Headlines

सर्पदंश झालेल्या गरोदर महिलेला जीवदान:सर्पदंश डॉक्टरांनी वाचवले आई अन् बाळाचे प्राण

छत्रपती संभाजीनगर येथील मेडिकव्हर रुग्णालयात सर्पदंश झालेल्या एका गरोदर महिलेवर डॉक्टरांच्या पथकाने यशस्वी उपचार केले. या उपचारामुळे आई आणि गर्भातील बाळाचे प्राण वाचले असून, महिलेची प्रकृती आता स्थिर आहे. सर्पदंश झाल्यानंतर या महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सर्पविषाचा शरीरावर होणारा परिणाम लक्षात घेऊन तिच्यावर त्वरित उपचार सुरू करण्यात आले. गर्भावस्थेमुळे आईच्या आरोग्यासोबतच गर्भातील…

Read More

उत्पादन शुल्क निरीक्षकावर गुन्हा दाखल:परवान्यासाठी 20 लाखांची लाच मागितल्याचा आरोप

पुणे येथे व्यवसायाच्या परवान्यासाठी २० लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक जितेंद्र हरिश्चंद्र पाटील (वय ४७) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सोमवारी सायंकाळी त्यांना अटक केली. या प्रकरणातील तक्रारदार हे ३७ वर्षीय परवाना सल्लागार आहेत. त्यांच्या एका कंपनीला उत्पादन शुल्क विभागाकडून आवश्यक परवाना हवा होता. तसेच,…

Read More

पुपुणे ते मुंबई जीवनदायी अवयवाची जलद वाहतूक:पुणे विमानतळ प्रशासनाचा तातडीचा समन्वय

पुणे विमानतळ प्रशासनाच्या समन्वयातून पुण्याहून मुंबईला जीवनदायी मानवी अवयवाची सुरक्षित आणि तातडीने वाहतूक करण्यात आली. अवयव प्रत्यारोपणासाठी अत्यंत कमी वेळ उपलब्ध असल्याने विमानतळ प्रशासन, विमान कंपनी, भूमी सेवा संस्था, सुरक्षा यंत्रणा आणि वैद्यकीय पथकाने समन्वय साधत ही वाहतूक सुलभ केली. भारती रुग्णालय, पुणे येथून संबंधित मानवी अवयव मिळविण्यात आला होता. तो मुंबईतील सर एच. एन….

Read More

प्रकल्पग्रस्तांचे अमरावतीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन:जमिनीच्या मोबदल्यासह विविध मागण्यांसाठी, पुढील टप्पा मुख्यमंत्र्यांकडे

अमरावती येथे बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. जमिनीच्या मोबदल्यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचा पुढील टप्पा थेट मुख्यमंत्र्यांकडे असेल, असे यावेळी ठरवण्यात आले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मनोजभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत हे आंदोलन झाले. पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, वाशीम, बुलढाणा आणि…

Read More

जि.प. शिक्षक बँकेची आमसभा 16 ऑगस्टला:12 विषयांवर चर्चा, वादाची शक्यता

अमरावती जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, १६ ऑगस्ट रोजी दुपारी १.३० वाजता होणार आहे. अमरावती येथील कठोरा चौक जकात नाका-रहाटगाव रिंग रोडवरील अंशुमन पॅलेस (श्रीनिवास कॉलनी) येथे ही सभा आयोजित करण्यात आली आहे. बँकेच्या आर्थिक आणि प्रशासकीय कामकाजाशी संबंधित १२ महत्त्वाच्या विषयांवर या सभेत चर्चा करून निर्णय घेतले जातील. या सभेत…

Read More

घाटीत एकाच दिवशी दोन देहदान:वर्षभरात एकूण 31 देहदान प्राप्त

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथील शरीररचनाशास्त्र विभागाला सोमवार, १० ऑक्टोबर रोजी एकाच दिवसात दोन देहदान प्राप्त झाले. यामुळे या वर्षातील एकूण देहदानांची संख्या ३१ वर पोहोचली आहे. कै. आसाराम किसन साळुंके (७९, रा. दुनकी, ता. वैजापूर) आणि कै. इंदुबाई रावण पाटील (७९, रा. गणपूर, ता. चोपडा) यांच्या कुटुंबीयांनी सामाजिक बांधिलकी जपत देहदानाचा निर्णय…

Read More

शाळेजवळ चिखलाचे तळे, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न:अंजनगाव बारी ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

अंजनगाव बारी येथे पावसाळ्यामुळे रस्त्यांची दूरवस्था झाली असून, मोठ्या प्रमाणात पाणी आणि चिखल साचला आहे. यामुळे नागरिक आणि विद्यार्थ्यांना ये-जा करताना अडचणी येत आहेत. विशेषतः जिल्हा परिषद मुलांच्या शाळेजवळ चिखलाचे तळे साचल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. शाळेजवळच एक मोठा खड्डा तयार झाला असून, त्यात पावसाचे पाणी…

Read More

तिवस्यात हेल्मेट न वापरल्यास दंड:दोन ठिकाणी चेक पोस्टद्वारे वाहतूक नियमांवर कारवाई

तिवसा येथे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. विना हेल्मेट, ट्रिपल सीट, चुकीच्या बाजूने वाहन चालवणे आणि दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांविरोधात हायवेवरील पंचवटी चौक आणि कोर्ट परिसरात चेक पोस्ट लावून ही मोहीम राबवली जात आहे. दररोज सुमारे शंभर वाहनधारकांवर कारवाई केली जात असून, यामुळे वाहतूक नियमांबाबत जनजागृती होत असल्याचे पोलीस विभागाने म्हटले…

Read More

नव्या कामगार कायद्यांविरोधात अमरावतीत जेलभरो आंदोलन:350 हून अधिक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले, नंतर सुटका

अमरावती येथे केंद्र सरकारच्या नव्या चार कामगार कायद्यांविरोधात कामगार, कर्मचारी, शेतकरी आणि शेतमजुरांनी ‘जेलभरो’ आंदोलन केले. या कायद्यांमुळे शासकीय व कायमस्वरूपी नोकऱ्या संपुष्टात येऊन केवळ खासगीकरण आणि नवीन वेठबिगारी सुरू होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. पोलिसांनी ३५० हून अधिक आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले होते, मात्र प्रतिबंधात्मक कारवाईनंतर त्यांची सुटका करण्यात आली. या आंदोलनात आयटक, सीटू, स्वाभिमानी…

Read More

सरकारचा जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा विचार नाही:मंत्रालयाने संसदेत सांगितले- तिजोरीवर आर्थिक भार वाढेल; 5 राज्यांची OPS निधी परत करण्याची मागणी फेटाळली

जुनी पेन्शन योजना (OPS) पूर्ववत करण्याबाबत सरकारची भूमिका पूर्णपणे स्पष्ट झाली आहे. केंद्र सरकारने लोकसभेत स्पष्ट केले आहे की, सध्या OPS पुन्हा लागू करण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही. सरकारने यामागे सरकारी तिजोरीवर पडणारा आर्थिक भार हे मुख्य कारण सांगितले आहे. केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात सांगितले की, राजस्थान, छत्तीसगड, झारखंड,…

Read More