Headlines

पाथर्डीत वादळी वारा अन् गारपिटीचा तडाखा:पत्रे उडाली, गावांत वीज गुल, अवकाळी संकटामुळे नागरिकांची उडाली तारांबळ,मदतीची मागणी‎

पाथर्डी तालुक्यासह शहरात सोमवारी रात्री वादळी वाऱ्यासह गारपीटयुक्त पावसाने जोरदार हजेरी लावली. जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी झालेल्या या अवकाळी संकटामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. तालुक्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले असून शहरात काही ठिकाणी फ्लेक्स बोर्ड कोसळले. तसेच अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना रात्रभर अंधाराचा सामना करावा लागला. सोमवारी संध्याकाळनंतर अचानक हवामान…

Read More

चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली:छातीत वेदना, डोकेदुखी, मळमळ, उलट्यांचा त्रास; कार्डियाक अ‍ॅम्ब्युलन्स बोलावली

दैवी शक्तीचा दावा करत महिलांचे शोषण आणि आर्थिक फसवणूक केल्याच्या आरोपांमध्ये अडकलेल्या भोंदूबाबा अशोक खरात याच्या चौकशीत नवा वळण आले आहे. विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) सुरू असलेल्या चौकशीदरम्यान अचानक त्याची प्रकृती बिघडल्याने एकच खळबळ उडाली. छातीत वेदना, डोकेदुखी, मळमळ आणि उलट्यांचा त्रास सुरू झाल्याने पोलिसांना तातडीने वैद्यकीय मदत बोलवावी लागली. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून…

Read More

दो बुंद जिंदगी के:शहरात 196 बूथवर 34,594 बालकांचे पहिल्या दिवशी केले पोलिओ लसीकरण, आणखी 5 दिवस सुरू राहणार मोहीम

केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार २८ जूनला संपूर्ण देशभर राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम राबवण्यात आली. पहिल्या दिवशी जळगावला ३४ हजाराहून अधिक बालकांना लस देण्यात आली. जिल्ह्यात ४ लाखांहून अधिक बालकांना पोलिओचा डोस पाजण्याचे उद्दिष्ट असून, पहिल्याच दिवशी प्रत्येक केंद्रावर नागरिकांकडून प्रतिसाद मिळाला. शहरात महापालिका रुग्णालयांसह जीएमसी व प्रत्येक कॉलनी परिसरात असे १९६ बूथ तयार केले…

Read More

शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा:जमिनीच्या कौटुंबिक वाटणीची मोजणी आता अवघ्या 200 रुपयांत, शासनाचे नवे धोरण जाहीर

राज्यातील सर्वसामान्य शेतकरी आणि जमीनधारकांना मोठा दिलासा देत राज्य सरकारने जमीन मोजणीच्या प्रक्रियेसंदर्भात एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे, आता कुटुंबातील जमिनीच्या वाटणीची मोजणी प्रति पोटहिस्सा अवघ्या 200 रुपयांत केली जाणार आहे. जमीन मोजणीच्या प्रक्रियेतील विलंब आणि भ्रष्टाचाराला आळा घालण्याच्या…

Read More

खरीप पिकांवर संकट; मृग नक्षत्र कोरडे; बळीराजा चिंतेत:आर्द्रा नक्षत्राच्या सुरुवातीला दमदार पावसाची गरज; अनेक भागांत धुरळा‎

रोहिणी नक्षत्र कोरडे गेल्यानंतर त्यापाठोपाठ मृग नक्षत्रही पूर्णपणे कोरडे गेल्यामुळे महान व परिसरातील बळीराजा प्रचंड चिंतेत पडला आहे. खरिपातील मूग आणि उडदाची पेरणी मृग नक्षत्रात करणे अत्यंत महत्त्वाचे असते; मात्र पावसाने दगा दिल्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर पेरण्या करता आलेल्या नाहीत. बार्शिटाकळी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हजारो हेक्टर क्षेत्रावरील जमीन मशागत करून पेरणीसाठी सज्ज ठेवली आहे. मात्र, वरुणराजाने पूर्णपणे…

Read More

मुंढवाप्रकरणी पार्थ पवारांच्या अमेडियास 21 कोटी दंड कायम:प्राधिकरणाने कंपनीचे अपील फेटाळले

पुण्यातील मुंढवा येथील १८८० कोटी रुपयांच्या ४० एकर सरकारी जमीन गैरव्यवहार प्रकरणात खासदार पार्थ पवार यांच्या ‘अमेडिया एंटरप्रायजेस एलएलपी’ कंपनीचे अपील महाराष्ट्र राज्याच्या मुख्य महसूल नियंत्रक प्राधिकरणाने फेटाळून लावले. पार्थ यांच्या कंपनीला २१ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क आणि दंड भरण्याचे आदेश कायम ठेवले आहेत. मात्र, या आदेशाविरुद्ध त्यांना ६० दिवसांत महसूलमंत्र्यांकडे अपिल करण्याची मुभा आहे….

Read More

CJP Protest Jantar Mantar | NEET Paper Leak; Demand Education Minister

नवी दिल्ली6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक NEET पेपरफुटीच्या विरोधात कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे जंतर-मंतरवर आंदोलन सोमवारी तिसऱ्या दिवशीही सुरू आहे. आंदोलक शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. आंदोलनाचे नेतृत्व CJP चे संस्थापक अभिजीत दीपके आणि त्यांचे समर्थक करत आहेत. त्यांनी व्हिडिओ जारी करत म्हटले की, हजारो लोक जंतर-मंतरवर येत आहेत आणि हे आंदोलन…

Read More

तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली:आता अन्न-औषध प्रशासनाच्या मैदानात; भ्रष्टाचाराच्या आरोपांनी गाजलेल्या खात्यात सरकारकडून जबाबदारी

राज्य प्रशासनात आपल्या कडक कार्यपद्धती आणि धडाकेबाज निर्णयांसाठी ओळखले जाणारे वरिष्ठ आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. वारंवार होणाऱ्या बदल्यांमुळे नेहमी चर्चेत राहणाऱ्या मुंढे यांनी आता अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारण्याची तयारी केली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या कारकिर्दीतील ही 25वी बदली ठरली आहे. त्यामुळे प्रशासनात पुन्हा एकदा चर्चांना…

Read More

आढावा बैठक:इतके निष्क्रिय अधिकारी प्रथमच पाहतोय, काम शासनासाठी करता की ठेकेदारांसाठी

अकोले तालुक्यातील गंभीर पाणीटंचाई आणि रखडलेल्या विकासकामांवरून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रविवारी प्रशासनाचे वाभाडे काढले. “इतके निष्क्रिय अधिकारी मी पहिल्यांदाच पाहत आहे. लोकांना पिण्याचे पाणी मिळत नाही, तरी प्रशासनाला फरक पडत नाही. अधिकारी सरकारसाठी काम करतात की ठेकेदारांसाठी?” अशा शब्दांत विखे पाटलांनी आपला संताप व्यक्त केला. येथील विठ्ठल लॉन्सवर आयोजित प्रशासकीय आढावा बैठकीत ते…

Read More

टंचाई कायम:हरसुलला खतांसाठी पहाटेपासून रांगा, बफर स्टॉक सर्वसामान्यांना खुला करण्याची मागणी‎

या आदिवासीबहुल परिसरामध्ये भात लागवडीच्या ऐन हंगामात खतांची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. खत मिळवण्यासाठी पुन्हा एकदा शेतकऱ्यांमध्ये मोठा गोंधळ उडाला. दिवसभरात कृषी विभागाच्या मध्यस्थीनंतर सहकारी संस्था व खत विक्रेत्यांना ६८३ गोणी खताचे वाटप करण्यात आले असले, तरी परिस्थिती अद्यापही तणावपूर्ण आहे. सहकारी संस्थेत केवळ सभासदांनाच खत दिले जात असल्याने सर्वसामान्य शेतकरी खासगी विक्रेत्यांवर अवलंबून…

Read More