Headlines

प्रशासकीय मान्यतेनुसार काम झाले नसल्याचा ठपका:हिंगोलीतील वीज कंपनीचे अधिक्षक अभियंता आर. एम. चव्हाण निलंबित

हिंगोली तालुक्यातील नर्सी येथे ११ केव्ही फिडर बसविण्याचे काम प्रशाकिय मान्यतेनुसार झाले नसतांनाही कामाचे ५० लाख रुपयांचे देयक अदा करणारे अधिक्षक अभियंता आर. एम. चव्हाण यांना निलंबित करण्यात आले असून त्यांच्या निलंबनाचे आदेश गुरुवारी ता. ३० वीज कपंनीचे सहव्यवस्थापकीय संचालक धनंजय औंढेकर यांनी काढले आहेत. मात्र या प्रकरणात वीज कंपनीकडून कामालीची गोपनियता पाळली जात आहे….

Read More

फुलेवाड्याचे विस्तारीकरण समाधानकारक नाही:सरकार जागा देण्यास तयार, कामाला गती देण्याची गरज – मंत्री छगन भुजबळ

महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या फुलेवाड्याच्या विस्तारीकरणाचे काम समाधानकारक नसल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, या कामासाठी २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर असूनही प्रगती अपेक्षेप्रमाणे नाही. सरकार आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यास तयार आहे. फुलेवाड्याच्या विस्तारीकरणामागे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या ऐतिहासिक कार्याची माहिती नव्या…

Read More

विदर्भ, मराठवाड्यात पुढील 24 तासांत 'फ्लॅश फ्लड'चा इशारा:नदी-नाल्यांना अचानक पूर येण्याची शक्यता; हवामान विभागाचा अलर्ट

भारतीय हवामान विभागाच्या (IMD) नवी दिल्ली येथील ‘फ्लॅश फ्लड गायडन्स सेल’ने ३० जुलै २०२६ रोजी एक राष्ट्रीय बुलेटिन जारी केले आहे. त्यानुसार, महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि लगतच्या मध्य प्रदेश व गुजरातच्या सीमेवरील काही भागांत पुढील २४ तासांत ‘फ्लॅश फ्लड’ म्हणजेच अचानक पूर येण्याचा मोठा धोका वर्तवण्यात आला आहे. हा इशारा अत्यंत महत्त्वाचा मानला…

Read More

विशाल घुले हत्या प्रकरण:मराठा नसल्यामुळे न्याय मिळत नाही का? गुणरत्न सदावर्तेंचा सवाल, सुप्रिया सुळेंवरही साधला निशाणा

बीड जिल्ह्यातील विलास घुले हत्या प्रकरणावरून ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी राज्य सरकार, पोलीस प्रशासन आणि महाविकास आघाडीतील काही नेत्यांवर जोरदार टीका केली. या प्रकरणातील मुख्य आरोपींवर कारवाई होत नसल्याचा आरोप केला. आम्ही मराठा नाही म्हणून न्याय मिळत नाही का? असा सवाल उपस्थित करत, त्यांनी संपूर्ण प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करण्याची मागणी केली. यावेळी मृत विलास…

Read More

महिला आयोगात मनुष्यबळाचा तुटवडा:39 पैकी 19 पदे रिक्त; कामकाजावर परिणाम, उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल

महाराष्ट्र राज्य महिला आयोग गंभीर मनुष्यबळ तुटवड्याचा सामना करत आहे. आयोगातील मंजूर ३९ पदांपैकी तब्बल १९ पदे रिक्त असल्याची माहिती मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून समोर आली आहे. यामुळे महिलांच्या हक्कांचे रक्षण करणारी ही अर्ध-न्यायालयीन संस्था प्रभावीपणे काम करू शकत नाहीये. या रिक्त पदांमध्ये वर्ग-अ ते वर्ग-क श्रेणीतील उपसचिव, वरिष्ठ समुपदेशक आणि विधी तज्ज्ञ…

Read More

हास्ययोग म्हणजे स्थितप्रज्ञ अवस्था:नवचैतन्य हास्ययोग परिवार गुरुपौर्णिमा सोहळ्यात डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी ‘हास्ययोग’ म्हणजे जीवनातील आनंद आणि दुःख या दोन्ही परिस्थितीकडे समबुद्धीने पाहण्याची ‘स्थितप्रज्ञ अवस्था’ असल्याचे मत व्यक्त केले. नवचैतन्य हास्ययोग परिवार आणि श्री सरस्वती कराड हॉस्पिटलतर्फे आयोजित गुरुपौर्णिमा – गुरु सन्मान सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी पुण्यातील ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, ज्येष्ठ नेत्रतज्ञ डॉ. मधुसूदन…

Read More

मुख्यमंत्री फडणवीस अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सवाला उपस्थित राहणार:पुण्यात 31 जुलै ते 1 ऑगस्ट दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन

पुणे शहर जिल्हा मातंग समाज आणि साहित्यसम्राट लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव समितीच्या वतीने डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त ३१ जुलै ते १ ऑगस्ट २०२६ या कालावधीत पुण्यात विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या मुख्य कार्यक्रमांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री…

Read More

Savner Gas-Based Fertilizer Plant; GAIL & RCF Sign Agreement

नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथे १० हजार कोटी रुपयांचा गॅस-आधारित खत निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी ‘गॅस ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड’ (GAIL) आणि ‘राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड’ (RCF) या दोन म . विशेष उद्देश कंपनी अंतर्गत साकारणाऱ्या या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात वार्षिक १.२७ दशलक्ष मेट्रिक टन क्षमतेचा युरिया निर्मिती कारखाना…

Read More

प्रवाशांच्या सुरक्षिततेशी तडजोड नाही:ॲग्रीगेटर कंपन्यांनी 1 सप्टेंबरपर्यंत नोंदणी करावी; अन्यथा कठोर कारवाई – परिवहन मंत्री

राज्यातील ॲग्रीगेटर आधारित प्रवासी वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि नियमबद्ध करण्यासाठी राज्य शासनाने निश्चित केलेल्या ॲग्रीगेटर धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यानुसार राज्यात कार्यरत सर्व ॲग्रीगेटर संस्थांनी १ सप्टेंबर २०२६ पर्यंत विहित प्रक्रिया पूर्ण करून नोंदणी करावी. १ सप्टेंबरनंतर विनानोंदणी अथवा नियमबाह्य पद्धतीने प्रवासी वाहतूक करणाऱ्या ॲग्रीगेटर संस्थांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट…

Read More

कंगनाच्या 'गटर जनरेशन'च्या वक्तव्यावर भडकला सोनू सूद:म्हणाला- हे खूप लाजिरवाणे, विचारपूर्वक बोलले पाहिजे; युवकांमुळेच आपण स्टार बनतो

अभिनेता सोनू सूद यांनी देशातील विद्यार्थी आंदोलनांमध्ये सहभागी झालेल्या तरुणांवर कंगना रणौतने केलेल्या टिप्पणीवर टीका केली आहे. अलीकडेच कंगनाने आंदोलन करणाऱ्या जेन-झी (Gen-Z) विद्यार्थ्यांना ‘जनरेशन गटर’ असे म्हटले होते. या विधानावर प्रतिक्रिया देताना सोनू सूद म्हणाला की, जर कंगनाने असे म्हटले असेल तर ते खूप लाजिरवाणे आहे. सोनू म्हणाला की, हेच तरुण कलाकारांना स्टार बनवतात…

Read More