साखर कारखान्यांकडून थकीत एफआरपीची चुकीची आकडेवारी सादर:राजू शेट्टी आक्रमक; साखर आयुक्तांसोबत महत्त्वाची बैठक
राज्यातील साखर कारखान्यांनी थकीत एफआरपीची चुकीची आकडेवारी साखर आयुक्त कार्यालयाला सादर केली आहे. यावर तातडीने कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. थकीत ऊसबिलासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राजू शेट्टी यांनी साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या बैठकीत राजू…