Headlines

आंबे गावातील नागणे दाम्पत्य मृत्यू प्रकरणी वारसांना 5 लाखांची मदत:मोहोळचे आमदार राजू खरे यांच्या विधानसभेतील पाठपुराव्याला यश‎

आंबे येथील लक्ष्मण नागणे आणि अलका नागणे या शेतकरी दाम्पत्याचा विजेचा धक्का लागून २८ जून रोजी वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी मृत्यू झाला होता. नैसर्गिक आपत्ती आणि वीज वितरण कंपनीच्या चुकीमुळे मृत्यू ओढवलेल्या नागणे दाम्पत्यांच्या वारसांना राज्य शासनाकडून प्रत्येकी ५ लाख रुपये नुकसानभरपाई जाहीर केली असून वारसांपैकी एकाला शासकीय नोकरी देण्याचे आश्वासन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले…

Read More

दिलासा:अमेरिकन कोर्टाने अदानींवरीलसर्व फौजदारी आरोप रद्द केले, 2 वर्षे जुन्या प्रकरणात फेडरल कोर्टाचा निकाल

अमेरिकन कोर्टाने अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्यावरील सर्व फौजदारी आरोप कायमचे फेटाळून लावले आहेत. त्यांचे पुतणे सागर अदानी आणि अदानी ग्रीन एनर्जीचे माजी सीईओ यांच्यावरील फसवणुकीशी संबंधित ३ आरोपही फेटाळण्यात आले आहेत. हा निकाल न्यूयॉर्कचे न्यायाधीश निकोलस गैरॉफिस यांनी सुनावला. आता हे आरोप पुन्हा लावता येणार नाहीत. मात्र, कोर्टाने म्हटले आहे की, याचा अर्थ…

Read More

म्हैसूरमधील रेस्टो-पबला आग, 2 जणांचा मृत्यू:5 जखमी, 7 जणांना वाचवण्यात आले; पबमध्ये 25 लोक होते

कर्नाटकातील म्हैसूरमध्ये सोमवारी एका रेस्टो-पबला आग लागल्याने 2 लोकांचा मृत्यू झाला. पाच लोक जखमी झाले. मृत्यू झालेल्यांमध्ये दार्जिलिंगचा 26 वर्षीय शाहीन आणि नेपाळचा 24 वर्षीय प्रकाश यांचा समावेश आहे. सात लोकांना वाचवण्यात आले. रुग्णालयात ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत, त्यामध्ये ग्राहक सोनू, रमेश, महादेव प्रसाद, प्रज्वल, अविनाश आणि पबचे मालक प्रीतम पुमीत यांचा समावेश आहे. मिळालेल्या…

Read More

ट्रेलर अन् कारचा अपघात; 32 वर्षीय तरुणाचा मृत्यू:सिल्लोड मार्गावर सताळा फाट्याजवळील घटना‎

फुलंब्री छत्रपती संभाजीनगर-सिल्लोड राष्ट्रीय महामार्गावरील फुलंब्री तालुक्यातील सताळा फाट्याजवळ बुधवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास भीषण अपघात घडला. सिल्लोडकडून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने जाणाऱ्या सिमेंटचा ट्रेलरला (एमएच ४० एके ४९०९) पाठीमागून वेगात येणाऱ्या क्रेटा कार (एमएच २० एचएन ४१००) जोराची धडक दिली. या भीषण अपघातात कारचालक चंद्रशेखर सुभाष शेवाळे (३२, रा. गारखेडा परिसर, छत्रपती संभाजीनगर) यांचा जागेवरच…

Read More

पारनेर बाजार समिती सभापतिपदी बेलकर:उपसभापतिपदी संदीप सालके बिनविरोध

पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी गंगाराम बेलकर तर उपसभापतिपदी संदिप सालके यांची बिनविरोध निवड झाली.मावळते सभापती किसनराव रासकर आणि उपसभापती किसनराव सुपेकर यांनी आपले राजीनामे दिल्याने, गुरुवारी (९ एप्रिल) पदाधिकारी निवडीसाठी संचालक मंडळाच्या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. बाजार समितीच्या सभागृहात, सहायक निबंधक तथा अध्यासी अधिकारी विकास जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक…

Read More

संत रविदास नगरनंतर आता कांशीराम नगरची मागणी:मायावती म्हणाल्या- ९ ऑक्टोबरपूर्वी महापुरुषांच्या नावावरील जिल्ह्यांची जुनी नावे पूर्ववत करावीत

बहुजन समाज पार्टी (बसपा) च्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांनी संत रविदास नगर जिल्ह्याचे नाव पूर्ववत केल्याबद्दल उत्तर प्रदेश सरकारचे आभार मानले आहेत. त्याचबरोबर त्यांनी मागणी केली आहे की, बसपा सरकारच्या काळात महापुरुषांच्या नावावर तयार केलेल्या इतर जिल्ह्यांची जुनी नावे देखील पूर्ववत करावीत. त्या म्हणाल्या की, जर हा निर्णय बसपा संस्थापक कांशीराम यांच्या ९ ऑक्टोबर रोजी…

Read More

गुंदवली-डीएन नगर मेट्रो सेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी:बोरीवलीतील समस्यांवर आमदार संजय उपाध्याय यांची BMC आयुक्तांशी भेट

बोरीवली विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार संजय उपाध्याय यांनी बुधवारी बीएमसी आयुक्त अश्विनी भिडे यांची भेट घेऊन बोरीवली परिसरातील नागरिकांच्या समस्या, सार्वजनिक सुविधा आणि रखडलेल्या विकासकामांबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी त्यांनी मेट्रो सेवा, अतिक्रमण, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे शोषण आणि अवैध गतिविधींसह अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले. बीएमसी आयुक्तांनी विविध मागण्यांवर सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन दिले आहे. गुंदवली-डीएन नगर…

Read More

शहजाद भट्टी नेटवर्कविरुद्ध 150 ठिकाणी छापे:संभाजीनगरसह राज्यभरात 175 संशयितांची एटीएसकडून चौकशी

महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, नागपूरसह राज्यभरातील १५० हून जास्त ठिकाणांवर छापे टाकले. पाकिस्तानात बसून भारतीय तरुणांना देशविरोधी कारवायांसाठी चिथावणी देणारा आयएसआयचा हस्तक शहजाद भट्टीच्या राज्यातील नेटवर्कविरोधात ही कारवाई होती. या मोहिमेत एटीएसने सोशल मीडियावरून भट्टीच्या संपर्कात असलेल्या १७५ संशयितांना शोधून काढले असून त्यांची कसून चौकशी सुरू…

Read More

जयंत पाटलांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर:म्हणाले- ज्यांना सांगली-पेठ रस्त्यावरील खड्डे बुजवता आले नाहीत, ते मोदींना सल्ला देतायत

ज्यांना सांगली-पेठ रस्त्यावरील खड्डे बुजविता आले नाहीत, ते आता मोदींना सल्ला देतायत, असा टोला भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांना लगावला आहे. पेट्रोल-डिझेलच्या टंचाईवरून तसेच देशातील सध्याच्या परिस्थितीवरून जयंत पाटलांनी केंद्र सरकारवर तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. यावर आता पडळकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे….

Read More

आरक्षण उपवर्गीकरण- डॉ. चलवादींचे सुवर्णमध्य काढण्याचे आवाहन:दलित समाजात फूट नको, बौद्ध समाजावर अन्याय टाळावा

महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीतील आरक्षणाच्या उपवर्गीकरणाबाबत सध्या सामाजिक आणि राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. हुलगेश चलवादी यांनी या मुद्द्यावर सर्वसमावेशक आणि समतोल विचार करण्याचे आवाहन केले आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे सर्वेसर्वा तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पक्षाची भूमिका…

Read More