शेतकरी विकास मंचाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन:सरसकट कर्जमाफीची मागणी, अटींमुळे सर्व शेतकऱ्यांना लाभ मिळणार नसल्याचा दावा
शेतकरी विकास मंचने चांदूर बाजारच्या तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ मधील निकषांमुळे सर्व शेतकऱ्यांना अपेक्षित लाभ मिळणार नसल्याचा आरोप करत, मंचने सरसकट कर्जमाफीची मागणी केली आहे. निवडणूक काळात सरकारने शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, नव्या शासन निर्णयामध्ये विविध अटी व शर्ती…