Headlines

अमरावती पाणपोई: रोज ३५ हजार नागरिकांना पाणी, दिव्यांगांना रोजगार:३७ वर्षांपासून अविरत सेवा; २ जुलैला समारोप

अमरावती शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील पाणपोई उन्हाळ्यात हजारो प्रवाशांसाठी मोठा आधार ठरत आहे. सायन्स कोर मैदानासमोरील ही पाणपोई गेल्या ३७ वर्षांपासून अविरत सेवा देत आहे. दररोज सुमारे ३५ ते ४० हजार नागरिक या पाणपोईवरून आपली तहान भागवतात. विशेष म्हणजे, या माध्यमातून दिव्यांग बांधवांना रोजगाराचा आधारही मिळाला आहे. १००८ संत श्री. सितारामदासजी बाबा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे ही…

Read More

अकरावी प्रवेशाची पहिली यादी २९ मे रोजी जाहीर:दुपारपासून प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया सुरू; नोंदणी व अर्ज प्रक्रिया पूर्ण

अकरावीच्या प्रवेशासाठीची पहिली यादी २९ मे रोजी जाहीर होणार असून, त्याच दिवशी दुपारी १२ वाजल्यापासून प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. प्रवेश अर्जाचा भाग एक व दोनमधील तपशील पूर्ण करण्याची अंतिम मुदत २५ मे रोजी संपली आहे. ही यादी शुक्रवार, २९ मे रोजी सकाळी ११ वाजता ऑनलाईन जाहीर केली जाईल आणि संबंधित कनिष्ठ महाविद्यालये व विद्यार्थ्यांना…

Read More

मोझरीचे जनार्धन बोथे यांना 'पद्मश्री' पुरस्कार:राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे माजी सचिव सन्मानित

अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथील ज्येष्ठ समाजसेवक जनार्धन बापूराव बोथे (बोथे गुरुजी) यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे माजी खाजगी सचिव म्हणून त्यांनी दीर्घकाळ सेवा दिली आहे. या सन्मानामुळे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. या पुरस्कारामुळे केवळ जिल्ह्याचाच नव्हे, तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा आणि ‘ग्रामगीते’चा राष्ट्रीय स्तरावर गौरव…

Read More

जि. प. बदल्या थेट मंत्रालयात पोहोचल्या:कर्मचारी संघटनेचे ग्रामविकास मंत्री गोरे यांना साकडे

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपीकवर्गीय कर्मचारी संघटनेने जनगणनेमुळे स्थगित केलेल्या बदल्या तात्काळ सुरू करण्याची मागणी केली आहे. या मागणीसाठी संघटनेने ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले आहे. जनगणना कामामुळे राज्यातील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्या थांबवण्यात आल्या आहेत. यामुळे बदलीपात्र कर्मचाऱ्यांवर मोठा अन्याय होत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. हीच बाब मंत्री…

Read More

पुण्यातील खाऊगल्ल्या रात्री 10 वाजता बंद:सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेसाठी पोलीस आयुक्तांचा निर्णय

पुण्यातील खाऊगल्ल्या आता रात्री १० वाजता बंद केल्या जाणार आहेत. सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी हा निर्णय घेतला आहे. पदपथ आणि रस्त्यावरील हातगाड्या, स्टॉल तसेच ठेले यांना रात्री १० वाजेपर्यंतच व्यवसाय करण्याची कायदेशीर परवानगी आहे, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. अनेक ठिकाणी खाऊगल्ल्या रात्री १२ ते १ वाजेपर्यंत सुरू असतात….

Read More

विधान परिषद निवडणूक सुरू, पहिल्या दिवशी १६ नामांकनांची उचल:पोटे, देशमुख, जगताप यांच्या नावांचा समावेश

अमरावती जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी विधान परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सोमवार, २५ मे पासून सुरू झाली आहे. पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नसला तरी, विविध पक्षांतर्फे एकूण १६ अर्जांची उचल करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. जिल्हाधिकारी आशिष येरेकर हे…

Read More

मुलाला जिवंत करण्यासाठी 5 दिवस आई बायबल वाचत राहिली:फॅशन डिझायनरच्या मृतदेहाजवळ प्रार्थना करत राहिली; मृतदेहातून रक्त वाहत होते

मध्य प्रदेशातील विदिशामध्ये ख्रिश्चन धर्माचा तरुण शीनू वर्गीस (42) याचा मृत्यू झाला. त्याची आई मरियमा वर्गीस मुलाला जिवंत करण्याच्या आशेने पाच दिवस मृतदेहाजवळ बसून प्रार्थना करत राहिली. मुलाच्या छातीवर बायबल ठेवले होते. तीव्र दुर्गंधी आणि दरवाजाखालून रक्त वाहत असल्याचे पाहून या प्रकरणाचा खुलासा झाला. सिव्हिल लाईन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शीनू वर्गीस मुंबईत फॅशन डिझायनिंगचे काम…

Read More

ध्रुव राठीवर संतापली अनुपमा फेम अभिनेत्री:PM मोदींवरील विधानावर नाराजी व्यक्त केली; म्हटले – देशाला परदेशात बसलेल्या यूट्यूबरची गरज नाही

टीव्ही मालिका ‘अनुपमा’ फेम अभिनेत्री रुपाली गांगुली यांनी यूट्यूबर ध्रुव राठीच्या एका पोस्टवर तीव्र आक्षेप घेतला आहे. ध्रुव राठीने 19 मे रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिले होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी जिथेही जातील, तिथे त्यांना प्रत्येक ठिकाणी शरमिंदा केले पाहिजे. या विधानानंतर सहा दिवसांनी सोमवारी, भाजप नेत्या आणि अभिनेत्री रुपाली गांगुली यांनी ध्रुव राठीवर…

Read More

कोठडीतील आरोपीला घरचे जेवण देणे पडले महागात:कळमनुरीतील पोलीस जमादार निलंबित, एस.पी. डॉ. नीलाभ रोहन यांचे आदेश

कळमनुरी पोलीस ठाणे अंतर्गत खूनाच्या गुन्ह्यामध्ये पोलीस कोठडीत असलेल्या आरोपीला घरचे जेवण देणे पोलीस जमादाराला चांगलेच महागात पडले असून संबंधित जमादाराला सोमवारी ता २५ निलंबित करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश पोलीस अधीक्षक निलाभ रोहन यांनी काढले आहेत. कळमनुरी पोलीस ठाणे अंतर्गत कळमनुरी शहरांमध्ये दिनांक 23 मे रोजी खुनाचा गुन्हा दाखल झाला होता.या प्रकारात तातडीने आरोपींची…

Read More

युद्धाच्या 3 महिन्यांत विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला रुपया:जाणून घ्या- याचा तुमच्या दैनंदिन खर्चांवर, गुंतवणुकीवर, प्रवासावर आणि ईएमआयवर काय परिणाम होतो?

अमेरिका-इराण युद्धामुळे भारतीय रुपयावर दबाव वाढतच चालला आहे. सोमवारी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया ₹95.23 च्या पातळीवर बंद झाला. फेब्रुवारीच्या अखेरीस सुरू झालेल्या या युद्धानंतर अवघ्या तीन महिन्यांत रुपया सुमारे ₹5 ने घसरला आहे, ज्यामुळे तुमच्या दैनंदिन जीवनावर, घरगुती बजेटवर आणि गुंतवणुकीवर थेट परिणाम होणार आहे. युद्धानंतर 3 महिन्यांत रुपया विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला रशिया-युक्रेननंतर आता…

Read More