Headlines

बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील 152 जागांवर मतदान:पहिल्यांदाच प्रत्येक बूथचे रेकॉर्डिंग होईल; तमिळनाडूच्या 234 जागांवरही मतदान

पश्चिम बंगाल आणि तमिळनाडूमध्ये आज मतदान होत आहे. बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ जागांवर मतदान होणार आहे. तामिळनाडूमध्ये सर्व २३४ जागांवर निवडणुका होतील. मतदान सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत होईल. बंगालमध्ये टीएमसी आणि भाजप यांच्यात मुख्य लढत आहे. येथील सर्व मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग (थेट निरीक्षण) केले जाईल. राज्यातील उर्वरित १४२ जागांवर दुसऱ्या टप्प्यात २९ एप्रिल…

Read More

भोंदू अशोक खरातच्या 'लीला' आता पडद्यावर:दीपाली सय्यद यांची महत्त्वाची भूमिका, रुपाली चाकणकर साकारणार असल्याची चर्चा

अवघ्या महाराष्ट्रात खळबळ माजवणाऱ्या भोंदू अशोक खरात व त्याच्या कारनाम्यांवर आता चित्रपट येणार असल्याची माहिती आहे. या चित्रपटात सत्ताधारी शिवसेनेच्या पदाधिकारी दीपाली सय्यद प्रमुख भूमिकेत दिसून येणार आहेत. त्यामुळे त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा या प्रकरणातील एक कथित प्रमुख संशयित असणाऱ्या रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेत दिसणार काय? अशी चर्चा सिनेरसिकांत रंगली आहे. भोंदू अशोक खरातवर…

Read More

न्याहारी माता डोंगराला आग; दोन हजार झाडांचे नुकसान:वनविभाग व नागरिकांनी तासभर प्रयत्नांनी विझवली आग

प्रतिनिधी | दिंडोरी दिंडोरी वनपरिक्षेत्रातील कोराटे येथील न्याहारी माता डोंगराला शनिवारी (दि. ९) सायंकाळी लागलेल्या भीषण आगीत सुमारे २५ एकर परिसर भस्मसात झाला असून जवळपास दोन हजार झाडांचे नुकसान झाले आहे. या आगीत डोंगरावरील जैवविविधतेलाही मोठा फटका बसला. वनविभाग आणि स्थानिक निसर्गप्रेमी नागरिकांनी जीवाची बाजी लावत तासाभराच्या अथक प्रयत्नांनंतर वणवा आटोक्यात आणला. या उन्हाळ्यात न्याहारी…

Read More

बार्शीत नभांगणात अवतरले रंगीबेरंगी नक्षत्र:शोभेच्या तोफांनी उपस्थितांना ठेवले खिळवून, फटाक्याच्या आतिषबाजीने बार्शीकरांच्या डोळ्यांचे फिटले पारणे‎

बार्शीचे ग्रामदैवत श्री भगवंताच्या उत्सवानिमित्त आयोजित ‘भगवंत महोत्सवाचा’ समारोप अत्यंत नेत्रदीपक आणि रोमांचक पद्धतीने झाला. बार्शी नगरपरिषद, देवस्थान ट्रस्ट आणि विविध संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्यात शोभेच्या दारूकामाच्या आतिषबाजीने संपूर्ण बार्शी शहर उजळून निघाले. सोलापूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्यातील नामवंत फायर वर्क्सनी सादर केलेल्या कलेला बार्शीकरांनी अभूतपूर्व प्रतिसाद देत टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. भगवंत…

Read More

मोदी म्हणाले- महिलांना सपा-काँग्रेसने धोका दिला:घराणेशाहीचे पक्ष नारीशक्तीला घाबरले आहेत; मी तुम्हाला आरक्षण मिळवून देणारच

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी काशीला पोहोचले. येथे नारी वंदन महिला संमेलनात पंतप्रधानांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. सपा-काँग्रेस, टीएमसी आणि डीएमकेला परिवारवादी पक्ष म्हटले. पंतप्रधान म्हणाले, ४० वर्षांपासून महिला आरक्षण रखडले होते. आम्ही २०२३ मध्ये नारी शक्ती अभिनंदन पारित केले. हा कायदा लागू व्हावा, यासाठी चर्चा ठेवली. सपा, काँग्रेस, टीएमसी, डीएमके सारख्या पक्षांनी देशातील महिलांना धोका…

Read More

वाढदिवसाच्या बहाण्याने बालविवाहाचा घाट:हळदीचा कार्यक्रम सुरू असताना 16 वर्षीय मुलीची सुटका, रामटेक तालुक्यातील घटना

नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे. जिल्हा बाल संरक्षण कक्षाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. घरात वाढदिवसाचा बहाणा करून हळदीचा कार्यक्रम सुरू असतानाच बाल संरक्षण पथकाने छापा टाकून मुलीची सुटका केली. बाल संरक्षण पथकाने सुरुवातीला मुलीच्या घरी भेट दिली असता ती तिथे नव्हती….

Read More

महाराणी सईबाई म्हणजे स्वराज्यास लाभलेली प्रेमळ सावली- निर्मळ:शिवछत्रपती महाविद्यालयामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन‎

सतराव्या शतकातील महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी सईबाई यांचा विवाह म्हणजे हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीची महत्त्वपूर्ण राजकीय आणि सामाजिक पायाभरणी होती. महाराणी सईबाई निंबाळकर म्हणजे खऱ्या अर्थाने स्वराज्याला लाभलेल्या एक प्रेमळ आणि खंबीर सावली होत्या असे प्रतिपादन बबनराव निर्मळ यांनी केले. पुणे येथील ऐतिहासिक लाल महालामध्ये १६ मे १६४० रोजी छत्रपती शिवाजी महाराज आणि…

Read More

अर्थखाते मागूनही मिळत नसल्याची सुनेत्रा पवारांची खंत:CM देवेंद्र फडणवीस म्हणाले- माझ्यापर्यंत त्यांची कोणतीही नाराजी आलेली नाही

तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठे बदल झाले असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सूत्रे आणि राज्याचे उपमुख्यमंत्रिपद त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे आले आहे. सध्या पक्षवाढीसह स्वतःचे नेतृत्व सिद्ध करण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे. मात्र, उपमुख्यमंत्रिपद मिळूनही अजितदादांकडे असलेले महत्त्वाचे अर्थखाते अद्याप सुनेत्रा पवार यांना देण्यात आलेले नाही. अर्थखाते न मिळाल्यावरून सुनेत्रा पवार…

Read More

संशोधन, आधुनिक तंत्रज्ञानावर भर देणे आवश्यक:व्यवस्थापकीय संचालक दिलीप स्वामी यांचे शेतकऱ्यांना आवाहन‎

प्रतिनिधी | अकोला महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज) या संस्थेचा ५० वा सुवर्णमहोत्सवी वर्धापन दिन महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील डॉ. के. आर. ठाकरे सभागृहात उत्साहात साजरा करण्यात आला. महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप स्वामी यांनी संस्थेच्या सुवर्णप्रवासाचा आढावा सादर केला. वाढती स्पर्धा, बाजारातील आव्हाने लक्षात घेता संशोधन, संकरित वाण, जैविक उत्पादने…

Read More

गुरूकुंज मोझरी गावामधून जाणारी पहाटेची अमरावती-गोंदिया बस बंद:दररोजच्या प्रवाशांचे होतायेत हाल, बस पुर्ववत सुरू करण्याची मागणी‎

गेल्या ३० वर्षांपासून अविरत सुरू असलेली अमरावती-नागपूर-गोंदि या ही पहाटेची महत्त्वाची बस सेवा मागील दोन आठवड्यांपासून अचानक बंद करण्यात आली आहे. यामुळे या मार्गावरील असंख्य प्रवाशांचे हाल होत असून, संतप्त प्रवाशांनी मोझरी बसस्थानक व्यवस्थापक तसेच विभागीय वाहतूक नियंत्रण, भंडारा यांना निवेदन सादर केले आहे. अमरावती मुख्य बसस्थानकावरून दररोज पहाटे ५:१५ वाजता सुटणारी ही बस अमरावती,…

Read More