Headlines

सातारा झेडपीत वाहन घोटाळ्यावरून राजकारण तापले:राजू शेळकेंचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा, उच्चस्तरीय चौकशीची मागणी

सातारा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील वाहनांच्या कायदेशीर कागदपत्रांच्या मुद्द्यावरून जिल्ह्यातील राजकारण तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. जिल्हा परिषद सदस्य तथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र (राजू) शेळके यांनी प्रशासनासह सत्ताधारी पदाधिकाऱ्यांवर गंभीर प्रश्न उपस्थित करत या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. जिल्हा परिषदेच्या ताब्यातील १०२ रुग्णवाहिकांसह अनेक वाहनांचे विमा, फिटनेस, पासिंग, पीयूसी आदी…

Read More

'मला नाही वाटत की ती आत्महत्या होती':अभिनेता शिशिर शर्मा म्हणाले- सुशांत सिंह राजपूत असे व्यक्ती नव्हते जे आत्महत्येसारखे पाऊल उचलतील

‘छिछोरे’ चित्रपटात सुशांत सिंह राजपूतसोबत काम केलेले अभिनेते शिशिर शर्मा यांनी त्यांच्या मृत्यूबाबत सांगितले की, सुशांत आत्महत्या करू शकतात यावर त्यांचा कधीच विश्वास बसला नाही. सिद्धार्थ कन्नन यांना दिलेल्या मुलाखतीत शिशिर शर्मा यांनी सांगितले की, त्यांची आणि सुशांतची ओळख टीव्हीच्या दिवसांपासून होती. जेव्हा ते ‘यहां मैं घर घर खेली’ मध्ये काम करत होते आणि सुशांत…

Read More

राघव चड्ढा यांनी आप (AAP) सोडून भाजपमध्ये प्रवेश केला:सायन्सचा ऑस्कर जिंकणारे डॉ. अतनु यांना 30 लाख मिळतील, 25 एप्रिलच्या चालू घडामोडी

आजच्या प्रमुख चालू घडामोडी जाणून घ्या, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत… राष्ट्रीय (NATIONAL) 1. राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला 24 एप्रिल रोजी पंजाबमधील ‘आप’चे राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी भाजपमध्ये सामील होण्याची घोषणा केली. 2. सरकारने एव्हिएशन इंधनात इथेनॉल मिसळण्यास मंजुरी दिली 23 एप्रिल रोजी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू…

Read More

सलमान खानने ‘लोनली’ पोस्टवर स्पष्टीकरण दिले:म्हणाला- लोकांसोबत राहून मी कंटाळतो; आईने विचारले- काय झाले बेटा?

बॉलिवूड अभिनेता सलमान खानने त्याच्या व्हायरल ‘अलोन’ आणि ‘लोनली’ पोस्टवर स्पष्टीकरण दिले आहे. त्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले की, मी माझ्याबद्दल बोलत नव्हतो. इतक्या मोठ्या कुटुंबात आणि मित्रांमध्ये मी एकटा कसा असू शकेन? तुमच्या शुभेच्छा आणि प्रेम माझ्यासोबत आहे. त्याने पुढे विनोदी शैलीत लिहिले की, कधीकधी सतत लोकांमध्ये राहून तो थकून जातो, त्यामुळे…

Read More

'माधुरी' हत्तीच्या घरवापसीसाठी राजू शेट्टींचे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण:निर्णय होऊनही परतीस विलंब झाल्याचा आरोप

नांदणी मठातील ‘माधुरी’ हत्तीला वनतारा येथे हलवून एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी तिच्या घरवापसीसाठी एकदिवसीय उपवास आंदोलन सुरू केले आहे. सर्वोच्च न्यायालय, हाय पॉवर कमिटी आणि वनतारा प्रशासनाने माधुरीला नांदणी मठात परत पाठवण्याबाबत निर्णय झाल्याचा दावा करत, प्रत्यक्षात मात्र अद्याप हत्ती परत न आल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली…

Read More

‘जानुबाईच्या नावानं चांगभलं' च्या जयघोषात भोसे नगरी दुमदुमली:पारंपरिक वाद्ये, लेझीम पथक आणि फटाक्यांच्या आतषबाजीत छबिना‎

“जानुबाईचं चांगभलं… कोकणच्या आईचं चांगभलं…” अशा भक्तिमय जयघोषात, नवसाला पावणारी व भक्तांच्या हाकेला धावणारी भोसे (ता. पंढरपूर) येथील श्री जानुबाई देवीची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. हलगी, लेझीम आणि गजीढोल अशा पारंपारिक वाद्यांच्या गजराने संपूर्ण गाव भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाले होते. यात्रेचा प्रारंभ गुरुवार (दि. ७) रोजी रात्री बारा वाजता देवीच्या महापूजेने झाला. तत्पूर्वी गायकवाड…

Read More

येत्या 10 दिवसात शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार:कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंची मोठी घोषणा, अहिल्यानगरमध्ये केले मोठे विधान

अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि दिलासादायक घोषणा केली आहे. राज्य सरकारने राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर केली असून, येत्या 8 ते 10 दिवसांत या कर्जमाफीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली जाईल, अशी महत्त्वपूर्ण माहिती भरणे…

Read More

अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर:1 ऑगस्टला पुण्यात अमित शहा यांच्या हस्ते वितरण

देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना यंदाचा प्रतिष्ठेचा ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. देशाच्या सुरक्षा व्यवस्थेला बळकटी देण्यासह दहशतवादविरोधी कारवाया आणि गुप्तचर क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. रोहित टिळक यांनी सोमवारी पुण्यात पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. लोकमान्य टिळक यांच्या…

Read More

नामकर्ण आवारे भोंदू खरातच्या भूखंड व्यवहारांचा 'मास्टरमाईंड':आवारे सध्या पोलिस कोठडीत; पोलिसांकडून सर्वच व्यवहारांचा कसून शोध

भोंदू अशोक खरातने पतसंस्थांमधील बोगस खात्यांतून कोट्यवधींची जमीन खरेदी केली. पण आता या जमीन खरेदीचा मास्टरमाईंड हा खरातच्या शिवनिका ट्रस्टचा माजी सचिव नामकर्ण आवारे हा असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता गंभीर वळण मिळाले आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, कोपरगाव येथील समता पतसंस्थेत भोंदू अशोक खरातशी संबंधित काही बोगस खाती समोर आली आहेत. या…

Read More

गुरुग्राममध्ये अँबियन्स मॉलमध्ये पोहोचला अभिनेता राजकुमार राव:चित्रपट टोस्टरची सह-अभिनेत्री सानियासोबत परफॉर्मन्स, चाहत्यांसोबत सेल्फी घेतली

गुरुग्राम शहरात रविवारी संध्याकाळी उशिरा बॉलिवूड स्टार राजकुमार राव आणि त्यांची सह-अभिनेत्री सान्या मल्होत्रा एम्बियन्स मॉलमध्ये पोहोचले. त्यांनी चाहत्यांसोबत खूप वेळ घालवला आणि आगामी चित्रपट ‘टोस्टर’बद्दल मनोरंजक चर्चा केली. राजकुमार राव गुरुग्रामचे मूळ रहिवासी आहेत आणि त्यांच्या एका जुन्या शालेय मित्राने त्यांना विचारले, “भाऊ, ब्लू बेल्सचे दिवस आठवतात का?” राजकुमार राव यांनी हसून उत्तर दिले…

Read More