्यास त्याला त्याची जागा नीट दाखवेन,”…

Read More