पावसाच्या खंडामुळे पिकांची वाढ खुंटली; जलस्रोतांवर वाढला ताण:नांदगाव तालुक्यात 65 हजार हेक्टरवरील पिके धोक्यात
जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसानंतर नांदगाव तालुक्यात पुन्हा पावसाने दडी मारल्याने सुमारे ६५ हजार हेक्टरवरील खरीप पिके धोक्यात आली आहेत. शेतातील ओलावा झपाट्याने कमी होत असून, मका, बाजरी, सोयाबीन, मूग आणि तूर पिके करपण्याच्या मार्गावर आहेत. उशिरा पेरलेले बियाणे कुजू लागल्याने शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. जून महिना जवळपास कोरडाच गेल्याने खरीप हंगामाची…