Headlines

महिलांनी अन्यायाविरुद्ध पुढे येण्याचे धाडस दाखवण्याची गरज- कुलकर्णी:फुलंब्रीत विद्यार्थी सुरक्षा अन् ‘पोक्सो’ कायद्याबाबत जनजागृती शिबिर उत्साहात‎

महिला आणि मुलींना कायद्याचे पूर्ण संरक्षण लाभलेले आहे. गरज आहे ती फक्त अन्यायाविरुद्ध पुढे येण्याचे धाडस दाखवण्याची, असे प्रतिपादन फुलंब्रीच्या दिवाणी न्यायाधीश आर. एस. कुलकर्णी यांनी केले. येथील न्यू ओएसिस इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये तालुका विधी सेवा समितीच्या वतीने विद्यार्थी सुरक्षा व पोक्सो कायदा या विषयावर विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी त्या…

Read More

कर्मवीर काकासाहेब देशमुख विद्यालयात रंगला सत्कार सोहळा‎:विद्यार्थ्यांनी स्वतःला पैलू पाडत सिद्ध करणे हीच खरी गुणवत्ता- सागर जाधव

यश मिळवणे म्हणजे केवळ गुण मिळवणे नव्हे, तर विद्यार्थ्यांनी अभ्यासाला ओझे न समजता सातत्य ठेवले पाहिजे. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाला पैलू पाडून स्वतःला सिद्ध करणे, हीच खरी गुणवत्ता आहे, असे प्रतिपादन जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सागर जाधव यांनी केले. येथील कर्मवीर काकासाहेब देशमुख माध्यमिक विद्यालयाने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत (इयत्ता १० वी) आपल्या उज्ज्वल यशाची…

Read More

हिंगोलीत खते-बियाणे लिंकिंग रोखण्यासाठी अधिकाऱ्यांची विशेष पथके तैनात:खतांसोबत इतर उत्पादनांची सक्ती केल्यास थेट तक्रार करण्याचे आवाहन

हिंगोली जिल्ह्यात आगामी खरीप हंगामात बियाणे व खतांचे लिंकींग रोखण्यासाठी पाच तालुक्यांसाठी दहा अधिकाऱ्यांचे पथक नियुक्त केले आहे. शेतकऱ्यांकडून तक्रारी प्राप्त झाल्यास तातडीने कृषी केंद्रावर जाऊन शाहनिशा केली जाणारआहे. तक्रारीत तथ्य आढळून आल्यास कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे यांनी सांगितले. हिंगोली जिल्ह्यात पेरणीपूर्व मशागत पूर्ण झाली असून आता शेतकऱ्यांना मोठ्या…

Read More

पावसाळी अधिवेशनाचा बारावा दिवस:डॉक्टरांचा निष्काळजीपणा, गावांमध्ये स्मशानभूमीच नसल्याचा मुद्द्यावरुन विधानसभेत खडाजंगी

पावसाळी अधिवेशनात आज सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याच्या आणि तितक्याच गंभीर प्रश्नांवरून विधानसभेत मोठी चर्चा पाहायला मिळाली. एकीकडे राज्यातील डॉक्टरांच्या वाढत्या निष्काळजीपणामुळे रुग्णांच्या जिवाशी होत असलेल्या खेळाचा मुद्दा सभागृहात आक्रमकपणे उपस्थित करण्यात आला; तर दुसरीकडे, प्रगत महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये अंत्यविधीसाठी साधी ‘स्मशानभूमी’ उपलब्ध नसल्याचे विदारक वास्तव सभागृहात मांडण्यात आले. दरम्यान, अनधिकृत वाहतूक आणि RTO मधील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून काल…

Read More

नसरापूर अत्याचार-हत्या प्रकरण:15 दिवसांत 1100 पानांचे आरोपपत्र दाखल; 50 हून अधिक साक्षीदार, फॉरेन्सिक पुरावे जोडले

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या पाशवी अत्याचार आणि हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या प्रकरणातील नराधम आरोपीला कठोरात कठोर आणि फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी अत्यंत जलद गतीने तपास चक्रे फिरवून मोठी कामगिरी बजावली आहे. पोलिसांनी घटनेच्या अवघ्या १५ दिवसांच्या आत पुणे न्यायालयात तब्बल ११०० पानांचे दोषारोपपत्र…

Read More

थलापती विजयचा चित्रपट ‘जन नायकन’ ऑनलाइन लीक:पायरसीविरोधात पूजा हेगडे म्हणाली- चित्रपट हजारो लोकांच्या मेहनतीचा परिणाम, मोठ्या पडद्यावर पाहा

तमिळ सुपरस्टार थलापती विजय यांचा आगामी चित्रपट ‘जन नायकन’ ऑनलाइन लीक झाल्यानंतर चित्रपटसृष्टीत चिंता वाढली आहे. चित्रपटाची मुख्य अभिनेत्री पूजा हेगडे यांनी याला दुःखद म्हटले आणि प्रेक्षकांना तो थिएटरमध्ये पाहण्याचे आवाहन केले. पूजा हेगडे यांनी इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले की, चित्रपट केवळ मनोरंजन नाही, तर हजारो लोकांच्या मेहनतीचे, सर्जनशीलतेचे आणि त्यागाचे फळ असते. त्या म्हणाल्या की,…

Read More

'स्क्वेअर कॅफे'वर पोलिसांची धाड:अश्लील चाळे करणाऱ्या 3 प्रेमीयुगुलांना घेतले ताब्यात

अमरावती येथील विभागीय क्रीडा संकुलातील मार्केटमधील स्क्वेअर कॅफेवर भरोसा सेल आणि दामिनी पथकाने धाड टाकली. या कारवाईत तीन प्रेमीयुगुलांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई आज, बुधवार, २४ जून रोजी दुपारी २ वाजता करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या कॅफेमध्ये प्रेमीयुगुलांना तासाप्रमाणे पैसे आकारून अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येत होती. दरम्यान गस्तीवर असलेल्या…

Read More

'वखार महामंडळा'च्या कारभारावर संशयाचे धुके:हिंगोलीत 40 हजार क्विंटल हरभरा भिजून 20 दिवस उलटले, तरी नुकसानीचा अंदाज येईना

हिंगोली येथील औद्योगिक वसाहतीमध्ये भाडेतत्वावर घेतलेल्या गोदामातील किती हरभरा भिजला याचा वीस दिवसानंतरच वखार महामंडळाचा अंदाज आला नाही. त्यामुळे आता महामंडळाच्या कार्यपध्दतीवर संशय व्यक्त केला जात आहे. हिंगोली येथील औद्योगिक वसाहतीमध्ये वखार महामंडळाने भाडेतत्वावर घेतलेल्या गोदामात नाफेडने खरेदी केलेला सुमारे ४० हजार क्विंटल हरभरा ठेवण्यात आला होता. मात्र ता. १३ जून रोजी वादळी वाऱ्यासह झालेल्या…

Read More

मनमाड-नांदगाव परिसरात डिझेलसाठी वाहनांच्या पंपांसमोर लांबच लांब रांगा:मर्यादित पुरवठ्याचा वाहतूकदारांसह शेतकरी आणि व्यावसायिकांना अडचण‎

मनमाड आंतरराष्ट्रीय स्तरावरील युद्धजन्य परिस्थिती, वाढते इंधन दर आणि पुरवठा साखळीतील अडचणींमुळे नाशिक जिल्ह्यासह मनमाड-नांदगाव परिसरात डिझेल टंचाईचे संकट गडद होत आहे. अनेक पेट्रोल पंपांवर डिझेलचा पुरवठा मर्यादित झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून वाहतूकदार, शेतकरी आणि व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. नांदगाव व मनमाड शहरातील काही प्रमुख पेट्रोल पंपांवर सकाळपासूनच डिझेल भरण्यासाठी वाहनांची मोठी…

Read More

कल्याणमधील भीषण अपघातात रीलस्टार प्रेम भाटीचा मृत्यू:कुटुंबावर शोककळा, रस्त्यावरील खडी अन् खड्ड्यांमुळे दुचाकी घसरल्याचा आरोप

सोशल मीडियावर आपल्या विनोदी आणि हॉरर रील्स तयार करणारा प्रेम भाटीचा भीषण अपघातात मृत्यू झाला. 13 जून रोजी पहाटेच्या सुमारास कल्याणमधील मोहने परिसरात रस्त्यावरील खड्डे आणि खडीमुळे दुचाकीवरून नियंत्रण सुटल्याने प्रेम भाटीचा दुर्दैवी अंत झाला. मिळालेल्या माहितीनुसार, प्रेम भाटी 13 जून रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून आपल्या घरी परतत होता. मोहने येथील शिवसेना शाखेजवळून…

Read More