Headlines

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी 2.64 कोटींचे अंमली पदार्थ केले नष्ट:156 गुन्ह्यांमधील मुद्देमाल शिरूर येथील भट्टीमध्ये जाळला

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई केली आहे. आयुक्तालयाच्या हद्दीत विविध कारवायांमध्ये जप्त करण्यात आलेला तब्बल २ कोटी ६४ लाख १३ हजार ७१० रुपये किमतीचा अंमली पदार्थांचा साठा कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून नष्ट करण्यात आला. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील रंजनगाव एमआयडीसी येथील ‘महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड’ च्या प्लांटमध्ये हा साठा जाळून नष्ट करण्यात…

Read More

सलग 39 व्या वर्षी भद्रा मारुती पायी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान:गजानन महाराज बारगळ यांच्या नेतृत्वाखाली प्रवास‎

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर खुलताबाद येथील श्री भद्रा मारुती पायी दिंडीने सलग ३९व्या वर्षी भक्तिभावाने पंढरपूरकडे प्रस्थान केले. गजानन महाराज बारगळ यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या दिंडीत शेकडो वारकरी सहभागी झाले. “ज्ञानोबा-तुकाराम” च्या जयघोषाने आणि टाळ-मृदंगाच्या गजराने परिसर भक्तिमय झाला. प्रस्थानापूर्वी श्री भद्रा मारुती मंदिरात विठ्ठल-रुक्मिणी व श्री हनुमानाची पूजा, आरती आणि हरिनाम कीर्तन करण्यात आले. त्यानंतर माजी…

Read More

पुण्यात सहायक फौजदार, हवालदार निलंबित:अवैध धंद्यांना प्रोत्साहन दिल्याने पोलिस उपायुक्तांचे आदेश

पुणे शहर पोलिस दलात अवैध धंद्यांना प्रोत्साहन दिल्याप्रकरणी दोन पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सहकारनगर पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस फौजदार बापुसाहेब किसनराव खुटवड आणि हवालदार अमोल प्रकाश पवार अशी निलंबित करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलिस उपायुक्त मिलींद मोहिते यांनी या निलंबनाचे आदेश दिले आहेत. हे दोन्ही कर्मचारी सहकारनगर पोलिस ठाण्याच्या तपास पथकात (डीबी)…

Read More

weather MP UP rajasthan Uttarakhand rain haryana punjab heatwave

नवी दिल्ली7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक देशातील 11 राज्यांमध्ये गुरुवारी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये 70 किमी प्रतितास वेगाने वादळ आले. सुमारे 80 हून अधिक झाडे उन्मळून पडली. उत्तर प्रदेशातील 12 शहरांमध्ये पाऊस झाला. नोएडामध्ये जोरदार वाऱ्यामुळे 400 झाडे उन्मळून पडली. हरियाणातील फरिदाबाद जिल्ह्यात उड्डाणपूल बांधकाम कामात असलेली क्रेन कंटेनरवर उलटली. यात 3 मजुरांचा…

Read More

नदीत वाहून जाणाऱ्या शाम्पू पुड्या पकडताना तिघींचा बुडून मृत्यू:दोन बहिणींसह काकूचा करुण अंत, मोहळा येथील गोदावरी नदीपात्रात घटना

सोनपेठ तालुक्यातील मोहळा येथे गोदावरी नदीपात्रात धुणे धुण्यासाठी व पोहण्यासाठी गेल्यानंतर तरुणीच्या हातातील शाम्पूच्या १० पुड्या निसटून पाण्यात वाहू लागल्या. त्या घेण्यासाठी तिने तेलाचा प्लास्टिकचा रिकामा डबा हातात घेऊन खोल पाण्यात प्रवेश केला. पाण्यात डब्याचे झाकण उघडले. डब्यात पाणी शिरले. त्याच वेळी तरुणी पाण्यात बुडू लागली. तिला वाचवण्यासाठी तिची बहीण पाण्यात गेली. बहिणींच्या मागे काकूही…

Read More

28 वा कलाश्री संगीत महोत्सव उत्साहात पडला पार:पिंपळेगुरव येथे घराणेदार गायकांच्या मैफलीने समारोप

गुरुकुल कलाश्री संगीत मंडळाच्या वतीने आयोजित २८ वा कलाश्री संगीत महोत्सव नुकताच पिंपळेगुरव येथील नटसम्राट निळू फुले रंगमंदिरात दिमाखात संपन्न झाला. घराणेदार गायक कलाकारांच्या मैफलीने या महोत्सवाचा समारोप झाला. महोत्सवाच्या उद्घाटनाला आमदार शंकरभाऊ जगताप, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक प्रशांत शितोळे, चंद्ररंग समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य लक्ष्मण जगताप, उद्योजक विजू शेठ जगताप, गुरुकुल कलाश्री संगीत…

Read More

तेलवाडी येथे वारकरी स्नेहसंमेलन‎:समाजात समता, शांतता नांदावी यासाठी संतांचे जीवित कार्य आहे : गोपाल महाराज

समाजात सद्भाव समता आणि शांतता नांदावी यासाठी संतांचे जीवित कार्य आहे. आज युवकात व्यसनाधीनता वाढत आहे. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने संत शिकवण समजून घेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन संत लक्ष्मण चैतन्य आश्रम तेलवाडी येथे गोपाल चैतन्य महाराज यांनी केले. आमदार संजना जाधव यांच्या पुढाकारातून तालुक्यातील १३० संत, महंत कीर्तनकार, प्रबोधनकार, वारकरी स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते….

Read More

उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हेलिकाॅप्टरचे वादळामुळे जुहूत इमर्जन्सी लँडिंग:हवेत 20 मिनिटे हेलकाव्यानंतर वैमानिकाचे प्रसंगावधान

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर सोमवारी कल्याण-डोंबिवली परिसरात अचानक आलेल्या धुळीच्या वादळात सापडले. ते महालक्ष्मी रेसकोर्सवरून मुरबाडकडे ते ओएसडींसह एका विवाह सोहळ्यासाठी निघाले होते. मात्र, खराब हवामान व ‘झीरो व्हिजिबिलिटी’मुळे त्यांचे हेलिकॉप्टर तब्बल २० मिनिटे हवेत हेलकावे होते. अखेर वैमानिकाने प्रसंगावधान राखून ‘एटीसी’ शी संपर्क साधला आणि तातडीने मार्ग बदलून हेलिकॉप्टर जुहू विमानतळावर सुरक्षित उतरवले….

Read More

भागवत शास्त्र आपल्या मनातील मृत्यूची भीती नाहीशी करते:त्याचे वाचन गरजेचे, न्हावी येथील भागवत कथेत राहुल भोळे यांचे निरूपण‎

भागवत शास्त्र हे माणसाच्या मनातील मृत्यूची भीती नाहीशी करणारे श्रेष्ठ शास्त्र आहे, असे निरूपण सावरगावकर राहुल महाराज भोळे यांनी केले. येथील सद्गुरु नारायणनाथ मंदिरामध्ये अधिक मासाचे (पुरुषोत्तम मास) औचित्य साधून आयोजित श्रीमद् भागवत पुराण कथा वाचन व गीता पारायण सोहळ्यात ते बोलत होते. कथेचे वाचन करताना भोळे यांनी सांगितले की, अभिमन्यू पुत्र राजा परीक्षित याला…

Read More

झीशान अय्युब यांना 'भाई वैद्य युवा नेता पुरस्कार':म्हणाले – "सध्या जगात द्वेष आणि हिंसेचे वातावरण"

प्रसिद्ध चित्रपट अभिनेते झीशान अय्युब यांना नुकताच ‘लोकनेते भाई वैद्य युवा नेता पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला. यावेळी पुरस्कार स्वीकारताना त्यांनी सध्याच्या जागतिक परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, सध्या संपूर्ण जगात द्वेष आणि हिंसेचे वातावरण आहे, जिथे द्वेष पसरवणारे तग धरतात, तर प्रेम करणाऱ्या व्यक्तींना समाजाबाहेर फेकले जाते. हा प्रतिष्ठेचा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार…

Read More