Headlines

छत्रपती संभाजीनगरमध्ये बालविवाह, नशामुक्ती अभियान सुरू:विद्यार्थ्यांच्या प्रभात फेरीतून सामाजिक संदेश दिला

छत्रपती संभाजीनगर येथे शिक्षण विभाग आणि श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने बालविवाह निर्मूलन व नशामुक्त अभियानाची सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्ती, बालविवाह प्रतिबंध आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. हे अभियान १३ जुलै ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य…

Read More

पुणे फेस्टिव्हलच्या अध्यक्षपदी कृष्णकुमार गोयल:मीरा कलमाडी चेअरपर्सन, डॉ. सतीश देसाई सेक्रेटरी निवड

पुण्याचे नाव जागतिक पर्यटन नकाशावर नेणाऱ्या पुणे फेस्टिव्हलचे संस्थापक अध्यक्ष खा. सुरेश कलमाडी यांच्या निधानानंतर पुणे फेस्टिव्हलच्या विश्वस्तांची पहिली बैठक मंगळवारी संपन्न झाली. त्यामध्ये कै. सुरेश कलमाडी यांना श्रद्धांजली वाहून त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. विश्वस्तांच्या या बैठकीत पुणे फेस्टिव्हलच्या अध्यक्षपदी कृष्णकुमार गोयल, चेअरपर्सन पदी मीरा कलमाडी, व सेक्रेटरीपदी डॉ. सतीश देसाई यांची एकमताने निवड…

Read More

65 तांडा वस्त्यांची विकासकामे रखडली, 5 बीडीओ रडारवर:पालकमंत्र्यांनी ग्रामविकास मंत्र्यांशी संपर्क साधला; सीईओंना चौकशीचे आदेश

अमरावती जिल्ह्यात तांडा वस्ती सुधार योजनेंतर्गत ६५ वस्त्यांमध्ये करावयाची विकासकामे रखडली आहेत. निविदा प्रक्रिया वेळेत राबवली न गेल्याने सुमारे ५ कोटी ९५ लाख रुपयांची कामे थांबली आहेत. या हयगयीमुळे जिल्ह्यातील ९ पंचायत समित्यांचा कारभार सांभाळणाऱ्या ५ गटविकास अधिकाऱ्यांवर (BDO) कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या बीडीओंच्या कार्यक्षेत्रातील २२ ग्रामपंचायतींच्या हद्दीतील ६५ तांड्यांवर रस्ते, नाल्या,…

Read More

अमरावती जिल्ह्यात 24 तासांत 11.7 मिमी पाऊस:चांदूर रेल्वे तालुक्यात सर्वाधिक 30.6 मिमी पावसाची नोंद

अमरावती जिल्ह्यातील १४ तालुक्यांमध्ये गेल्या २४ तासांत सरासरी ११.७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. महसूल विभागाने मंगळवारी सकाळी ८ वाजता प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, जिल्ह्यात चांदूर रेल्वे तालुक्यात सर्वाधिक ३०.६ मिलीमीटर पाऊस पडला. गेल्या दहा दिवसांच्या उघडीपनंतर सोमवारी सायंकाळपासून सुरू झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले असून, दुबार पेरणीचे संकट काही…

Read More

विभागीय आयुक्तांनी छत्रपती संभाजीनगरमधील मतदार यादी कामाचा घेतला आढावा:अचूक व त्रुटीमुक्त यादीसाठी कालमर्यादेचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी आज भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील मतदार यादी कामाचा सविस्तर आढावा घेतला. मतदार यादी अचूक, अद्ययावत आणि त्रुटीमुक्त करण्यासाठी प्रत्येक टप्प्यातील काम निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. तसेच, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्या कामाचे नियमित परीक्षण करून प्रगतीवर लक्ष ठेवण्यासही…

Read More

600 नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी:निरोगी जीवनशैली, संतुलित आहार यावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन

छत्रपती संभाजीनगर येथे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात ६०० हून अधिक नागरिकांनी मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. सर्वसामान्य नागरिकांना एकाच छताखाली आरोग्य तपासणी आणि आयुष्मान कार्ड काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. या शिबिरात ३५० हून अधिक नागरिकांनी थेट आरोग्य तपासणी करून घेतली,…

Read More

राष्ट्रवादी शिष्टमंडळाची पोलीस आयुक्तांशी भेट:पुणे शहरातील गुन्हेगारी, वाहतूक प्रश्नांवर सविस्तर चर्चा

पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी, कायदा व सुव्यवस्था आणि वाहतुकीच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतली. सुमारे ६५ मिनिटे चाललेल्या या बैठकीत शहरातील सुरक्षाव्यवस्था, पोलिसांकडून सुरू असलेल्या कारवाया आणि वाहतूक नियोजनासह विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हेगारीला आळा…

Read More

काँग्रेस काळातही पेपर फुटले- डॉ. नीलम गोऱ्हे:परीक्षा व्यवस्था पारदर्शक असावी, राजकारण टाळावे

आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुणे येथे पत्रकार परिषदेत परीक्षांमधील गैरप्रकार आणि विद्यार्थी आंदोलनावर भाष्य केले. परीक्षा व्यवस्था पारदर्शक असावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी योग्य असल्याचे त्यांनी नमूद केले. गोऱ्हे म्हणाल्या की, दिल्लीत कोकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू आहे. सरकारने परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला असला तरी, या मुद्द्यावर राजकारण केले जात आहे. काँग्रेसच्या काळातही अनेकदा पेपर…

Read More

पुणे भाजपद्वारे रक्तदान महायज्ञ; 1 लाख बाटल्यांचे उद्दिष्ट:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन

पुणे शहर भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान महायज्ञाचे आयोजन केले आहे. महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा लक्षात घेता, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी १ लाख रक्ताच्या बाटल्या संकलित करण्याचा संकल्प केला आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत भाजपने राज्यभरात मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरे आयोजित केली आहेत. पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या ५६व्या वाढदिवसानिमित्त २६ मंडळांमध्ये रक्तदान शिबिरे घेण्यात…

Read More

पुण्यात अल्पवयीन मुलाचा धारदार शस्त्राने खून:बहिणीशी वाद झाल्याने टोळक्याने केले वार; सात जणांविरुद्ध गुन्हा

पुण्यातील कात्रज परिसरात बहिणीशी झालेल्या वादातून टोळक्याने एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचा धारदार शस्त्राने वार करून खून केला. गणेश रवींद्र माळवे (वय १७, रा. कात्रज गाव, पुणे) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी या प्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, गणेश रामदास चव्हाण (वय २२, रा. गुजर वस्ती, कात्रज) यांनी फिर्याद…

Read More