Headlines

अजित पवारांच्या मृत्यूशी अशोक खरातचा संबंध!:मृत्यूच्या 6 दिवस आधी खरातने बदलले 4 मोबाईल, अंजली दमानियांचा दावा

अजित पवार यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणात अशोक खरात याची सविस्तर चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या मृत्यूच्या अवघे 6 दिवस आधी अशोक खरातने तब्बल 4 मोबाईल फोन बदलल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या संशयास्पद हालचालींमुळे अजित पवार यांच्या मृत्यूचा थेट संबंध खरातशी असल्याची दाट…

Read More

अमरावती पोलिसांना मिळाले 'कुलिंग जॅकेट':उन्हाळ्यात वाहतूक नियंत्रण सोपे करण्यासाठी अभिनव उपाय

अमरावती शहरात वाढत्या तापमानामुळे वाहतूक पोलिसांना आता ‘कुलिंग जॅकेट’चा दिलासा मिळाला आहे. भर उन्हात चौकाचौकात वाहतूक नियंत्रण करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही जॅकेट अत्यंत उपयुक्त ठरत आहेत. यामुळे त्यांना उन्हाळ्यात कर्तव्य बजावणे सोपे होणार आहे. अमरावतीचे पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला आहे. शहरातील वाहतूक शाखेतील तिन्ही विभागांमधील सुमारे दीडशे वाहतूक पोलिसांना ही…

Read More

अमरावतीत 'लव्ह, ड्रग्ज, खनिज जिहाद' फोफावला:डॉ. प्रवीण तोगडियांचा आरोप; सरकार योग्य दिशेने काम करत असल्याचेही म्हटले

आंतरराष्ट्रीय विश्व हिंदू परिषदेचे संस्थापक डॉ. प्रवीण तोगडिया यांनी अमरावती शहरात ‘लव्ह जिहाद’, ‘ड्रग्ज जिहाद’ आणि ‘खनिज जिहाद’ फोफावल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. मात्र, त्याचवेळी हा ‘जिहाद’ थांबवण्यासाठी सरकार योग्य दिशेने प्रयत्न करत असल्याचे सांगून त्यांनी अनेकांना बुचकळ्यात पाडले. देशभरात एक लाख ठिकाणी हनुमान चालीसा पठण सुरू करण्याच्या उद्देशाने गेल्या सहा महिन्यांपासून देशाटन करत असलेले डॉ….

Read More

MPESB 1200 Posts Recruitment | Maharashtra Civil Judge & Delhi Health Jobs

6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आजच्या सरकारी नोकरीमध्ये माहिती MPESB मध्ये 1200 पदांवर भरतीची, भावनगर म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये 120 रिक्त जागांची. तसेच ISRO मध्ये 15 जागांची. या नोकऱ्यांबद्दल संपूर्ण माहितीसह अर्ज करण्याची प्रक्रिया येथे पहा… 1. MPESB मध्ये 1200 भरतीची अधिसूचना जारी, वयोमर्यादा 40 वर्षे मध्य प्रदेश कर्मचारी निवड मंडळाने (MPESB) 1200 पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी केली…

Read More

‘धुरंधर’च्या स्क्रिप्ट चोरी प्रकरणात आदित्य धर यांना दिलासा:हायकोर्टाने 16 एप्रिलपर्यंत संतोष कुमार यांना पुन्हा आरोप करण्यापासून रोखले

मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी चित्रपट निर्माता संतोष कुमार यांच्या विरोधात अंतरिम आदेश पारित केला आहे. या आदेशानुसार, त्यांना ‘धुरंधर’ आणि त्याच्या सिक्वेल ‘धुरंधर: द रिव्हेंज’ या चित्रपटांच्या पटकथा चोरीच्या आरोपांची पुनरावृत्ती करण्यापासून किंवा चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य धर यांच्या विरोधात कोणतेही बदनामीकारक (defamatory) विधान करण्यापासून तात्पुरते रोखण्यात आले आहे. न्यायमूर्ती आरिफ एस. डॉक्टर यांच्या खंडपीठाने आदित्य…

Read More

विदर्भाच्या विकासाला गती!:547 किमीच्या चार द्रुतगती महामार्गांना मुख्यमंत्र्यांची मंजुरी, 51,906 कोटींचा प्रकल्प

महाराष्ट्राची पूर्व व पश्चिम सीमा शिघ्रसंचार द्रुतगती महामार्गाने जोडण्यासाठी विदर्भातील 547 कि.मी.च्या चार प्रवेश द्रुतगती महामार्ग प्रकल्पांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. हे प्रकल्प जलदगतीने व वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात पायाभूत सुविधा समितीची बैठक झाली. यावेळी…

Read More

महात्मा फुले यांच्या जयघोषाने दुमदुमली अंबानगरी:महात्मा फुले यांच्या मानवतावादी विचारांना व्यापक स्तरावर पोहचवा- प्रा. श्रीकृष्ण बनसोड‎

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयघोषाने अंबानगरी अक्षरशः दुमदुमली. सामाजिक न्याय, समता आणि शिक्षणाच्या लढ्याचे प्रतीक असलेल्या महात्मा फुले यांच्या शहरातील पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. विविध संघटना, महिला आणि समाजबांधवांनी एकत्र येत कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. “शिका, संघटित व्हा, संघर्ष करा” या विचारांनी प्रेरित होत वातावरण भारावून गेले. ‘उपेक्षित समाज महासंघा’तर्फे…

Read More

वंचित घटकांत योजना पोहोचविण्यास अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दक्षता घ्यावी:कन्नडला महाराजस्व अभियानाचा उत्साहात समारोप‎

शासनाच्या योजना दुर्गम भागात आणि वंचित घटकात पोहचविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानातून जनजागृती करण्यात येत आहे. अधिकारी कर्मचाऱ्यांनीही त्यासाठी दक्षता घ्यावी असे आवाहन उपविभागीय अधिकारी संतोष गोरड यांनी शुक्रवारी महाराजस्व अभियानाच्या समारोप प्रसंगी केले. छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या इनडोअर सभागृहात आजपर्यंत दहा मंडळात झालेल्या महाराजस्व अभियानाचा समारोप करण्यात आला. यावेळी उपविभागीय अधिकारी गोरड म्हणाले, शासनाने…

Read More

विदर्भाला उष्णतेचा प्रचंड तडाखा:अमरावती-वर्ध्यात पारा 46 अंशाच्या पार; कोणत्या जिल्ह्यात किती तापमान?

राज्यातील हवामानात सध्या कमालीचे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. काही भागांत ढगाळ वातावरण निर्माण झाले असतानाच, विदर्भासह बहुतांश महाराष्ट्रात उन्हाचा चटका प्रचंड वाढला आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा तब्बल ४६ अंशाच्या पुढे गेल्याने नागरिक होरपळून निघाले आहेत. दरम्यान, या तीव्र उष्णतेच्या लाटेतच संपूर्ण देशासाठी आणि बळीराजासाठी एक अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे….

Read More

जागतिक पातळीवर पंतप्रधान 'रिजेक्ट माल'!:कॉंग्रेस नेते नाना पटोलेंची नरेंद्र मोदींवर टीका, म्हणाले- त्यांच्यामुळे देशाची मान शर्मेने खाली गेली

सर्वोच्च न्यायालयातील एका सुनावणीदरम्यान न्यायमूर्तींनी तरुण पिढीचा उल्लेख ‘कॉकरोच’ असा केल्याच्या पार्श्वभूमीवर आणि सोशल मीडियावर सुरू असलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या ट्रेंडचा संदर्भ देत, काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. देशाच्या तरुण पिढीला अशा प्रकारची उपमा दिली जाणे अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगत, तरुणांचा सातत्याने होणारा अपमान आणि वाढती बेरोजगारी यामुळेच आजच्या…

Read More