मनाच्या चंचलतेवर भक्ती, सत्संग हाच उपाय- राजेशकृष्ण महाराज:सुंदरकांड पठणासह होणार सुदामा चरित्राचे सादरीकरण
मानवी मन अत्यंत सूक्ष्म आणि चंचल आहे. या चंचलतेमुळे माणसाचे पतन होते आणि अपेक्षित ध्येय साध्य करता येत नाही. सदा भरकटणाऱ्या मनामुळे व्यक्तीचा सर्वंकष विकास खुंटतो. त्यामुळे मनाच्या या चंचलतेवर नियंत्रण मिळवण्यासाठी भगवंताची भक्ती आणि सत्संग हाच एकमेव प्रभावी उपाय आहे. मनात भक्तीची ज्योत सतत तेवत ठेवून चंचलतेचा त्याग करावा, असा अमूल्य उपदेश वृंदावन येथील…