Headlines

मांगी येथे केबल चोरट्यांचा धुमाकूळ, 130 हून अधिक शेतकऱ्यांचे नुकसान:गेल्या 3 महिन्यांत दुसऱ्यांदा चोरी झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप

पांडे करमाळा तालुक्यात शेती पंपाच्या केबल व तांब्याच्या तारा चोरीच्या घटनांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. ऐन उन्हाळ्यात पिकांना पाणी देण्याची गरज असताना चोरट्यांनी पुन्हा एकदा मांगी तलावाच्या सांडवा परिसरातील शेतकऱ्यांना लक्ष्य केले आहे. शनिवार दि. ३० मे रोजीच्या मध्यरात्री झालेल्या चोरीत १३० हून अधिक शेतकऱ्यांच्या शेतीपंपांच्या १५ हजार फुटांहून अधिक…

Read More

विरमगाव रस्त्याची 30 वर्षांपासून दुरवस्था; विद्यार्थी, नागरिकांचे हाल:1995 नंतर रस्ता डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत, दुरुस्तीची मागणी‎

तालुक्यातील विरमगाव येथील मुख्य रस्त्याची गेल्या तीन दशकांपासून अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. गेल्या ३० वर्षांत या रस्त्याचे साधे डांबरीकरणही होऊ शकले नाही ही अत्यंत संतापजनक बाब आहे. या खराब रस्त्यामुळे शाळकरी मुले, वयोवृद्ध नागरिक आणि गरोदर महिलांना रोज नरकयातना सहन कराव्या लागत आहेत. १९९५-९६ या काळात अशोक पाटील डोणगावकर मंत्री असताना या विरमगाव मुख्य…

Read More

मेळघाटात जलसंकट गहिरे:8 गावांना 19 टँकरने पाणीपुरवठा सुरू

तापमानात वाढ झाल्याने मेळघाटातील जलसंकट अधिक गंभीर झाले आहे. चिखलदरा तालुक्यातील आठ गावांमध्ये सध्या १९ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. या गावांमध्ये भूगर्भात पाण्याचा कोणताही स्रोत उपलब्ध नसल्यामुळे टँकरशिवाय पाणीपुरवठा करण्याचा दुसरा कोणताही पर्याय नसल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाने म्हटले आहे. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या नोंदीनुसार, या आठही गावांमध्ये रहिवाशांसाठी दररोज पिण्याच्या पाण्याचे टँकर पाठवले जात…

Read More

13th day of CJP agitation, Sonam Wangchuk’s health deteriorates, Abhijit Deepke’s ‘Chai Pe Charcha’ program with protesters

Marathi News National 13th Day Of CJP Agitation, Sonam Wangchuk’s Health Deteriorates, Abhijit Deepke’s ‘Chai Pe Charcha’ Program With Protesters नवी दिल्ली32 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक जंतरमंतर येथे सुरू असलेल्या उपोषणाच्या पाचव्या दिवशी गुरुवारी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावली. त्यांच्या रक्तातील साखर ६० पर्यंत खाली आली. रक्तदाब कमी झाला आहे. या आंदोलनाला आता सीपीआय…

Read More

बेस्ट कर्मचारी 18 जूनपासून बेमुदत संपावर!:थकीत पैशांसाठी 12 कामगार संघटना एकवटल्या; 8 जूनला कामगारांचा विशेष मेळावा

मुंबईत प्रवाशांच्या सेवेसाठी अविरतपणे धावणाऱ्या बेस्टचे आजी-माजी कर्मचारी आता एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असून, प्राप्त माहितीनुसार ते येत्या 18 जूननंतर बेमुदत संपावर जाण्याच्या पावित्र्यात आहेत. बेस्टची वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी रोज हजारो कर्मचारी अथक परिश्रम घेत असतात. मात्र आता याच कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसल्यामुळे मुंबईतील लाखो चाकरमान्यांची आणि दैनंदिन प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याची…

Read More

यश डोक्यात न ठेवता पुढचा यशाचा मार्ग चालायला लागा:अभिनेते भारत गणेशपुरेंचा कानमंत्र, लोकरंगच्या नाट्य प्रशिक्षणाची सांगता‎

कितीही मोठं यश मिळालं तरी ते डोक्यात न ठेवता, त्याचाच आनंद साजरा करत न बसता नवीन काही योजना करण्यासाठी कामाला लागलं पाहिजे, असा कानमंत्र सुप्रसिद्ध अभिनेते भारत गणेशपुरे यांनी दिला. “लोकरंग’तर्फे आयोजित तीन दिवसीय नाट्य प्रशिक्षण शिबिराच्या समारोपीय समारंभात ते बोलत होते. यावेळी मंचावर ‘लोकरंग’चे अध्यक्ष अनिल गावंडे, प्रभात किड्स स्कूलचे संचालक डॉ. गजानन नारे,…

Read More

विजय मिळाल्यानंतर शिल्पा शेट्टीच्या नावाने बनावट पोस्ट:अभिनेत्री संतापून म्हणाली- माझ्या नावाचा गैरवापर करत आहेत; दावा होता- आरक्षणावर विधान केले

अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांच्या नावाने आरक्षणाबाबत एक बनावट पोस्ट व्हायरल झाली. ही माहिती मिळाल्यावर अभिनेत्री संतापल्या आणि त्यांनी स्पष्ट केले की, त्यांच्या नावाचा गैरवापर केला जात आहे. शिल्पा शेट्टी यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून लिहिले, “आरक्षणाबाबत माझ्या नावाने ज्या गोष्टी पसरवल्या जात आहेत, त्या पूर्णपणे खोट्या आहेत. मी असे कोणतेही विधान केलेले नाही. काही…

Read More

माजी सैनिकांसाठी महत्त्वाचा निर्णय:पंढरपूर आणि सातारा येथे एकात्मिक कल्याण केंद्र उभारण्यास मान्यता – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

पंढरपूर येथे मोठ्या प्रमाणात भाविक येतात. येथे वारी आणि दर्शनासाठी येणाऱ्या माजी सैनिकांच्या सोयीसाठी त्याचप्रमाणे सातारा येथेही एकात्मिक कल्याण केंद्र उभारण्यासाठी व्यवहार्यता पडताळून प्रस्ताव पाठविण्यास राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी मान्यता दिली. माजी सैनिकांचे पुनर्वसन व पुनर्स्थापनेसाठीच्या विशेष निधी (महाराष्ट्र) समितीची 50 वी वार्षिक बैठक राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली लोकभवन येथे झाली. या बैठकीत माजी सैनिक व…

Read More

घोटी-त्र्यंबकेश्वर पाच मीटरचा रस्ता अचानक 15 मीटर:जमिनीस विरोध, मोबदला द्या, मगच जमीन ताब्यात घ्या; कृती समितीची भूमिका‎

घोटी–त्र्यंबकेश्वर रस्त्याच्या भूसंपादनावरून प्रकल्पबाधित शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. प्रत्यक्षात पाच मीटर असलेला वहिवाट रस्ता कागदोपत्री थेट १५ मीटर कसा झाला, असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. या वाढीव १५ मीटर क्षेत्राचा . याच पार्श्वभूमीवर कृती समितीचे अध्यक्ष नागेश गायकर व कायदेशीर सल्लागार अरुण पोरजे यांनी १५ मीटर क्षेत्राचा योग्य मोबदला आधी द्यावा…

Read More

देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार 2026 जाहीर:श्रीधर लोणी, अंजली खमितकर, मयुरेश प्रभुणे, मोनेश शेलार यांचा 22 ऑगस्टला सन्मान

विश्व संवाद केंद्र आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीतर्फे माध्यम क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना दरवर्षी देण्यात येणारे ‘आद्य पत्रकार देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार 2026’ जाहीर झाले आहेत. यंदा ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या पुणे आवृत्तीचे संपादक श्रीधर लोणी यांना ‘ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. ‘सकाळ’चे विशेष बातमीदार मयुरेश प्रभुणे आणि ‘प्रभात’च्या वरिष्ठ बातमीदार अंजली खमितकर यांना ‘आश्वासक पत्रकारिता…

Read More