कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी तरुण पिढी, म्हणजेच ‘जेन-झी’ (Gen-Z), तसेच 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यावेळी आलेल्या अनुभवांबाबत केलेल्या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. आजच्या तरुणांच
.
‘स्क्रीन टाइममुळे विचार करण्याची पद्धत बदलतेय’
विश्वास नांगरे पाटील म्हणाले की, आजच्या तरुणांचा मोबाईल आणि सोशल मीडियावरील वेळ मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सतत स्क्रोल करण्याच्या सवयीमुळे विचार करण्याची क्षमता, भावनिक संतुलन आणि सामाजिक जाणीव यावर परिणाम होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
त्यांच्या मते, केवळ बौद्धिक क्षमता पुरेशी नसून भावनिक परिपक्वता, सामाजिक जाणीव आणि प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाण्याची मानसिक ताकद विकसित होणेही तितकेच महत्त्वाचे आहे. अपयश आणि संघर्ष स्वीकारण्याची क्षमता प्रत्येक तरुणामध्ये असायला हवी, असेही त्यांनी सांगितले.
‘आजच्या Gen-Z ला काही सांगणंही कठीण’
नांगरे पाटील यांनी सांगितले की, आजच्या तरुणांशी संवाद साधणे अधिक आव्हानात्मक झाले आहे. ‘जेन-झी’ ही देशाचे भविष्य घडवणारी पिढी असली तरी त्यांच्यापर्यंत योग्य विचार पोहोचवणे आणि त्यांना समजावून सांगणे कठीण होत चालले आहे, असे त्यांनी नमूद केले.
ते म्हणाले की, पोलीस दल असो किंवा सीमेवरील जवान, त्यांची सेवा अखंड सुरू असते. मात्र, कितीही काम केले तरी टीका आणि शिव्यांना सामोरे जावे लागते. “गेल्या काही दिवसांपासून तर मीच अधिक शिव्या खातोय,” अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
26/11 हल्ल्यापूर्वीच ताज हॉटेलची केली होती पाहणी
कार्यक्रमात बोलताना विश्वास नांगरे पाटील यांनी 26 नोव्हेंबर 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या आठवणींनाही उजाळा दिला. तेव्हा ते दक्षिण मुंबईचे डीसीपी होते. हल्ल्यापूर्वी काही गुप्तचर माहिती मिळाल्यामुळे त्यांनी दोन महिन्यांपूर्वीच ताज हॉटेलची सखोल पाहणी केली होती, असे त्यांनी सांगितले.
त्यामुळे हल्ला झाल्यानंतर हॉटेलचा नकाशा, प्रवेशमार्ग आणि अंतर्गत रचना माहिती असल्याने कारवाई करताना मोठी मदत झाली, असे त्यांनी स्पष्ट केले.
त्या रात्री 9.51 वाजता ताजमध्ये प्रवेश केला
नांगरे पाटील यांनी सांगितले की, दहशतवाद्यांनी रात्री सुमारे 9.40 वाजता ताज हॉटेलमध्ये प्रवेश केला. माहिती मिळताच ते आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले आणि रात्री 9.51 वाजता मागील प्रवेशद्वारातून हॉटेलमध्ये दाखल झाले.
त्यांनी सांगितले की, काही मिनिटांतच दहशतवाद्यांवर गोळीबार करण्यात आला. त्या कारवाईमुळे क्रिस्टल हॉलमध्ये सुरू असलेल्या विवाह समारंभातील अनेकांचे प्राण वाचले. त्यानंतर परिस्थितीनुसार योग्य ठिकाणी जाऊन कारवाई सुरू ठेवण्यात आली.
पूर्वतयारीमुळे कारवाईत फायदा झाला
विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले की, हल्ल्याच्या आधी ताज हॉटेलची रचना अभ्यासल्यामुळे प्रत्येक मजला, मार्ग आणि सीसीटीव्ही कंट्रोल रूमची माहिती होती. त्यामुळे कारवाई करताना निर्णय घेणे अधिक सोपे झाले.
मात्र, पहाटेपर्यंत सुरू असलेल्या या चकमकीत त्यांचे सहकारी कॉन्स्टेबल राहुल शिंदे शहीद झाले, तर त्यांच्या अंगरक्षक अमित खेतले यांना तीन गोळ्या लागल्या. या घटनेची आठवण सांगताना त्यांनी शहीद जवानांच्या त्यागालाही अभिवादन केले.
कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने बोलताना त्यांनी तरुणांना मानसिकदृष्ट्या सक्षम बनण्याचे आवाहन केले. तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक असला तरी त्याचा अतिरेक टाळून आत्मशिस्त, भावनिक स्थैर्य आणि संकटांशी लढण्याची क्षमता विकसित करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
हेही वाचा…
‘नीट’नंतर राज्यात MHT-CET मध्येही घोटाळ्याचा आरोप : बारावीत 40 टक्के अन् सीईटीत 99 पर्सेंटाईल कसे? शिक्षकाचा व्हिडिओतून गंभीर दावा

देशभरात गाजलेल्या ‘नीट’ पेपरफुटीच्या वादात ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या आक्रमक आंदोलनामुळे थेट केंद्रीय शिक्षणमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. दिल्लीतील ही धग शांत होण्यापूर्वीच, आता महाराष्ट्रात ‘एमएचटी-सीईटी’ (MHT-CET 2026) परीक्षेत ‘नीट’पेक्षाही मोठा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केला आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत, आमदार रोहित पवार यांच्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते महादेव बालगुडे यांनी एका शिक्षकाचा व्हिडिओ समोर आणत परीक्षा यंत्रणेच्या विश्वासार्हतेवरच मोठे प्रश्नचिन्ह उभे केले आहे. “बारावीत जेमतेम पास झालेल्या विद्यार्थ्यांना सीईटीमध्ये १०० पर्सेंटाईल कसे मिळाले?” या एका प्रश्नाने आणि पैशांचा वापर करून गुण वाढवल्याच्या दाव्याने सध्या राज्याच्या शिक्षण वर्तुळात भूकंप आणला आहे. सविस्तर वाचा…