Headlines

संभाजीनगरच्या हनुमान टेकडी भागात मद्यपींच्या टाेळक्याने तरुणीची छेड काढल्याने तणाव:आराेपीच्या नातलगाने महिला काॅन्स्टेबलची काॅलर पकडली

शहरातील प्रसिद्ध हनुमान टेकडी परिसरात फिरायला गेलेल्या दोन उच्चशिक्षित तरुणींची मद्यपींच्या टोळक्याने छेड काढली. त्यावर त्यांना जाब विचारल्यावर टोळक्याने तरुणींच्या मित्रावर बिअरच्या बाटलीने हल्ला केला. एवढेच नव्हे तर या मद्यपींच्या नातेवाइकांनी बेगम . या प्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात सूरज सतीश साळवे (२०, रा. प्रगती कॉलनी), आकाश राजू म्हस्के (२३, रा. श्रावस्ती कॉलनी), ऋषिकेश रतन नवगिरे…

Read More

डावपेच:दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तरच शरद पवार गटाला सोबत घेऊ, भाजपची अट, शरद पवारांकडून यापूर्वी आलेले अनुभव लक्षात घेता स्पष्ट संदेश

शरद पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी गट एनडीएमध्ये सामील होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. मात्र, राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आले तरच शरद पवार गटाला एनडीएमध्ये सोबत घेऊ, अशी अट भाजप हायकमांडने टाकली आहे. विलीनीकरण झाले तर सुप्रिया सुळे आणि पार्थ प . शरद पवारांनी यापूर्वी किमान तीनदा भाजपसोबत जाण्याची तयारी दाखवून ऐनवेळी माघार घेतली होती. तो अनुभव…

Read More

नांदेडचे शिक्षक सुनील मोरे आत्महत्या:कार नदीत झोकण्यापूर्वी नांदेडच्या‎ शिक्षकाने चिरला 2 मुलांचा गळा‎‎, भयंकर प्रकार उघड‎‎

वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या‎करत असल्याचे स्टेटस ठेवून दोन मुलांसह ‎‎गोदावरी नदीत कार झोकून देणाऱ्या शिक्षक ‎‎सुनील मोरे यांच्या मृत्यू प्रकरणात एक‎भयानक सत्य समोर आले. मोरे यांनी‎पाण्यात उडी घेण्यापूर्वीच १३ वर्षांची मुलगी ‎‎सारा व ९ वर्षांचा मुलगा सुमीत यांची‎शस्त्राने गळा चिरून खून केल्याचे ‎‎शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले.‎दरम्यान, मोरे यांच्यावर सदोषमनुष्यवधाचा‎गुन्हा नोंदवण्यात आला आहे.‎ भोकर तालुक्यातील बेंबरचे…

Read More

कळवणला मतदार यादी पुनरिक्षणाबाबत मार्गदर्शन:राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना माहिती‎

तालुक्यातील मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी, मतदार यादी अद्ययावत करण्याबाबत जनजागृती तसेच पक्ष संघटना अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शक्तीस्थळ, दळवट येथे संघटनात्मक आढावा बैठक उत्साहात पार पडली. यावेळी उपजिल्हाधिकारी हरिष भामरे आणि तहसीलदार रोहिदास वारुळे यांनी मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेबाबत उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले….

Read More

रुग्णालयातही वांगचुक यांचे उपोषण सुरू:त्यांना जंतर-मंतरवरून उचलण्यासाठी ठाण्यात रिहर्सल; उद्या CJP चा संसद मार्च, पण परवानगी नाही

दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखल सोनम वांगचुक यांचे उपोषण अजूनही सुरू आहे. त्यांनी सलाईन, ओआरएस आणि औषधे घेण्यास नकार दिला आहे. नीट पेपरफुटी प्रकरणात जबाबदारी निश्चित करावी आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, या मागणीच्या समर्थनार्थ वांगचुक २८ जूनपासून आमरण उपोषणावर आहेत. शनिवारी सकाळी दिल्ली पोलिसांनी त्यांना जंतर-मंतरवरून उचलून सफदरजंग रुग्णालयात नेले होते. त्यानंतर…

Read More

भाम धरण घाटमाथ्यावरील ‘सुनाकडा' धबधबा रौद्ररुपात

तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भाम धरणाच्या घाटमाथ्यावरील प्रसिद्ध सुनाकडा धबधबा जोरदार प्रवाहित झाला आहे. पावसाच्या पाण्यामुळे धबधब्याने रौद्र रूप धारण केले असून, त्याचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी निसर्गप्रेमींची उत्सुकता वाढली आहे. रस्त्याच्या कडेला आणि सुनसान परिसरात असलेल्या या धबधब्याला स्थानिकांनी ‘सुनाकडा’ हे नाव दिले आहे. सध्या पाण्याचा वेग मोठ्या प्रमाणात वाढल्याने धबधबा अधिकच आकर्षक दिसत…

Read More

कापूस लागवडीत आधुनिक तंत्रज्ञान अवलंबा:विखरणमध्ये कापूस क्रांती अभियान; उपकृषी अधिकारी साळुंखेंचे आवाहन‎

“राज्य शासनाच्या कापूस उत्पादकता (कापूस क्रांती) अभियानाचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढवणे हा आहे. कापसाची लागवड करताना ९० बाय १५ आणि ९० बाय ३० सेंटीमीटर अंतराचे तंत्र अवलंबल्यास झाडांची योग्य वाढ होऊन उत्पादनात निश्चितच मोठी वाढ होते,” असे प्रतिपादन उपकृषी अधिकारी किशोर साळुंखे यांनी केले. एरंडोल तालुक्यातील विखरण येथील माळी समाज…

Read More

पावसाच्या खंडामुळे पिकांची वाढ खुंटली; जलस्रोतांवर वाढला ताण:नांदगाव तालुक्यात 65 हजार हेक्टरवरील पिके धोक्यात‎

जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसानंतर नांदगाव तालुक्यात पुन्हा पावसाने दडी मारल्याने सुमारे ६५ हजार हेक्टरवरील खरीप पिके धोक्यात आली आहेत. शेतातील ओलावा झपाट्याने कमी होत असून, मका, बाजरी, सोयाबीन, मूग आणि तूर पिके करपण्याच्या मार्गावर आहेत. उशिरा पेरलेले बियाणे कुजू लागल्याने शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. जून महिना जवळपास कोरडाच गेल्याने खरीप हंगामाची…

Read More

भेंडाळा गावाजवळ अपघात;‎गोसावीपांगरी येथील दोघे ठार‎:दुचाकीची आयशरला मागून धडक, नोकरीसाठी दोघेही निघाले होते पुण्याला

गंगापूर छत्रपती संभाजीनगर-पुणे महामार्गावर शुक्रवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास झालेल्या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. भेंडाळा गावाजवळील रॉयल पॅलेस हॉटेलसमोर हा अपघात घडला. रितेश राजेश राठोड (२३) आणि अविनाश केशव चव्हाण (२४, दोघे रा. गोसावी पांगरी, ता. मंठा, जि. जालना) अशी मृतांची नावे आहेत मिळालेल्या माहितीनुसार, दोघेही तरुण (एमएच २१ सीएल ६७७१) क्रमांकाच्या दुचाकीवरून…

Read More

गंगापूरमध्ये खरिपाच्या 43 टक्केच पेरण्या:पावसाची 47 टक्के तूट, 50 हजार हेक्टरवरील पिके संकटात‎

गंगापूर तालुक्यात यंदा पावसाळा एक महिना उशिरा सुरू झाला, त्यातच पावसाची मोठी तूट निर्माण झाल्याने खरीप हंगाम संकटात सापडला आहे. आतापर्यंत खरिपाच्या वार्षिक पेरणी क्षेत्राच्या अवघ्या ४३ टक्केच पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. ५७ टक्के पेरण्या अजूनही खोळंबल्या आहेत. गेल्या आठवडाभरापासून पावसाने पूर्णपणे उघडीप दिल्याने आधीच पेरलेली ४९ हजार ८०० हेक्टरवरील पिके धोक्यात आली आहेत. गंगापूर…

Read More