Headlines

‘नंदनवन’ सरासरीपासून गेले दूर; 9 तालुक्यांना पावसाचा फटका:ज्या ठिकाणी सर्वाधिक पावसाची हमी, तो चिखलदरा शेवटून तिसरा‎

विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा येथे यावर्षी गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत फार कमी पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यातील ९ तालुक्यांना जूनच्या पावसाने जोरदार फटका दिला आहे. हवामान बदलामुळे निर्माण झालेले हे चित्र पर्यटक आणि शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब ठर . १४ तालुक्यांचा व्याप असलेल्या अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यात जून महिन्यात १३४.९ मिलीमीटर पाऊस पडला. गेल्या पाच वर्षांच्या…

Read More

पुष्पगुच्छ, गुलाबपुष्प, मिठाई देत प्रवेशोत्सव:लोकप्रतिनिधींसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्या शाळांना भेटी

महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी, मंगळवारी ३० जून रोजी सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. शाळांमधील शैक्षणिक वातावरण, विद्यार्थ्यांची उपस्थिती, मूलभूत सुविधा, अध्यापनाची तयारी तसेच विविध शैक्षणिक उपक्रमांचा आढावा घेण्यासाठी महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी यांनी शहरातील विविध महानगरपालिका शाळांना नियोजनबद्ध भेटी दिल्या. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणात अग्रेसर…

Read More

रेल्वे तिकीट बुकिंग प्रणाली 5 पट वेगवान होईल:AI द्वारे एका मिनिटात 1.25 लाख तिकिटे बुक होतील; सध्याची क्षमता 25,000

भारतीय रेल्वे आपली प्रवासी आरक्षण प्रणाली पूर्णपणे अपग्रेड करत आहे. या मोठ्या बदलानंतर रेल्वेची नवीन बुकिंग प्रणाली दर मिनिटाला 1.25 लाख तिकिटे बुक करू शकेल. ही सध्याच्या क्षमतेपेक्षा पूर्ण 5 पट जास्त आहे. सध्या रेल्वेची प्रणाली एका मिनिटात फक्त 25 हजार तिकिटेच प्रक्रिया करू शकते, ज्यामुळे तात्काळ बुकिंग किंवा जास्त लोडच्या वेळी प्रवाशांना त्रास होतो….

Read More

पंढरीत पालिकेकडून अतिक्रमण हटाव मोहीम:आषाढी यात्रेची तयारी, जेसीबी, ट्रॅक्टर आणि टेम्पोसह पथक रस्त्यावर‎

आषाढी यात्रेच्या नियोजित कामाला प्रशासनाकडून सुरुवात केली असून शहरात विविध ठिकाणी असलेल्या अतिक्रमणावर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी हातोडा उचलला आहे. बुधवार (दि. १ जुलै) रोजी नगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागाने पोलीस प्रशासनाच्या मदतीने अतिक्रमण हटवण्याच्या मोहिमेला सुरुवात केली आहे. यंदाची आषाढी यात्रा जेमतेम तीन आठवड्यांवर आलेली आहे. यात्रा नियोजनाच्या बैठकांचे सत्र सुरू झालेले आहे, नियोजन बैठकीत दिलेल्या सूचनांनुसार…

Read More

MP-UP महाराष्ट्रात पावसामुळे रस्ते पाण्याखाली:कार-बाईक वाहून गेल्या, GRP पोलीस ठाण्यात पाणी शिरले; बिहार-झारखंडमध्ये वीज पडून 5 मृत्यू

मध्य प्रदेशातील 7 जिल्ह्यांत बुधवारी जोरदार पाऊस झाला. इंदूरमध्ये पावसामुळे एक कार नाल्यात पडली. सिहोर जिल्ह्यात रस्त्यांवर पाणी नदीसारखे वाहू लागले. यात बाईकही वाहून गेल्या. बिहारमध्ये वीज पडून तीन आणि झारखंडमध्ये दोन लोकांचा मृत्यू झाला. यूपीमधील 25 शहरांमध्ये बुधवारी पाऊस झाला. आझमगड, बिजनौर, मिर्झापूरमध्ये जोरदार पावसानंतर रस्त्यांवर गुडघ्यापर्यंत पाणी साचले. ललितपूर रेल्वे स्थानकाच्या वेटिंग हॉलमध्ये…

Read More

वेळकाढू कारभाराविरोधात महावितरण कार्यालयाला घेराव:नागरिकांनी सहभाग घेत प्रशासनाविरोधात व्यक्त केली नाराजी

तिवसा शहर व तालुक्यात वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, नागरिकांना येणारी अवाजवी वीजबिले, स्मार्ट मीटरची सक्ती आणि रखडलेल्या लिंक लाईनच्या कामाविरोधात तिवसा तालुका काँग्रेस कमिटी व नगरसेवकांच्या नेतृत्वात बुधवारी १ जुलैला महावितरणच्या उपकार्यकारी अभियंता व शहर अभियंता यांच्या कार्यालयाला घेराव घालत त्यांच्याच दालनात आक्रमक ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात नागरिकांनी हिरीरीने सहभाग घेत महावितरण प्रशासनाविरोधात…

Read More

अजब आदेश! ट्रक वाहतुकीला‎मुभा पण एसटीची चाके थांबवली‎:विद्यार्थ्यांच्या चक्काजामसमोर नमले प्रशासन, 2 तासानंतर बस सुरु‎

रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे शहरातील शास्त्री चौक ते सेफला हायस्कूल या महत्त्वाच्या मार्गावर एसटीच्या वाहतुकीला बंदी घालण्यात आली होती. परंतु त्याचवेळी ट्रक मात्र सुसाट धावत होते. या अफलातून आदेशामुळे त्रस्त झालेल्या विद्यार्थ्यांनी बुधवारी काँग्रेसच्या मदतीने चक्काजाम आंदोलन केले. या आंदोलनामुळे अडचणीत आलेल्या तालुका प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन विद्यार्थ्यांचा रोष शांत केला. त्यानंतर लगेच नगरपालिकेचे…

Read More

धार्मिक:सलग सुट्ट्या, वटपौर्णिमेमुळे अक्कलकोट नगरीत 1 लाखांहून अधिक भक्तांचे दर्शन

प्रतिनिधी | अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी मंदिरात शासकीय सुट्टी, शनिवार, रविवार सलग सुट्यामुळे व वट पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला रविवारी पहाटेपासून दिवसभर भाविकांनी स्वामींच्या दर्शनाकरिता गर्दी केली. पहाटे पाच वाजल्यापासूनच शनिवारी मुक्कामी असलेल्या भाविकांमुळे मंदिर परिसर गजबजून गेले. शुक्रवारी शासकीय सुट्टी, शनिवार, रविवार सुट्टी यामुळे भाविकांची संख्या दुपटीने वाढली. हत्ती तलाव परिसर, अन्नछत्र मंडळ प्रांगणातील पार्किंगसह…

Read More

50 वर्षांपूर्वीची सह-शिक्षण शाळा निघाली मुलांची शाळा:प्रशासनाने न कळवता बदल केला, 120 मुलींचे प्रवेश रद्द झाले

पश्चिम बंगालमधील पूर्व बर्दवान जिल्ह्यातील कलना क्रमांक 2 ब्लॉकमधील बैद्यपूर विद्यापीठ गेल्या 50 वर्षांपासून सह-शिक्षण (मुली आणि मुले) शाळा म्हणून कार्यरत आहे, परंतु काही दिवसांपूर्वी जेव्हा 11वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनींनी नोंदणीसाठी शिक्षण पोर्टलवर अर्ज केला, तेव्हा असे समोर आले की बैद्यपूर विद्यापीठाचे मुलांच्या शाळेत रूपांतर करण्यात आले आहे. बदलाची माहिती प्रशासनालाही नाही या बदलाची माहिती स्वतः…

Read More

पीक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांचा झाला गौरव:राज्य, जिल्हा, तालुक्यातील शेतकऱ्यांचा सन्मान‎

बार्शी तालुका कृषी विभाग व बार्शी पंचायत समिती कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने दि. १ जुलै रोजी बार्शी पंचायत समिती येथे कृषी दिनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. कृषी दिन कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थितीत पंचायत समिती बार्शीचे उपसभापती संतोष निंबाळकर, खडकलगावचे माजी सरपंच दीपक रोंगे, बार्शी बाजार समितीचे माजी संचालक वालचंद मुंडे, पंचायत समिती सदस्य राजेंद्र सुरवसे, माजी…

Read More