संतांचे विचार साहित्याच्या माध्यमातून पुढे नेण्याचे कार्य करावे- प्रदीप निफाडकर
“ज्ञानोबा, तुकोबा, एकनाथ आणि चोखोबा या संतांनी अभंग-ओव्यांच्या माध्यमातून जनसामान्यांचे विचार मांडले. तोच भारतीयत्वाच्या मूळ अस्मितेशी जुळणारा विचार पुढे नेण्याचे कार्य आज साहित्याच्या माध्यमातून करायचे आहे,” असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे नवनिर्वाचित कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर यांनी व्यक्त केले. इंडियन सोसायटी ऑफ ऑथर्स (नवी दिल्ली) व महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्यातर्फे महामंडळाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार…