तलावांना कुंपण घालण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश:अपघातांची मालिका रोखण्यासाठी प्रशासनाची मोठी पावले
अमरावती जिल्ह्यात तलावांना सुरक्षा कुंपण नसल्यामुळे होणारे अपघात रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी जिल्ह्यातील सर्व १४ तहसीलदारांना तातडीने तलावांना कुंपण घालण्याचे आणि सुरक्षेच्या उपाययोजना करण्याचे कडक आदेश दिले आहेत. जिल्ह्यात घातखेडा, भिवापुरकर तलाव यांसारखे अनेक लहान-मोठे जलप्रकल्प आहेत. सिंचनासाठी वापरले जाणारे हे तलाव अनेकदा पर्यटन स्थळे बनतात. मात्र, बहुतांश…