'विश्वगुरू झुरळांना घाबरतात!':दिल्लीतील दडपशाहीवरून सुषमा अंधारेंचा घणाघात, सरकार लोकशाहीचा मुडदा पाडत असल्याची केली टीका
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राजधानी दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली संसदेवर धडक मोर्चा काढण्यात आला. संसद भवनाजवळ पोहोचलेल्या या आंदोलकांना रोखण्यासाठी आणि पांगवण्यासाठी पोलिसांकडून बळाचा वापर करत अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, पोलिसांच्या या दडपशाहीवरून आता राजकीय वातावरणही तापले असून, शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा…