महायुतीत खातेवाटपावरून वाद नाही:पंकजा मुंडेंनी मानले मुख्यमंत्री फडणवीसांचे आभार, लाडकी बहीण योजनेबाबतही दिली मोठी माहिती
राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने घेतलेला कर्जमाफीचा निर्णय मोठा दिलासा देणारा असल्याचे सांगत मंत्री पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी शेतकरी कर्जमाफी, लाडकी बहीण योजना, पावसाची परिस्थिती, महायुतीतील खातेवाटप, जयंत पाटील यांच्या भेटीपासून ते गणेशोत्सवातील पर्यावरणपूरक नियोजनापर्यंत अनेक विषयांवर भूमिका स्पष्ट केली. ‘जुलैअखेर शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागतील’…