Headlines

अपघात प्रकरणात गुन्हा दाखलसाठी मागितली लाच:3 पोलिस जाळ्यात, दहा हजारांची मागणी, 7 हजार घेताना पोलिस ठाण्याच्या आवारातच पकडले‎

अपघात प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या श्रीगोंदे पोलिस ठाण्यातील तीन पोलिस कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. १० हजार रुपयांची मागणी करून तडजोडीनंतर ७ हजार रुपये स्वीकारताना श्रीगोंदे पोलिस ठाण्याच्या आवारात . नितीन अशोक गाडगे, राजेश रावसाहेब जाधव आणि शासकीय वाहनचालक उर्वरित पान ४ एसीबीने कारवाई करत नितीन गाडगे व दादाराम म्हस्के यांच्यावर…

Read More

आषाढी एकादशीसह गुरू पौर्णिमेचे लागले वेध:आषाढी एकादशी आटोपली की, गुरू पौर्णिमा केली जाणार साजरी‎

आषाढी एकादशीला भू-वैकुंठ पंढरीच्या सावळ्या विठ्ठलाचे दर्शन घेण्याची ओढ सर्व वारकरी, भाविकांना लागली आहे. यात मध्यमवयीनांसह बहुतेक ज्येष्ठ नागरिक पुरुष व महिला भाविकांचा समावेश आहे. आषाढी एकादशी आटोपली की, गुरू पौर्णिमा साजरी होणार आहे. यासाठी शहरात आतापासूनच नागरिकांकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. अगदी विठूरायाचे नामस्मरण करण्यासाठी टाळ, मृदुंग, विणा, ढोलकी, तबला दुरुस्त किंवा खरेदी…

Read More

साकोरा येथील ग्रामसभेत पाणीटंचाई निवारणासाठी नवीन विहिरीचा ठराव:जलजीवन योजनेतील अपयशावर चर्चा आणि वृक्षलागवड करण्याचा संकल्प‎

गेल्या काही वर्षांपासून जलजीवन योजनेतून पाणीपुरवठा न झाल्याने निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर साकोरा ग्रामसभेत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यामध्ये पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून नवीन सार्वजनिक विहीर घेण्याचा ठराव, ग्रामपालिकेच्या मालमत्तांची फेरआकारणी करून उत्पन्न वाढवण्याचा निर्णय तसेच संभाव्य पाणीटंचाईवर उपाययोजना करण्याचे ठराव मंजूर करण्यात आले. नांदगाव तालुक्यातील साकोरा येथे प्रशासक अतुल बोरसे यांच्या अध्यक्षतेखाली आणि ग्रामविकास…

Read More

मुलीच्या मैत्रिणीवरच नराधम बापाकडून लैंगिक अत्याचार:पीडितेने विष प्रश्न केल्याने खळबळ, आरोपीला अटक; भंडाऱ्यात संतापाची लाट

भंडारा जिल्ह्यातील मोहदुरा गावातून एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली असून, एका अल्पवयीन शाळकरी मुलीवर तिच्याच मैत्रिणीच्या वडिलांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या भीषण कृत्यामुळे मानसिक धक्क्यात असलेल्या पीडित मुलीने विषप्राशन करून टोकाचे पाऊल उचलले असून, सध्या तिच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी वेगाने…

Read More

आनंदीबेन पटेल यांच्या वक्तव्याचे समर्थन केल्याबद्दल कंगना ट्रोल:म्हणाली- जेवण बनवणे आणि काळजी घेणे हा महिलांचा स्वभाव

अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौत यांनी उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्या त्या विधानाचे समर्थन केले आहे, ज्यात त्यांनी महिलांना स्वयंपाक शिकण्याचा सल्ला दिला होता. आनंदीबेन म्हणाल्या होत्या की, महिला शिक्षिका असोत किंवा आयएएस अधिकारी, त्यांना आपल्या कुटुंबासाठी स्वयंपाक करता यायला हवा. यावर कंगनाने आपल्या बालपणीचे उदाहरण देत म्हटले की, जेवण भरवणे आणि काळजी घेणे…

Read More

शिंदेसेनेकडून बाजोरीया यांचा पत्ता कट:अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सईद खान याच्या नावाची घोषणा, महायुतीत धुसफुसीची चिन्हे

परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी नाट्यमय घडामोडी घडल्या. शिंदेसेनेतून उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार असलेल्या माजी आमदार विप्लव बाजोरीया यांचा पत्ता कट होऊन शिंदेसेनेचे अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांची उमेदवारी जाहिर झाली आहे. त्यामुळे आता महायुतीत मतदानावरून धुसफूस होण्याची चिन्हे दिसून लागली आहेत. परभणी- हिंगोली विधान परिषदेची जागा महायुतीमध्ये शिंदेसेनेने सोडवून…

Read More

यंदा 730 विद्यार्थ्यांना मिळणार शेतीविषयक प्रशिक्षण:3 नामांकित संस्थांसोबत सामंजस्य करार; महाज्योतीसाठी 728 कोटींचा निधी मंजूर- सावे

महाज्योतीच्या माध्यमातून यंदाच्या शैक्षणिक वर्षात ७३० विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्राशी संबंधित विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी ३ नामांकित संस्थांसोबत सामंजस्य करार करण्यात आले असून, महाज्योतीसाठी ७२८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची घोषणा बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी केली. विधान परिषदेत सदस्य उमा खापरे यांनी उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेला उत्तर देताना ते…

Read More

भातकुलीतील बोरखडी, इस्माइलपुर ठरले:स्वगणना पूर्ण करणारे जिल्ह्यातील पहिले गाव

अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील बोरखडी बुजुर्ग आणि इस्माईलपूर या दोन गावांनी १०० टक्के स्वगणना पूर्ण करून जिल्ह्यात आघाडी घेतली आहे. ही दोन्ही गावे स्वगणना पूर्ण करणारी जिल्ह्यातील पहिली गावे ठरली आहेत. भारत सरकारच्या जनगणना विभागाने महाराष्ट्र दिनापासून (१ मे) स्वगणना सुरू केली आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी नागरिकांना स्वगणना पूर्ण करण्याचे आवाहन केले होते. या…

Read More

चांदूरबाजारमध्ये काँग्रेसचे पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात आंदोलन:गॅस दरवाढ, नीट पेपरफुटी प्रकरणी तहसीलदारांना निवेदन

चांदूरबाजार येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या तालुका शाखेने पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस सिलिंडरच्या दरवाढीविरोधात तीव्र आंदोलन केले. यावेळी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांचा निषेध करत विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना सादर करण्यात आले. निवेदनात नमूद केल्यानुसार, मे महिन्यात पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या दरात चार वेळा वाढ झाली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा मोठा फटका बसला…

Read More

सावधान! वीज चमकताना त्वरित उकिडवे बसा:वीज चमकताना डोक्याचे केस उभे राहिल्यास खबरदारी घ्या, हवामान विभागाचा 'अलर्ट'

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) आकाशीय विजेपासून बचाव करण्यासाठी नागरिकांना महत्त्वाचा ‘अलर्ट’ जारी केला आहे. पावसाळ्यात वीज पडण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असून, भारतात दरवर्षी विजेच्या धक्क्याने २,५०० हून अधिक नागरिकांचा बळी जातो. या पार्श्वभूमीवर, नागपूर हवामान विभागाने विशेष मार्गदर्शिका प्रसिद्ध केली आहे. हवामान विभागाने विजेच्या तीव्रतेबद्दल माहिती दिली आहे. आकाशातून पडणाऱ्या विजेमध्ये १० लाख ते १…

Read More