बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने चौघांचा मृत्यू:किडनी निकामी झाल्याने मृत्यू, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये दावा; परिसरात कलिंगडाची विक्री बंद
मुंबईमधील पायधुनी परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबातील 4 जणांचा बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना सोमवारी समोर आली होती. या मृत्यूंविषयी राज्यात वेगवेगळे तर्कवितर्क व्यक्त केले जात असताना आता या मृतांचा पोस्टमार्टेम अहवाल समोर आला आहे. त्यात हे चारही मृत्यू किडनी निकामी झाल्यामुळे झाल्याचा दावा करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, अब्दुल्ला दोकाडिया, त्यांची पत्नी नसरीन दोकाडिया,…