Headlines

अमरावतीतील प्रवासी निवारे दुर्लक्षित:बसण्यासाठीचे बेंच गायब, कचऱ्याचे ढिगारे; प्रवाशांना उन्हाळ्यात नाहक त्रास

अमरावती शहरातील प्रवासी निवारे संबंधित यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे पूर्णपणे बेदखल झाले आहेत. उन्हाळ्याचे दिवस असल्याने प्रवाशांना या निवाऱ्यांची अत्यंत आवश्यकता आहे, परंतु अनेक निवारे त्यांच्या मूळ उद्दिष्टांपासून कोसो दूर गेले आहेत. काही प्रवासी निवाऱ्यांमधील बेंचेस गायब झाले असून, त्या ठिकाणी इमारतीच्या बांधकामाचे साहित्य ठेवण्यात आले आहे. तर काही निवाऱ्यांसमोर कचऱ्याचे ढिगारे लागले असून आसन व्यवस्था पूर्णपणे…

Read More

मी उद्धव ठाकरेंसोबतच राहणार:राजाभाऊ वाजेंचा फुटीच्या चर्चांना पूर्णविराम, म्हणाले- एकनाथ शिंदेंचा एकही कॉल आला नाही

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील संभाव्य फुटीच्या चर्चांदरम्यान खासदार राजाभाऊ वाजे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत आपण पक्ष सोडणार नसल्याचे ठामपणे सांगितले. मी पक्ष सोडणार नाही, मी पहिल्या दिवसापासून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत आहे आणि पुढेही त्यांच्यासोबतच राहणार, अशा कडक शब्दांत वाजेंनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांच्या या विधानामुळे ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे….

Read More

विवाहित असल्याचे माहीत असूनही संबंध ठेवले तर तो बलात्कार कसा?:ठाणे न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल, आरोपीची निर्दोष मुक्तता

लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या एका ३० वर्षीय तरुणाची ठाणे न्यायालयाने सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता केली. जानेवारी २०२२ मध्ये इव्हेंट मॅनेजमेंट क्षेत्रात काम करणाऱ्या एका महिलेची आणि या तरुणाची मैत्री झाली होती. एप्रिल २०२२ मध्ये लग्नाचे आश्वासन देऊन त्याने शारीरिक संबंध प्रस्थापित केले, असा महिलेचा आरोप होता. काही काळानंतर तरुणाने आपण आधीच विवाहित…

Read More

तोंडापूरच्या धरण काठावर घातक रसायनाची गळती:तीन रोही मृत्युमुखी, पक्षी व वन्यजीवांवर संकट‎

अजिंठा व जामनेर वनक्षेत्राच्या हद्दीत तोंडापूर धरणाच्या काठावर ३ रोही (नीलगाय) कुजलेल्या अवस्थेत मृत आढळून आले आहेत. धरणाच्या काठावर लपवून ठेवलेल्या २३ घातक रसायनांच्या ड्रममधून झालेल्या गळतीमुळेच हा प्रकार घडल्याचा संशय आहे. यापूर्वी धरणातील मासे आणि तोंडापूर गावातील ८ ते १० शेतकऱ्यांचे पाळीव प्राणी याच रसायनांमुळे दगावले होते. आता हाच प्रादुर्भाव वन्यजीवांपर्यंत पोहोचल्याची शंका डॉ….

Read More

Raj Thackeray Supports Sonam Wangchuk; Urges PM Modi Over NEET Controversy

नीट (NEET) परीक्षेतील घोळ आणि सर्वच परीक्षांमध्ये पारदर्शकता आणण्याच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. वांगचुक यांच्या उपोषणाच . ही शांतता हे लोक स्मशान शांततेकडे नेतील.. राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालण्याची विनंती…

Read More

‘भगवान श्री ऋषिश्वर महाराज’ यांच्या आरतीचा प्रकाशन सोहळा उत्साहात:एकपाळा येथे आयोजन, आरती म्हणजे ऋषीश्वर महाराजांच्या भक्तीची साद‎

जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र त्रिवेणी संगम एकपाळा येथे एका भक्तीमय आणि अभूतपूर्व सोहळ्याचे आयोजन केले होते. ज्येष्ठ शुद्ध एकादशी (निर्जला एकादशी) च्या पवित्र पर्वावर २५ जून रोजी, या क्षेत्राचे आराध्य दैवत भगवान श्री ऋषि . त्रिवेणी संगम एकपाळा गावी भगवान श्री शंकराचे प्राचीन शिवालय असून, येथे भगवान शिवाला भगवान श्री ऋषिश्वर महाराज या…

Read More

शहीद झालेल्यांच्या पुत्रांना पीएसआयपदी थेट नियुक्ती:‘गडचिरोली विशेष परिक्षेत्रात’ काम करण्याची अट

नक्षलविरोधी कारवाईत शौर्य गाजवताना वीरमरण आलेल्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वारसांना महाराष्ट्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. शहीद पोलिस उपनिरीक्षक संतोष महिपत घाग आणि शहीद पोलिस हवालदार हरिदास चिंतामण सयाम यांच्या वारसांना पोलिस उपनिरीक्षक गट-ब (अराजपत्रित) या पदावर अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती देण्याचा महत्त्वपूर्ण आदेश गृह विभागाने गुरुवारी जारी केला. नक्षलविरोधी कारवाईत शहीद झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसदारांना…

Read More

विषारी दारू प्रकरणातील मृतांचा खरा आकडा समोर आणा:डॉ. नीलम गोऱ्हे यांची CIDकडे मागणी, व्यापक तपासाची गरज असल्याचे मत

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील विषारी दारू प्रकरणाच्या तपासात मृत्यूंचा आणि बाधितांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी व्यापक मोहीम राबविण्याची गरज असल्याचे मत शिवसेना नेत्या व आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले. या प्रकरणाच्या तपासाबाबत माहिती घेण्यासाठी त्यांनी मंगळवारी गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) कार्यालयाला भेट देऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. डॉ. गोऱ्हे यांनी सीआयडीचे अप्पर…

Read More

राज्यातील शाळांच्या निकालात 1 मेपासून मोठा बदल:आता प्रगतीपुस्तकासोबत पालकांना उत्तरपत्रिकाही दाखवणे बंधनकारक

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी यंदाचा निकाल 1 मे 2026 रोजी जाहीर होणार आहे. मात्र, यंदा केवळ निकाल जाहीर होणार नाही, तर शिक्षण विभागाने एक महत्त्वाचा आणि बदल घडवणारा निर्णयही लागू केला आहे. यापुढे विद्यार्थ्यांना फक्त प्रगतीपुस्तक देण्यावर मर्यादा न राहता, त्यांच्या उत्तरपत्रिकाही पालकांना दाखवणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मूल्यमापन…

Read More

भोपाळ-दुर्घटनेचे हे छायाचित्र काढणारे रघु राय यांचे निधन:म्हटले होते- त्या निष्पाप चेहऱ्यातील शांतता कोणत्याही किंकाळीपेक्षा जास्त तीव्र होती

देशातील सर्वात प्रतिष्ठित छायाचित्रकारांपैकी एक असलेले रघु राय यांचे रविवार सकाळी एका खाजगी रुग्णालयात निधन झाले. 83 वर्षीय राय कर्करोगाशी झुंज देत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि 3 मुली असा परिवार आहे. 1966 मध्ये ‘द स्टेट्समन’ मधून आपल्या कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या राय यांनी सहा दशकांहून अधिक काळ अनेक अविस्मरणीय क्षण कॅमेऱ्यात कैद केले….

Read More