अभिवादन:व्यक्तिस्वातंत्र्य, मानवी प्रतिष्ठेचा आग्रह तर सामाजिक गुलामगिरीचा निषेध ही बाबासाहेबांची विचारप्रणाली
व्यक्तिस्वातंत्र्य, मानवतेची प्रतिष्ठा यासाठी आग्रह तर सामाजिक गुलामगिरीचा निषेध ही बाबासाहेबांची विचारप्रणाली होती. त्यांना सदैव प्रेरणा देणारे गुरु भगवान बुद्ध, संतकवी कबीर, महात्मा फुले तर विद्या, विनय, शील ही त्यांची दैवते होती. स्वातंत्र्य, समता, बंधूता या तत्वांवर त्यांची अचल निष्ठा होती. शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा हा दिव्य संदेश त्यांनी दिला. समाजशास्त्र, शिक्षण, अर्थशास्त्र, तत्वज्ञान…