Headlines

इंदूर नमकीनचा परवाना तत्काळ निलंबित:अस्वच्छता आणि बुरशीयुक्त अन्न आढळल्याने एफडीएची कारवाई

नागपुरात अन्न भेसळ आणि अस्वच्छतेविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) आपली कारवाई तीव्र केली आहे. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रसिद्ध हिरा स्वीटवर कारवाई केल्यानंतर आता ‘इंदूर नमकीन प्रॉडक्ट्स’ या मोठ्या आस्थापनेचा अन्न व्यवसाय परवाना तत्काळ निलंबित करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ९ जुलै रोजी अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती ए. एन. खंदारे यांच्या पथकाने…

Read More

एटीएसची मोठी कारवाई, 175 संशयितांची चौकशी:पाकिस्तान-दुबई कनेक्शन; पूर्व विदर्भातील 10 जणांचा समावेश

महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) पाकिस्तान आणि दुबईतून भारताच्या विरोधात कारवाया करणाऱ्या शाजाद भट्टी या कुख्यात गँगस्टर आणि आयएसआयच्या हस्तकाच्या संशयास्पद जाळ्याचा पर्दाफाश केला आहे. राज्यभरातील तब्बल १७५ संशयित तरुण भट्टीच्या संपर्कात आल्याचे उघड झाल्यानंतर, एटीएसने आज सकाळी ७ वाजल्यापासून एकाच वेळी धडक शोध मोहीम सुरू केली. या कारवाईमुळे देशविरोधी शक्तींचे मोठे डिजिटल जाळे उघडकीस…

Read More

विम्बल्डनचा सामना पाहण्यासाठी पोहोचली प्रियंका चोप्रा:पती निक जोनासला व्हिडिओ कॉलवर लाइव्ह टूर दाखवला, सामन्यादरम्यान दिसला स्टायलिश लूक

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा गुरुवारी विम्बल्डन टेनिस स्पर्धेचा सामना पाहण्यासाठी पोहोचली. ती महिला एकेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यादरम्यान पहिल्या रांगेत बसलेली दिसली, जिथे कोको गॉफ आणि कॅरोलिना मुचोवा यांच्यात सामना सुरू होता. प्रियंकाने स्टेडियममधूनच तिचा पती आणि अमेरिकन गायक निक जोनासला फेसटाइमवर व्हिडिओ कॉल केला आणि त्याला विम्बल्डनची थेट सफर घडवली. सोशल मीडियावर तिच्या या व्हिडिओ…

Read More

विजय म्हणाले- करूर चेंगराचेंगरी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे दुःख:पोलिसांना गर्दी आवरण्यात अपयश आले, डीएमकेने 41 मृत्यूंसाठी मला जबाबदार धरले

तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि तमिळगा वेत्री कळगम (TVK) चे अध्यक्ष सी. जोसेफ विजय चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर पहिल्यांदाच करूरला पोहोचले. त्यांनी करूरमधील ॲटलास मैदानावर चेंगराचेंगरीत जीव गमावलेल्या 41 लोकांच्या कुटुंबीयांना सरकारी नोकरीची नियुक्तीपत्रे सुपूर्द केली. विजय यांनी जनसभेत सांगितले की, 2025 मधील करूरची घटना माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी वेदना आहे. ते म्हणाले की, पोलीस गर्दीला आवर घालण्यात अपयशी…

Read More

नंदुरबारमध्ये 'मुन्नाभाई'चे फेक महाविद्यालय?:विद्यार्थ्यांना डॉक्टर, नर्स, रुग्ण बनवून फसवले? MKD कॉलेजवर 'एनएसयूआय'चे आरोप

नंदुरबार येथील MKD महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर गंभीर अन्याय होत असल्याचे समोर आले आहे. विद्यार्थ्यांकडून बेकायदेशीररीत्या मोठ्या प्रमाणात पैसे उकळल्यापासून महिला विद्यार्थिनींच्या सन्मानाला धक्का पोहोचवणाऱ्या घटनांची ‘एनएसयूआय’ने पोलखोल केली आहे. महाविद्यालयातील स्वच्छतागृहात डस्टबिनची व्यवस्था नसल्यामुळे एका विद्यार्थिनीने वापरलेला सॅनिटरी पॅड कागदात गुंडाळून बाजूला ठेवला होता. त्यानंतर हा प्रकार कोणी केला हे शोधण्यासाठी प्रत्येक विद्यार्थिनीची हात…

Read More

वकिलाने सर्वोच्च न्यायालयात CJI ना अपशब्द म्हटले:न्यायाधीशांना आदेश देऊ लागला, फाइल फेकली; सुरक्षा रक्षकांनी कोर्ट रूममधून बाहेर काढले

सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी एका याचिकाकर्ता वकिलाने सुनावणीदरम्यान असभ्य वर्तन केले. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी सुरू होती. याचिका वकिलानेच दाखल केली होती. सुनावणीच्या सुरुवातीपासूनच वकिलाने अत्यंत आक्रमक भूमिका घेतली होती. थोड्याच वेळात त्याने न्यायालयात शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. इतकंच नाही, तर खटल्याशी संबंधित कागद हवेत उडवत तो म्हणाला… “त्या @#$% CJI ला…

Read More

सभागृहात चर्चा कमी, पायऱ्यांवरच शिव्याशाप जास्त:एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर साधला निशाणा; म्हणाले- विरोधी पक्ष गोंधळलेला आणि भरकटलेला

विधान परिषदेच्या सभागृहात बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, हे अधिवेशन लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी असते. परंतु, इकडे सभागृहात चर्चा कमी आणि तिकडे पायऱ्यांवर, मीडियासमोर आणि शिव्याशाप देतात. विरोधक हा गोंधळलेला आणि भरकटलेला विरोधी पक्ष असल्याचे पाहायला मिळाले. बहुमत असले आमच्याकडे तरी सुद्धा लोकशाहीत विरोधी पक्षातल्या सदस्यांचे म्हणणे ऐकून घेणारे आहोत. अशी चर्चा व्हायला पाहिजे होती,…

Read More

सावरकरांना इंग्रजांनी यातना दिली:तुम्ही अवमान तरी करू नका, सभागृहात सुधीर मुनगंटीवारांनी मंत्र्यांनाच सुनावले

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्याचा मुद्दा आता पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावरून राज्य सरकारचे चांगलेच कान टोचले आहेत. सरकारने अद्याप सावरकरांना भारतरत्न देण्याबाबतचा ठराव न आणल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत, मुनगंटीवार यांनी मंत्री जयकुमार रावल यांना या मुद्द्यावरून चांगलेच घेरले. तसेच, या प्रलंबित…

Read More

अबू आझमींचा सरकारवर हल्लाबोल:'सरकार धंदा करायला बसलेली नाही; जनतेला सवलत देणं हेच सरकारचं काम'

राज्य सरकारचे काम नफा-तोटा पाहणे नसून जनतेला सवलती देणे आणि रोजगार निर्माण करणे हे आहे. सरकार धंदा करायला बसलेली नाही, अशा शब्दांत समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी पॉवरलूम उद्योग, वीजदर, समान नागरी संहिता (UCC), कथित भ्रष्टाचार, पक्षांतर आणि राज्यातील कायदा-सुव्यवस्थेसह विविध मुद्द्यांवर सरकारला लक्ष्य केले….

Read More

मंगलप्रभात लोढांनी उद्यापासून नट-बोल्ट, सिमेंट खावे:शेतकऱ्यांनी पिकवलेलं अन्न खाऊ नये; रविकांत तुपकरांची संतप्त टीका, म्हणाले- अन्नदात्याची माफी मागा

क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शेतकऱ्यांबद्दल केलेल्या विधानावर संतप्त टीका केली आहे. भारत शेतकऱ्यांमुळे सोने कि चिडिया नव्हता असे विधान लोढांनी केले होते. यावर टीका करताना तुपकर म्हणाले की, मंगलप्रभात लोढांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करावा तेवढा कमी आहे. हा देश पूर्वही कृषीप्रधान होता, आजही कृषीप्रधान आहे आणि भविष्यातही कृषीप्रधान…

Read More