Headlines

परिचारिकांचे काम बंद,‎रुग्णालयाबाहेर निदर्शने‎:सुधारित सेवा प्रवेश नियम,पदोन्नतीसाठी आंदोलन

सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभागातील परिचारिका संवर्गाच्या प्रलंबित, न्याय्य मागण्यांसाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या (एमजीएनएफ) नेतृत्वाखाली मंगळवारी, ४ ऑगस्टला राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली होती. या हाकेला ओ देत येथील परिचारिकांनी दोन तास काम बंद ठेऊन त्या-त्या रुग्णालयात निदर्शने केली. जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय, सुपर स्पेशालिटी, जीएमसी, क्षय रुग्णालयात सकाळी ७.३० ते ९.३०…

Read More

पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात:कंटेनर, टेम्पो आणि कारची धडक; पुण्याकडे जाणारी वाहतूक ठप्प, सुदैवाने जीवितहानी टळली

पुणे-नाशिक महामार्गावरील चाकणजवळील वाकी परिसरात आज पहाटे कंटेनर, टेम्पो आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला. भरधाव कंटेनर आणि टेम्पोची जोरदार धडक झाल्यानंतर टेम्पो थेट जवळ उभ्या असलेल्या कारवर पलटी झाला. धडकेची तीव्रता इतकी होती की कंटेनरही महामार्गावर आडवा झाला. या अपघातामुळे पुण्याकडे जाणारी वाहतूक काही काळ पूर्णपणे विस्कळीत झाली. कसा घडला अपघात? मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच्या…

Read More

राजेश्वर मंदिरालगत रोडवर 3 वर्षांपासून खड्डा; भाविक त्रस्त:आगामी श्रावण सोमवारी कावडधारकांना मोठा धोका‎

अकोला शहराचे श्रद्धास्थान असलेल्या राजेश्वर मंदिरासमोरील मुख्य रस्त्यावर पडलेला मोठा खड्डा गेल्या तीन वर्षांपासून तसाच असल्याने भाविक आणि परिसरातील नागरिकांना जीव मुठीत धरून ये-जा करावी लागत आहे. १७ ऑगस्टला पहिला श्रावण सोमवार असून या खड्ड्यामुळे कावड कावडधारक भक्तांची गैरसोय होणार आहे. तसेच मंदिरात दर्शनासाठी दररोज येणाऱ्या हजारो भाविकांसह स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे….

Read More

No Petrol Without Third Party Vehicle Insurance

नवी दिल्ली11 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि इरडाला असा पायलट प्रकल्प तयार करण्यास सांगितले आहे, ज्यात वैध थर्ड पार्टी विमा नसलेल्या वाहनांना पेट्रोल दिले जाऊ नये. न्यायमूर्ती संजय करोल आणि न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा यांच्या खंडपीठाने नवीन कारसाठी अनिवार्य विमा कालावधी 3 वरून 4 वर्षे आणि नवीन दुचाकी वाहनांसाठी 5 वरून 6 वर्षे…

Read More

मुंबईतील बड्या व्यापाऱ्याचा सोनीपतमधील वृद्धाश्रमात मृत्यू:वेळ नसल्याचे सांगत लेकींनी 5100 रुपये पाठवले, 'व्हिडिओ कॉल'वर पाहिला वडिलांचा अंत्यसंस्कार

मुंबईतील मोठे कापड व्यापारी शिवचरण रामरत्न गुप्ता (74) यांचे हरियाणातील सोनीपत येथील एका वृद्धाश्रमात निधन झाले. ते गेल्या तीन वर्षांपासून आश्रमात राहत होते. दोन वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचेही याच आश्रमात निधन झाले होते. मंगळवारी आश्रम व्यवस्थापनाने त्यांच्या निधनाची माहिती त्यांच्या तिन्ही मुलींना दिली. मात्र, तिघींनीही अंतर आणि वेळेचे कारण देत अंत्यसंस्काराला येण्यास नकार दिला. आश्रम संचालक…

Read More

16,908 पैकी 183 गोणीला 3,000 हजारांवर भाव:आवक वाढूनही 200 रुपयांची उसळी, कांदा 50 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता‎

वांबोरी उपबाजार आवारात कांद्याच्या दराला दोन दिवसांत चांगलीच उचल मिळाली आहे. ३० जुलैच्या तुलनेत सोमवारी झालेल्या लिलावात प्रतिक्विंटल सुमारे २०० रुपयांची उसळी लिलावात पहायला मिळाली. सुमारे १८३ गोणी कांद्याला ३ हजारांवर भाव मिळाला. एक नंबर कांदा, एकूण सरासरी दर २१०० ते २८०० रुपये मिळाला. ३० जुलै रोजी वांबोरी उपबाजारात १४ हजार ७८५ गोणी कांद्याची आवक…

Read More

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह‎:जायकवाडी भरल्याने दिलासा; 25 टीएमसी भरल्यानंतरच उघडणार मुळा धरणाचे दरवाजे

यंदा “एल निनो’च्या पार्श्वभूमीवर धरणे भरणार की नाही याची धाकधूक लागली होती. पण जायकवाडी ९१ टक्क्यांवर गेल्याने धरणातून विसर्ग सुरू झाला आणि अहिल्यानगरला दिलासा मिळाला. धरण साठा नियंत्रण निकषानुसार, १५ ऑगस्टपर्यंत मुळा धरणात ८७.७९ टक्के म्हणजेच सुमारे २२ हजार ६८६ दलघफू (२२.६ टीएमसी) पाणी साठवता येणार नाही. सध्याची आवक पाहता धरण पुढील दोन दिवसांत ओलांडणार…

Read More

गत 5 महिन्यांत डाळ ₹8, तेल ₹6 ने महाग:दूध-साखरसह रेशनच्या 99% वस्तूंची दरवाढ; सणासुदीत महागाई आणखी वाढण्याची भीती

28 फेब्रुवारी ते 3 ऑगस्टपर्यंत, म्हणजे गेल्या 5 महिन्यांत सामान्य माणसाच्या खाण्यापिण्याचा खर्च वेगाने वाढला आहे. 28 फेब्रुवारी हा तोच दिवस आहे, जेव्हा अमेरिका-इराण-इस्त्रायलमध्ये युद्ध सुरू झाले होते. ग्राहक व्यवहार विभागाच्या किंमत निरीक्षण प्रणालीनुसार, या 5 महिन्यांत 16 प्रमुख खाद्यपदार्थांपैकी 15 च्या किमती वाढल्या आहेत. यामध्ये डाळी आणि तेलाच्या किमतीत सर्वाधिक वाढ झाली. याशिवाय, चणा…

Read More

घाटनांद्रा घाटाची दुरवस्था, जागोजागी खड्डे; संरक्षण कठडे नसल्याने अपघाताचा धोका:रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी, महिनाभरापासून बससेवा बंद, प्रवाशांचे हाल‎

राज्य महामार्ग क्रमांक ४८ वरील घाटनांद्रा घाटातील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने या मार्गावरील अपघातांचा धोका वाढला आहे. घाटातील रस्त्यावरील खोल खड्डे, खचलेले भाग तसेच धोकादायक वळणांवर कठडे व संरक्षणभिंतींचा अभाव लक्षात घेऊन सिल्लोड आणि पाचोरा आगाराने गेल्या महिनाभरापासून बससेवा पूर्णपणे बंद ठेवली आहे. परिणामी विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य प्रवाशांचे मोठे हाल होत…

Read More

खेळणा प्रकल्पात 48 % साठा:सिल्लोडसह 12 गावांवरील पाणी संकट टळले, सततच्या पावसाने पाण्याची आवक, मोठ्या पावसाची प्रतीक्षा‎

तालुक्यात मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे स्थानिक जलप्रकल्पांमध्ये समाधानकारक पाण्याची आवक झाली आहे. पालोद येथील खेळणा मध्यम प्रकल्पात सोमवारी ४८ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. यामुळे सिल्लोड शहरासह परिसरातील १२ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तुर्तास तरी सुटला असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तालुक्यात पावसाने जोरदार बॅटिंग केल्यामुळे मुर्डेश्वर येथील लघु प्रकल्प भरून सांडव्यावरून पाणी वाहू…

Read More