दिलासा:जनावरांचा अपघाती मृत्यू; 80 हजारांपर्यंत भरपाई- पंकजा मुंडे, गाय, म्हैस, शेळी-मेंढीसह 10 जनावरांचा समावेश
राज्यातील पशुपालक शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. “राष्ट्रीय पशुधन अभियाना’अंतर्गत राज्यात पशुधन विमा योजना राबवण्यास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्यात आली आहे. या योजनेमुळे अपघात, नैसर्गिक आपत्ती किंवा साथीच्या रोगांमुळे पशुधनाचा मृत्यू झाल्यास शेतकऱ्यांना थेट आर्थिक भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती पर्यावरण व पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. हवामानातील…