मेळघाटातील समस्यांवर आदिवासींची कलेक्टर, सीईओंकडे धडक:दोन्ही अधिकाऱ्यांनी समस्या ऐकल्या; प्रश्न सोडवण्याचे दिले आश्वासन
जिल्ह्याचा दुर्गम भाग असलेल्या मेळघाटातील शिक्षण, आरोग्य, रोजगार, रस्ते आणि कुपोषण यांसारख्या गंभीर व प्रलंबित समस्यांवर मात करण्यासाठी ”खोज” संस्थेच्या नेतृत्वात मेळघाटातील शेकडो आदिवासी महिला व पुरुषांनी आज, सोमवार, १३ जुलैला जिल्हाधिकारी आशिष येरेकर आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्यम गांधी यांची भेट घेतली. या शिष्टमंडळाने मेळघाटातील मूलभूत प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले असून,…